भगवान के घर देर है अंधेर नही म्हणत
देवासाठीच न्यायालयाचा कामी लावलं
वास्तविक पुराव्यांच्या आधारे न्हवे
तर भावणीकतेच्या बळावर न्यायदान केलं.
कोट्यवधी रुपयांचा खर्च
आम्ही आमच्या अस्मितेच्या नावावर करतोय
पण आपल्याच धर्मातील बांधवांच्या
आयुष्याचा तमाशा पाहत बसतोय.
अस्मितेच्या नावाखाली आज
सुरुवात करतोय पुन्हा उभारण्या मंदिर
मानवाच्या विकासात्मक गरजेसाठी आम्ही
कधीतरी होऊ का खंबीर ?
गरज आहे आम्हाला आमच्यासाठी
सार्वकालिक होण्याची खंबीर
आमच्या अडचणीत पूर्णपणे
कांमी आली नाहीत कधीच ही मंदिर.
मंदिरासाठी करोडो रुपयांचा
करण्यात खर्च व्यर्थ आहे
देवाच्या नावाखाली आतमध्ये
दाटलेला सगळा स्वार्थ आहे.
सामान्य लोक देतात घाम गाळलेल्या
कष्टाच्या पैशातून दान
श्रीमंत देतात करोडोने दानपेटीत
चुकवण्या शासकीय कराचे दान.
दोन नंबरच्या कमाईची होऊ नये चौकशी
म्हणून लपवतात पैसा मंदिराच्या तिजोरीत
तुमच्या भावनेचा आणि भीतीचा बाजार मांडून बसलेत
हे कधी घुसणार का तुमच्या खोपडीत ?
मंदिर बांधण्या नाही विरोध माझा
खुशाल संस्कृती संवर्धनासाठी स्मारके तयार व्हावीत
पण कोट्यवधी जनता दुःखात असताना
पैशाची उधळपट्टी कशासाठी करावीत.
सामान्य माणसांच्या विकासानंतर
खुशाल स्मारकाचे निर्माण व्हावे
भविष्यात मानवी कल्याणाचे दर्शन घडण्या
मंदिरासोबत ऐक्याचेही स्मारके तयार व्हावीत.
असाल सुज्ञ तुम्ही तर
समजून घ्याल माझं म्हणणं
अन्यथा चालू राहतील त्यांचे धंदे
आणि एक-मेकांबद्दल डोक्यात द्वेष पेरण.
© जी.संदीप (गोणार,नांदेड)
9552803980
छान
ReplyDeleteThnx.....
DeleteBusty aahe waa🙏🙏👏👏👏👌👌
ReplyDeleteBhari
ReplyDeleteThnx....
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteपरखड कविता , आजच्या दिनाला आणि सरकारच्या धोरणाला जाब विचारणारी , वास्तविकता दर्शविणारी कविता , खूप छान लिहिलीत सर .....
ReplyDeleteThnx sir.....
DeleteWahh sir ,
ReplyDeleteYou made a vision of reality
Ok...
DeleteI will try.....
खूप छान सर अतिशय सुंदर लिखाण ....
ReplyDeleteThnx sir....
Delete