Tuesday, September 1, 2020

विचार बदलावा लागेल.

 



धर्म मंदिरासाठी लढण्यात

आम्ही आमचा वेळ घालवला

तिकडे शासनाने मात्र शिक्षणाचा

खेळखंडोबा करून टाकला


आताही ते आम्हाला 

धर्माचा अफू पाजवत राहतात

आम्ही लढतो आप-आपसात

ते खुशाल स्वार्थ साधून घेतात


धर्म देव-देवता संदर्भातील वादाला

देऊन कायमची मूठमाती

विकास करण्या प्रत्येक व्यक्तिचा

शासनाला आणावे लागेल वठणीवरती


कोणताही देव-धर्म येणार नाही

करण्या विकास आमचा

शासन प्रशासन आहे जबाबदार

अविकासास आम्हा सर्वांच्या


विचारून त्यांना जाब राबवूया

करून घेण्या विकास आपुला

हे शक्य होईल तेव्हाच

जेव्हा विचार बदलू आपण आपला.

(मंदिर हि संकल्पना प्रार्थना स्थळांसाठी वापरली आहे)

© जी.संदीप (गोणार,नांदेड)

      मो: ९५५२८०३९८०

1 comment:

  1. मंदिरापेक्षा शिक्षण फार महत्वाचे आहे.

    ReplyDelete

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...