(हा लेख धर्माच्या भक्तीत तल्लीन असणाऱ्या पण तात्विक विचार करणाऱ्यांसाठी तात्विक विचार न करणाऱ्या मित्रांनी उगच वाद घालून स्वतः चा वेळ वाया घालवू नये.)
धर्माच्या नावावर विविध मुद्दे उपस्थित करून वाद निर्माण केला जात आहे. धर्म म्हणजे उत्तम आणि आनंदी माणूस म्हणून जगण्यासाठीची नियमावली अस मला वाटते.
उत्तम माणूस व्हायचं असेल तर कोणत्याही गोष्टीवरून वाद निर्माण व्हावा अशी परिस्थिती का निर्माण केली जात आहे. एकमेकांचा धर्म एकमेकांना योग्य वाटत असेल तर तुमचे धर्म माणसा-माणसात तेढ निर्माण करायला सांगतात का ? तुमचे धर्म असे माणसा-माणसात तेढ निर्माण करणारे असतील तर त्या धर्मांना आग लावा. माणूस म्हणून जगण्यासाठी पृथ्वीतलावरील प्रत्येक घटकावर प्रेम करन त्यांचं संगोपन आणि संवर्धन करणं हे आद्य कर्तव्य आहे.
एखाद्याने व्यक्तीने कोणाएकविरुद्धा चुकीचा व्यवहार केला असेल तर त्या व्यक्तीला लगेच त्याची चूक लक्षात आणून द्या. त्या एका व्यक्तीमूळ त्या धर्माला वेठीस धरणे योग्य नव्हे ना. हिंदू धर्म मुस्लिमांचा द्वेष करतो आणि मुस्लिम हिंदूंचा. असा द्वेष केल्याने साध्य काय होणार आहे ?
*दिवसभरातील 24 तासात धर्माला आणि तुमच्या आदर्श देवाला बाजूला ठेवून पहा. मग कळेल जगण्यासाठी धर्माची खरच आवश्यकता आहे का ?* जगण्यासाठी धर्माची आवश्यकता नसेल तर मग धर्मामुळ एवढे वाद का वाढवत आहात ?
धर्म तुमच्या पोटाची भूक भागवत नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. मग ते खाजगी काम करन असो अथवा शासकीय काम असो. मग ते काम तुम्ही प्रामाणिक पने करत असता का ? चार पैशासाठी लाचारी करून चुकीचे काम करत असाल ते ते काम करण्यासाठी तुमचा धर्म तुम्हाला परवानगी देतो का ? मग अशावेळी तुमचा धर्म धोक्यात आहे अस वाटत नाही का ?
ठराविक रंगाचा वापर कुठेतरी करण्यात आला म्हणून तुमचा धर्म धोक्यात येतो ? रंगाचा आणि धर्माचा संबंधच काय एवढंच तुम्हाला रंगाचा राग येतो तर मग भगवा रंग जोडून दुसरे रंग जिथे जिथे वापरला गेला असेल ती प्रत्येक गोष्ट टाळा. आहे का हिम्मत ? प्रत्येक गोष्ट भगव्या रंगातच असेल तरच स्वीकार करा. आणि भगवा रंग इतर कोणाला वापरूच देऊ नका, कारण त्याने तुमचा अपमान होईल ? या गोष्टीचा विचार केला तर असा प्रश्न पडतो की, तुमचा धर्म प्रतिकात आहे का ? तुमचा धर्म माणसाने माणसाशी कसे वागावे हे सांगत नाही का ? तुमचा धर्म प्रतिकांवरून वाद करायला शिकवतो का ? तुमचा धर्म तुम्हाला जातीवरून मतभेद करायला शिकवतो का ? तुमचा धर्म एखाद्याच्या राहणीमानावरून वाद करायला शिकवतो का ?
या सगळ्या गोष्टी करण्यास कोणताही धर्म सांगत नसेल अस मला वाटत. मग हे सगळ करायला सांगते कोण ? हे सगळ करायला सांगणारा त्या त्या धर्मातील विशिष्ट वर्ग आहे. ज्यात त्याला माणसा-माणसात मतभेद निर्माण करून इथे अशांतता असलेली पहायला आवडते. या अशंतातेतून मानवाच्या मुख्य गरजा बाजूला राहतात. शासन म्हणून जनतेसाठी जबाबदारीने करावी लागणारी कामे न करता धर्माची संकल्पना वापरून मुख्य मुद्द्यापासून आपलं लक्ष धर्माच्या मुद्द्यावर वळवून ठेवतात. या धर्माच्या नशेत स्वतःला एवढं गुरफटून ठेवतो की आपण करतोय ते योग्य का अयोग्य हा विचारच डोक्यात येत नाही.
लव्ह जिहाद ही संकल्पना हिंदू आणि मुस्लिम धर्मियातील प्रेमियुगलांसंदर्भात वापरली जाते. विशिष्ट जाती धर्मात जन्म घेणे हे काय तुमच्या माझ्या हातात असते का ? मग एखादा मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी एक मेकांच्या संपर्कात आले त्यांचा सहवास कित्येक वर्ष चालू राहिला ( कॉलेज किंवा काम करण्याचं क्षेत्र यापैकी काहीही कारण असू शकते) त्या संपर्कातून ते एकमेकांना हवे हवेसे वाटू लागले तर यात धर्माचा काय दोष ? माणूस माणसाला प्रिय होतो. निसर्गाने दिलेल्या शरीर रचनेनुसार वयानुरूप भिन्न लिंगी आकर्षण वाढत जाते. निसर्गाने दिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी तसा जोडीदार हवा असतो. तो जोडीदार निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला निसर्गाने दिला आहे. निसर्गाने दिलेल्या त्या अधिकारावर मानवाने बंधने लादली. या बंधनातून दोन भिन्नलिंगी एक मेकांना आवडत असतील आणि त्यांचा धर्म वेगळा आहे म्हणून त्याला विरोध करत असाल तर हे योग्य आहे का ?
श्रद्धा वालकर प्रकरण जर पाहिले तर त्यात त्या आफताबची गुन्हेगारी मानसिकता तयार होण्यात धर्माचा काय हात ? त्याला तसा अमानवी गुन्हा करण्याची वेळ का आली ? त्याला तो गुन्हा करण्यासाठीच जे धाडस प्राप्त झालं ते कुठून झालं ? त्याने तो गुन्हा करत असताना जी साधने वापरली ती साधने कुठून घेतली ? तो गुन्हा केल्यानंतर त्या देहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी त्याने काय काय माहिती मिळवली ? ती माहिती त्याला कुठून मिळाली ? गुन्हा घडल्यानंतर आपल्यावर काय कार्यवाही होईल याचा अंदाज घेऊन त्या कार्यवाहीस सामोरे कसे जायचे याबद्दलची तयारी त्याने कुठून केली ? या सगळ्या घटना घडामोडीत त्याच्या धर्माचा किती टक्के रोल आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कधी शोधून पाहाल का ?
प्रेम हे विविध दोन जाती किंवा धर्मामधील मुला मुलींमध्ये झाले तर ते आम्हाला का पचत नाही. ऑनर किलिंग च्या घटना का घडतात ? श्रद्धा च्या प्रकरणात जसा आवाज चढला तसाच आवाज अन्य प्रकरणात का नाही चढत ? युपी मध्ये अन्यायग्रस्त मुलीचा अंत्यविधी पोलीस स्वतः ते पण रात्री केला जातो. अशावेळी तुमचा आवाज का वाढत नाही ? मंदिरात बलात्कार होतो आणि आरोपी मोकाट फिरतो, अशावेळी तुमचा आवाज शांत का असतो ? खैरलांजी घडते, उन्नाव, हाथरस, कठूवा घडते ( या प्रकरणात अन्यायाचा कळस गाठलेला असतो) पण तरी तुमचा आवाज दबलेला असतो ? अरे तुम्हाला जर एक दिवसासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं तर तुम्ही काय हैदोस घालाल याचा अंदाज आहे ना तुम्हाला ? मग तो हैदोस घालण्यास कोणता धर्म सांगतो ? असा माणसा - माणसात भेद घालणारा धर्म असेल तर त्या धर्माची गुणवत्ता आणि उपयोगिता किती असेल हे यावरून सिद्ध होते. त्यामुळं कोणताही धर्म आचरण करायचा असेल तर तो धर्म इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये.
धर्माच्या अंधत्वाने तुमचा विकास होणार नाही. मनेवरील धर्माची जू बाजूला काढून ठेवून समान मानव म्हणून जगायचा प्रयत्न करुया एक मेकांसोबत राहून एक मेकांना विकास करण्यासाठी झगडूया काही जुन्या पारंपरिक कालबाह्य परंपरा नाहीशा करूया. शिक्षण, रोजगार, आरोग्य या सोबतच देशातील प्रत्येक नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी शासकीय आणि प्रशासकीय नोकर कसे राबवून घेता येतील. यासाठी प्रयत्न करुया. अन्यथा गुलाम आहात गुलामच रहा. धर्मा धर्मात वाद पेटवत रहा. शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी जसे सांगतील तेच करत रहा. देश गेला खड्ड्यात तरी चालेल देशातील नागरिक जिवंत नाही राहिले तरी चालेल. पण तुमचा धर्म तुम्ही जपून ठेवा. लख लाभ तुम्हाला तुमचा धर्म आणि तुमचं गुलामितील स्वातंत्र्य.
©जी.संदीप(गोणार,नांदेड)
9552803980
