Friday, August 14, 2020

हे स्वातंत्र्या !




गरिबांच्या झोपडीमध्ये,
मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये
श्रीमंतांच्या फ्लॅटमध्ये
अब्जोवधींच्या रो हाऊसेस,बंगलो मध्ये
हे स्वातंत्र्या, हर्षोल्हासात स्वागत आहे तुझं.

सुरक्षेच्या नावाखाली इथं
स्वातंत्र्य हिसकावून घेतल्या जातंय
आरोग्य संवर्धनाची भाषा करून
आर्थिक व मानसिक आरोग्य
बिघडवल्या जातंय.
या स्थितीतही हे स्वातंत्र्या तुझं आम्ही
हर्षोल्हासात स्वागत करतोय.

हे स्वातंत्र्या,
आमच्याही डोक्यात स्वातंत्र्य घुसेल का
स्वैराचार नव्हे हि भाषा ठीक आहे.
पण स्वातंत्र्य म्हणजे काय हे
आम्हाला कधी कळेल का ?
सत्ताधाऱ्यांमार्फत पिळवणूक होणे
हे कसे अयोग्य आहे.
हे त्यांनाही कधी कळेल का?

हे स्वातंत्र्या,
राजकीय स्वातंत्र्याचा सोहळा 
आज आम्ही साजरा करत असताना
कळलेच नाही कधी राजकीय गुलाम बनून गेलो,
निसर्गनियमांविरुद्ध वागून
राजकीयांमुळे पुन्हा पारतंत्र्यात गेलो.


हे स्वातंत्र्या !
कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन
आणि क्वारंटाईन मुळे
जगण्याचा हक्क हिरावल्या गेला
कैद्याला बंदिस्त केल्यासारखं
प्रत्येक नागरिक घरात डांबल्या गेला.

हे स्वातंत्र्या !
कारखानदारी व ईतर कामे बंद करून
उत्पन्नाच्या साधनांवर आमच्या बसवला लगाम
हे स्वातंत्र्या आताही आहोतच रे
आम्ही आमच्या राजकीयांचे गुलाम.

हे स्वातंत्र्या !
हे स्वातंत्र्य मुबारक हो 
तू या देशातील त्या सर्व नागरिकांना
ज्यांच्याकडे अर्थ नसतो
स्वातंत्र्य व पारतंत्र्याला....

✍️© जी.संदीप (गोणार,नांदेड)
               ९५५२८०३९८०

Thursday, August 6, 2020

विचारांचे हल्ले रोखून दाखवा

विचारांचे हल्ले रोखून दाखवा


प्रतिकांवर हल्ले काय चढवताय
धमक असेल तुमच्यात तर 
विचारांचे हल्ले रोखून दाखवा
आम्हीही मानू विजयाचे शिलेदार तुम्हाला
आमच्यासोबत खरी लढाई लढून तर दाखवा.


ऐपत नाही तुमची
विचारांच्या लढाईची
म्हणून नौटंकी करताय
असल्या भ्याड हल्ल्याची ?

तुमच्या असल्या हल्ल्याने होईल आमचे
आणि काही प्रमाणात वास्तुचें नुकसान
पण  बुद्ध विचारांशिवाय
मानव जात होईल सुनसान


बुद्ध विचार पेरणारा आंबेडकर
का सलतोय तुमच्या मनात ?
त्याने तुमच्या व्यवस्थेला हादरा दिला
हीच तर खंत नाही ना तुम्हा जणांत.

ती खंत तुम्ही निरर्थक पणे
मनात बाळगत बसू नका.
त्यांनी दिलेला मार्ग हा एकतेचा व
समानतेचा आहे हे जगाला सुद्धा सांगायला विसरू नका.

देशाचे प्रधानसेवक सुद्धा विविध
राष्ट्राध्यक्षांना देतात बुद्ध मूर्तीच भेट.
मग तुम्हीच ठरवा ईतर दैवतांपेक्षा
बुद्ध ठरलेत का नाही ग्रेट.


एवढी ताकद त्या विचारात आहे
म्हणून करू लागलेत काहीजण विरोध
आणि घडवून आणत आहेत
हल्ले मानवावर आणि प्रतिकांवर सुद्धा
पण हल्लेखोरांनो एक लक्षात घ्या
ती तुमची बुद्धी नाही आणि मानसिकता सुद्धा.

म्हणून हल्लेखोरांनो एखाद्याच्या दावणीला बांधून असे भ्याड कामे करू नका.
योग्य आयोग्याची जाणीव करून घेऊन.
सम्यक विचारांना समजून घेऊन एकोप्याने राहण्याचा निर्णय सोडू नका.


कोरोनांने माणसात माणुसकी
आल्याचं सोंग मिरवत बसू नका
माणूस कालही द्वेषयुक्त होता
आजही आहे आणि उद्याही राहील
त्यातून वाचायला कोरोना तर नाहीच
पण बुद्धशिवाय दुसरं काही आहे असं सांगू नका.


सुधारणेच सोंग घेणं
असत खूप सोपं
जेव्हा येते स्वतःवर वेळ
तेव्हा होते खूप दुःख मोठं.

या प्रतिकांवरच्या हल्ल्याने
बाबासाहेब संपणार नाही
तो एक असा घटक आहे
इथल्या प्रत्येकाच्या रक्तात
तो सापडल्याशिवाय राहत नाही.

त्यामुळं आंबेडकराला
संपवण्याचे
स्वप्न तुम्ही सोडून द्या.
तुम्हीही तसा विचार अंगिकारा आणि
स्वतःच्या चौरंगी विकास करून घ्या.

© जी.संदीप(गोणार,नांदेड.)
       9552803980

Tuesday, August 4, 2020

व्हावीत स्मारके मानवी कल्याणाची




भगवान के घर देर है अंधेर नही म्हणत
देवासाठीच न्यायालयाचा कामी लावलं
वास्तविक पुराव्यांच्या आधारे न्हवे
तर भावणीकतेच्या बळावर न्यायदान केलं.

कोट्यवधी रुपयांचा खर्च
आम्ही आमच्या अस्मितेच्या नावावर करतोय
पण आपल्याच धर्मातील बांधवांच्या
आयुष्याचा तमाशा पाहत बसतोय.

अस्मितेच्या नावाखाली आज
सुरुवात करतोय पुन्हा उभारण्या मंदिर
मानवाच्या विकासात्मक गरजेसाठी आम्ही
कधीतरी होऊ का खंबीर ?

गरज आहे आम्हाला आमच्यासाठी
सार्वकालिक होण्याची खंबीर
आमच्या अडचणीत पूर्णपणे
कांमी आली नाहीत कधीच ही मंदिर.

मंदिरासाठी करोडो रुपयांचा
करण्यात खर्च व्यर्थ आहे
देवाच्या नावाखाली आतमध्ये
दाटलेला सगळा स्वार्थ आहे.

सामान्य लोक देतात घाम गाळलेल्या
कष्टाच्या पैशातून दान
श्रीमंत देतात करोडोने दानपेटीत
चुकवण्या शासकीय कराचे दान.

दोन नंबरच्या कमाईची होऊ नये चौकशी
म्हणून लपवतात पैसा मंदिराच्या तिजोरीत
तुमच्या भावनेचा आणि भीतीचा बाजार मांडून बसलेत
हे कधी घुसणार का तुमच्या खोपडीत ?

मंदिर बांधण्या नाही विरोध माझा
खुशाल संस्कृती संवर्धनासाठी स्मारके तयार व्हावीत
पण कोट्यवधी जनता दुःखात असताना
पैशाची उधळपट्टी कशासाठी करावीत.

सामान्य माणसांच्या विकासानंतर
खुशाल स्मारकाचे निर्माण व्हावे
भविष्यात मानवी कल्याणाचे दर्शन घडण्या
मंदिरासोबत ऐक्याचेही स्मारके तयार व्हावीत.

असाल सुज्ञ तुम्ही तर
समजून घ्याल माझं म्हणणं
अन्यथा चालू राहतील त्यांचे धंदे
आणि एक-मेकांबद्दल डोक्यात द्वेष पेरण.

© जी.संदीप (गोणार,नांदेड)
        9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...