Wednesday, August 30, 2023

...आणि स्वातंत्र्याचा महिना संपला




15 ऑगस्ट ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं

पण तरीसुद्धा आनंदी नव्हतो आम्ही

म्हणून प्रजासत्ताकाचा सोहळा

धूमधडाक्यात साजरा करतो आम्ही


पण तरीही प्रजासत्ताकाची मुहूर्तमेढ आहे

15 ऑगस्ट याच दिनी

म्हणून उत्साह संचारतो

काही भारतीयांच्या अंगी


स्वातंत्र्याचा महिना संपला

देशभक्तीचे गुणगान गाणे बंद करू

दुसऱ्या पेक्षा माझाच जास्तीत जास्त कसा फायदा होईल

हे पाहणे आम्ही कसे विसरू


भारत देश म्हणजे दक्षिणेच्या टोकापासून

उत्तरेच्या टोकामधील भौगोलिक परिसर होय

त्यातील जिवंत माणसे देश या संकल्पनेत

समाविष्ट करण हे चुकीचं होय


म्हणून या देशात पहिल्यांदा

माझी प्रत्येक हौस पूर्ण झाली पाहिजे

इतर नागरिक मेले तरी मला काय पर्वा

माझी हौस पूर्ण करून घेणे हेच ध्येय असल पाहिजे.


मीच जिवंत नसलं, माझीच सप्न पूर्ण होत नसतील

तर देशाबद्दलच्या अभिमानाच काय लोणचं घालायचं काय ?

माझाच इथ विकास नसल तर

दुसरा प्रत्येक जन भकास झाला तरी त्याचं मला काय ?


अशीच मानसिकता इथ

करोडोंच्या मनात रुजलेली दिसतेय

म्हणून जो तो कस लुबडता येईल देशाला

हेच विचार करत जगताना दिसतोय


स्वातंत्र्य दिनी मात्र झेंड्याखाली शासक प्रशासक

पांढऱ्या कपड्यात काळी मानसिकता घेऊन मिरवतोय

खरा झेंडा मात्र सामान्यांच्या हृदयात

मलीन कपड्याचा सल्यूट घेत फडकतोय

 

कशाचा स्वातंत्र्य दीन

आणि कशाच आलंय स्वातंत्र्य

इंग्रज निघून गेले कायमचे पण

दिडशहाने हलवत आहेत देशाचं सूत्र


स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

हे सांगत फिरतात काही जण

शासक प्रशासक म्हणजे आहेत नोकर

हे सुद्धा जाणून घ्यावं प्रत्येक जण


म्हणून मित्रांनो आपणही देशाला लुबाडूया

पण त्याआधी थोडीशी गुंतवणूक करूया

निसर्ग संवर्धनासाठी झाडे लावूया,

गरजा मर्यादीत ठेवूया,

दुसऱ्याला आपल्या जगण्यातील रुबाब दाखवणे टाळूया

गरजेएवढेच प्रत्येक गोष्ट मिळवत राहूया,

प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळेल यासाठी प्रयत्न करुया

देश ओस पडूद्या आपल्याला त्याच काय देणं-घेणं

जे सोबत आहेत त्याच्यासाठी मात्र आपण नेहमी पुढं येऊया.


देशाचं वाटोळं होऊद्या

आपल्याला काय देणं घेणं

आपण मात्र आपल्या परिसराला

उत्तम आणि पोषक असे बनवूया

आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे

त्या गोष्टींची निर्मिती आपणच करुया


देशावर आक्रमणे झाली तर होऊद्या

आपल काय जातंय त्यात

आपण फक्त आपल्या शेजाऱ्यांसोबत

परिसरातल्यांसोबत एकात्मतेने राहूया


जात धर्म पंथ यामुळं देशात होत राहूद्या वाद विवाद

आपण फक्त हिंदू, मुस्लिम, बौध्द, शीख, इसाई, ख्रिश्चन

अशा वेग वेगळ्या जाती धर्माचे एकत्रित शेजारी शेजारी राहूया

रोटीच नात एक मेकांशी ठेवून आनंदाने इथ जगूया


बेटीच्या व्यवहाराच बघुया नंतर कधीतरी

आधी रोटीच्या व्यवहाराच नक्की करून घेऊया

मग काय घेणं देणं देशाचं आम्हाला या

आम्ही सुखाने नांदू लागल्यानंतर

जात धर्माच्या नावावर लढणाऱ्याना लढत राहू द्या....


स्वातंत्र्याचा महिना संपत असताना 

आम्ही स्वातंत्र्य आहोत का हे बघुया

नसल आम्हाला स्वातंत्र्य तर सर्वजण मिळून

एकत्रितपणे स्वातंत्र्य जगत राहूया....

मानसाशी मानसासारखे वागुया..........


© जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Monday, August 14, 2023

तुमचा आमचा स्वातंत्र्य दीन ?



स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या, स्वातंत्र्याच्या समता,स्वातंत्र्य आणि बंधुता हा गुण आपल्यात असावा. हे गुण जर आमच्यात रुजनार नसतील तर, स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. जर ते गुण प्रत्येक भारतीयांच्या अंगी भिनतील तर, आम्हाला कोणाकडूनही संरक्षण करून घेण्याची गरज नाही. 

     वास्तव पाहिले तर असे निदर्शनास येते की, आमच्यामध्ये स्वातंत्र्याची बीजे रुजण्यास खूप कालावधी लागेल असे दिसते कारण, एक-मेकांबद्दल जर समतेची भावना नाही, आप-आपसात बंधुता नाही असे असेल तर, आजसुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी बहिणीला भावाकडे राखी बांधून संरक्षणाची अप्रत्यक्ष मागणी करावी लागेल जर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात ही स्थिती असेल तर कसे चालेल ?

       आज च्या युगात आम्हा सर्वांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. मग या पोलीस प्रशासनाला भारतीय नागरिक (फक्त स्त्री नाही) राखी का बांधत नाही ? मला व्यवस्थेच्या कोणत्याही गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात स्वारस्य नाही.पण मनात आलेला प्रश्न उपस्थित करणं आणि व्यवस्थेच्या शिलेदारांना त्याचा जाब विचारणं हा स्वातंत्र्याचा भाग आहे.

         पण आपल्या मताच्या विरोधात किंवा आपल्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्याला विचाराच्या आधारे प्रत्युत्तर न देता. त्याचं व्यक्त होन बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा स्वातंत्र्याला आम्ही कस स्वीकारायचं ? तुमच्या या अशा दुतोंडी स्वातंत्र्याचा धिक्कार करतो. लाथ मारतो तुमच्या अशा स्वातंत्र्य सोहळ्याला...सोहळा साजरा करण्याने कोणी स्वातंत्र्य होत नसते. इंग्रजांनी आपल्यावरील सत्ता सोडली म्हणून काय झालं ? जिथं एखाद्याला गुलामीत ठेऊन राजा बनण्याची ज्यांची विचारसरणी आहे. अशांसोबत हा स्वातंत्र्याचा सोहळा कितीही पिढ्यांनी साजरा केला तरी, या स्वातंत्र्य दिनाचा काहीही फायदा होणार नाही. हे का लक्षात येत नाही.स्वातंत्र्य हे कायद्याने नाही तर प्रत्येकाच्या मनाने उपभोगता व देता आलं पाहिजे. तेव्हा कुठं या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होतो...मग त्या स्वातंत्र्यात कोणत्याही बहिणीला कोणाकडून संरक्षणासाठी आपल्या भावाला राखी बांधायची गरज पडणार नाही. राखी बांधून घ्यावी लागते म्हणजे संरक्षणाची मागणी आली. संरक्षण आले म्हणजे कोणी एक दुबळा झाला. दुबळेपन आले म्हणजेच समता नाकारण्याची सुरुवात झाली. जिथे स्वातंत्र्य नसते तिथे तुम्हाला काय खाक स्वातंत्र्य मिळेल. मग जिथे स्वातंत्र्य नाही तिथे स्वातंत्र्य दिन कसाही साजरा केला तर काय फरक पडतो. कोणतेही सोहळे साजरे केल्याने आमचा विकास होणार नाही. आमच्या विकासासाठी विचारातील सम्यक परिवर्तन आणि मी एक माणूस म्हणून माणसाशी कसे वागावे या भावनेने राहिलो तर आम्हाला काहिही अडचणी येणार नाहीत.

         तिकडे ज्या गुरुजीला आदर्श मानता तो गुरुजी राष्ट्रध्वज अमान्य करतो, मी राष्ट्रगीत सुद्धा म्हणणार नाही, राष्ट्रध्वज फडकविणार नाही असे जाहीर पने सांगतो, त्याचेच शिष्य तुम्ही सत्तेत असताना राष्ट्रध्वज प्रत्येकाच्या घरावर सन्मानाने फडकवण्याचा आदेश देता. एवढीच देशभक्ती रुजवायची आहे तर मग त्या तुमच्या गुरुजींच्या डोक्यात जरा घुसवा ना. मग सामान्य नागरिकांच्या मनाचा विचार करा.

         तसंही सामान्य नागरिकांच्या देशप्रेमाबद्दल बोलण्याची तुमची लायकीच नाही. देशातील प्रत्येक क्षेत्रात अयोग्य गोष्टी घडवून आणून देशाचं वाटोळं करण्यात गुंग असणारे तुम्ही, तुमची काय लायकी आहे सामान्य नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजवण्याची. एक किस्सा सर्वपरिचित आहे तो असा की, गांधिजीकडे एक महिला आपल्या मुलाला असलेली गूळ खाण्याची सवय सोडवण्यासाठी आल्यानंतर गांधीजींची वागणूक आणि दिलेला सल्ला. साधं व्यसन सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला त्याच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी आधी स्वतः निर्व्यसनी बनले. मग तुम्हाला नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजवयचीच आहे तर मग आधी स्वतः मध्ये देशभक्ती रुजली आहे का हे कधी पाहाल ?

          धर्म आणि जातीच्या नावावर तंटे निर्माण करणारे तुम्ही, शासकीय कामात गैरव्यवहार करून मलिदा जमा करणारे तुम्ही, तुमच्या त्याच चुकीच्या कामामुळे शेकडो आणि हजारो जीव गेले तरी तुम्हाला फरक नाही पडत मग तुम्हाला नागरिकांच्या मनात देशभक्ती रुजविण्याचा काय अधिकार ?

          अशा या सर्व चुकीच्या वागणुकीला फाटा देण्यासाठी प्रतीके पुढे करून देशभक्तीच ढोंग रचल्याने देश सर्वांगीण विकसित होणार नाही. मी जे करत आहे ते योग्य आहे. अधीच्यानी काहीच केलं नाही असा डांगोरा पिटून स्वतः किती चांगले आहोत हे सिद्ध करण्याचा सगळा आटापिटा का आणि कशासाठी ?

         प्रतिकांतील देशभक्ती पुढे येत असताना त्या प्रतीकांचा होत असलेला गैरवापर याबद्दल कोणीही काहीही चकार शब्द काढायला तयार नसतील तर त्या देशभक्तीचा हा तमाशा किती दिवस करणार ?

         मनात द्वेषभावना ठेवून, जीवित संपत्तीचा विचार न करता प्रतिकांद्वारे देशप्रेम दाखवून, आपण देशाचा कोणता विकास करू शकतो का ? याचा विचार व्हावा त्या विचारातून आजच्या दिवसाची सुरुवात करूयात व एकमेकांशी प्रेमाने वागून आपलं आयुष्य सुखकर व आनंदी बनवूयात. आपल्या सर्वांना या बंदीस्त स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐💐💐💐💐

@ जी.संदीप

9552803980

Friday, August 11, 2023

ती आणि तो....





 ती:- चल रे आपण देवाला जाऊयात

मी :- का बर तिकडे काय आहे ?

ती :- आहे काही तरी नाही सांगणारं तुला.

मी :- पण तरी काय गरज आहे तिकडे जायचो ?

ती :- देव आहे तो, त्याच्याकडे आपल्याला जावंच लागते ना ?

मी :- का ? नाही गेलं तर जमणार नाही का ?

ती :- नाही जमत, ते आहेत म्हणून तर आपण आहोत. 

मी :- ते कस ? आपण तर आपल्या आई वडिलांमुळे आहोत ना ? 

ती :- आपल्याला फक्त जन्म त्यांनी दिला पण देव नसते तर आपण जन्म घेऊ शकलो नसतो.

मी :- जन्म घेण्यासाठी देवाची गरज असेल तर मग आई वडिलांचं काय काम आहे. देवाने डायरेक्ट आपल्याला जन्म द्यायला पाहिजे ना.

ती :- बाकी काही बोलू नकोस, तुझ्या तोंडी लागण माझ्याने शक्य नाही. तू येणार आहेस का नाही तेवढं सांग ?

मी :- मी एकदा बोललेल तुला कळत नाही का ? तू हजार वेळा जरी विचारलीस तरी मी माझं मत बदलणार नाही.

ती :- येणार आहेस का नाही ?

मी :- नाही.

ती :- यामुळच तू सिंगल आहेस रे. तू मुलींच्या मनाची कदरच करत नाहीस.

मी :- यात मी काय चुकीचं बोललो बर, मला पटत नाही मी येत नाही.

ती :- तुला पटत नसल तरी काही वेळा मुलींच्या विचारांची कदर कर रे.

मी :- ज्या मुलींना माझे विचार पटत नाहीत त्या मुलींनी माझ्याशी संपर्क करूच नये ना. मी काय औतन देत नाही, किंवा मी स्वतः कधी मॅसेज करून म्हणत नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून.

ती :-

बाय ! बोलू नकोस मला. देवाला येणार असशील तरच कर मॅसेज

मी :-  काल्पनिक गोष्टी सोडून वास्तवाकडे जायचं असेल तरच बोल मला. नाहीतर कायमचा

बाय ! तर बाय !

ती :- सुधर रे जरा, किती म्हणून attitude रे तुझ्यात ?

मी :- काही चुकीचं बोललो का ? काही गैर बोललो का ? काही खोटं बोललो का ? माझी चूक तरी काय आहे ?

ती :- तू माझी कधीच स्तुती करत नाहीस, तू माझ्या आवडीच्या काही गोष्टी कधी कधी मुद्दाम करत नाहीस,  तू माझ्या विचारांना स्वीकारत नाहीस. तू तुला हवं तेच करतोस.

मी :- मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. बर झाल तू स्वतः हुन बाय म्हटलीस, मी जर तुझ्यापासून दूर झालो असतो तर माझ्या मनाला खूप पश्र्चाताप झाला असता. मी स्वतः ला माफ करू शकलो नसतो. तू बोललेल्या कोणत्याच आरोपावर मला काहीही बोलायचं नाही.

ती :- म्हणजे मी केलेले आरोप तुला मान्य आहेत ?

मी :- त्या प्रश्नाचं पण उत्तर देणं पण गरजेचं आहे असं वाटतं नाही. वेळ आल्यानंतर तुला माझ्याबद्दल कळेल. तोंडावर तुझी स्तुती करणारे योग्य का  मनातून काळजी करत तुला जपणारा योग्य ? 

*Thnx sorry ani bye*

Thursday, August 3, 2023

ती होईल सेट्टल तुला काय भेटल ?




आयुष्याच्या एका वळणावर,

एकटेपणा घालवायला तुझ्या आयुष्यात ती येईल

आनंदाने जायला लागतील दिवस तुझे 

वेळ आणि काळ सुद्धा लक्षात नाही राहील.


दिवसा गणीक दिवस जात राहतील,

महिने आणि कदाचित वर्ष सुद्धा निघून जातील,

आयुष्याची स्वप्ने रंगवत

दिवस रात्र निघून जात राहतील


दोघांच्याही मनामध्ये स्वप्नांची रीघ लागेल

परिस्थिती नुसार आणाभाका घेतल्या जातील.

तिच्यासाठी हवं तिथे हवा तसा बदल तू करत जाशील,

काहीच नसेल बाकी बदलण्यासारखे तर विनाकारण वाद घातला जाईल.


तू आता पहिल्यासारखा राहिला नाहीस रे, अस म्हणून 

वारंवार तू बदलल्याची जाणीव करून दिली जाईल.

तिच्यासाठीच तू बदलत गेलास पावलोपावली

पण तरीही त्या बदलण्याची तिला कदर नाही राहील.


तुझ्याकडून तिला हवी तशी साथ नाही मिळाली,

तर तुला दोष देणे तिचे सुरू होईल.

तुझ्यापासून नेहमीचे दूर होण्यासाठी

 विविध मार्गाचा विचार करणे डोक्यात सुरू राहील


दूर होण्यासाठीचे मार्ग शोधत असताना 

विविध मार्गांमध्ये एखादा मार्ग  अंमलात आणल्या जाईल

त्याची अंमलबजावणी करण्याआधी तशीच स्वप्ने पुन्हा रंगवणारा

अजून दुसरा कोणीतरी शोधला जाईल.


त्याच्यासोबत पुन्हा तीच स्वप्न त्याच गोष्टी

पुन्हा नव्याने रंगवल्या जातील.

तो तिच्यात गुंतत जाईल, ती त्याच्यात गुंतत जाईल

हे नवीन नाते सुद्धा  किती दिवस टीकेल हे फक्त तीच्याच मनात राहील. 


टिकले ते नाते तर कुटुंब किंवा अन्य कारणे देऊन

दूर होण्याची वेळ येऊन जाईल.

या सगळ्या गोष्टीत तिला तिचे कुटुंबीय

इज्जतीचा प्रश्नापायी चांगला मुलगा शोधून

तिच्या भविष्याची करतील सोय 


त्या परिस्थितीत ती स्वतः ला सामावून घेऊन

आनंदाने मार्गक्रमण करत जाईल.

तू तिच्या जुन्या आठवणीत रमून व्यसनाधीन होशील,

त्या व्यसनाधिनतेत स्वतःच भविष्य उध्वस्त करून टाकशील.


घरच्यांनी जो जोडीदार निवडला आहे

त्याच्यासोबत ती राहील आनंदाने

तुझ्या आधी आणि नंतर सोडले कैक तिने,

मग तिला फरक पडणार नाही कोणाच्याही विरहाने.


त्यामुळं मित्रा प्रेमाच्या फंदात पडण्याचा विचार

डोक्यात येण्याआधी स्वतःला भविष्यासाठी पात्र बनव.

येण्याचा प्रयत्न जरी केली कोणी आयुष्यात,

तिच्यासोबत भविष्याचा लेखी करार करण्याची हिम्मत ठेव.


भावनिक होऊन तू तिच्या प्रेमात वाहवत जाशील तर

तुला तुझ भविष्य घडवण्या वेळ मिळेल का ?

तीच भविष्य कस घडवायचं हे ठरवायला तिचा बाप आहे

पण तुझ्या भविष्याची डोर तुझ्याशिवाय दुसर कोणी नाही हे तुला कळेल का ?

- संदीप गोणारकर 

9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...