Tuesday, May 12, 2020

हवाई सवारी ते भूकंबळीची रेल्वेरुळावरील सवारी (पूर्वार्ध)

हवाई सवारी ते भूकंबळीची रेल्वेरुळावरील सवारी (पूर्वार्ध)
                                        @ जी.संदीप(गोणार,नांदेड)
                                                  9552803980




      2019 च्या शेवटच्या दिवशी चीनमध्ये नवीन लक्षण असलेला रुग्ण आढळून येतो. त्यावर कोणतीही उपचार पद्धती काम करत नाही. तो कसा पसरतो याबद्दल सुद्धा पूर्णपणे माहिती नाही. 30 जानेवारीपासून हि आकडेवारी वाढतच जाते. भारतात या लक्षणांचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला सापडतो. 21 जानेवारी पासून who प्रतिदिन विविध देशातील आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध करत असते. तरीसुद्धा आमच्या देशात 24 फेब्रुवारीला जवळपास 60 लाखांच्या वर नागरिकांना एकत्रित करून मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. यातून आम्हाला त्याबद्दल काहीही गांभीर्य नाही असेच तर लक्षात आणून दिल नाही ना प्रधानमंत्री साहेबांनी. कोणतीही आपत्ती आली तर आम्ही सक्षम आहोत असं म्हणणारा प्रत्येक देश यापुढं हतबल झाला. याप्रसंगी भारत तर राजकारण व काही लोकांची खुशामत करण्यात गुंतला होता. तर काही नागरिक गौमूत्र हा यावरील उपाय असे सांगण्यात मश्गुल होते. काही ठिकाणी तर सार्वजनिक गौमूत्र प्राशन करण्याचे कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आले होते.
       विविध देशात कोरोनाचा प्रवास वाढत असताना प्रत्येकाला आपल्या घरी पोहचण्याची लगबग सुरु झाली. त्यातून विदेशातील भारतीयांना वापस आणण्याची प्रक्रिया सुरु केली. 12 मार्च ते 22 मार्च या दरम्यान 45000 पेक्षा जास्त नागरिकांना राज्यात वापस आणण्यात आले. त्या नंतर 01 एप्रिल रोजी या सर्वांची "हाय रिस्क ग्रुप" मध्ये नोंद करण्यात आले. प्रवासी 22 मार्च पर्यंत आप-आपल्या घरी पोहचतात. त्या दरम्यान 21 जानेवारीपासून who चे दैनिक अहवाल प्रसिद्ध करन चालूच असते. पण तरीही आमची केंद्रीय व्यवस्था शांतच. का ? जगातील या कोरोनाच्या संकटाची माहिती यांना मिळत न्हवती का ? देशातील who चे प्रतिनिधी काय करत होते ? 01 एप्रिल पासून राज्यात त्या हायरीस्कग्रुप वाल्यांची शोधाशोध सुरु होते. त्यांना क्वारंताईन करण्याचा विचार डोक्यात येतो. पण यापूर्वीच या देशात खासकरून राज्यात त्याच्याकडून कोरोनाच्या प्रवासाला सुरुवात झालेली असते.(देशातील पहिला रुग्ण त्यांच्यामुळं नाही सापडला पण त्यांच्यामुळं रुंगांची वाढ होण्यात वेगळा हातभर लागला.)
       देशात पहिला रुग्ण 30 जानेवारीला सापडला. 30 जाने-02 मार्च आकडा स्थिर होता पण आपला आकडा वाढत गेला हा 05 मार्च पासून
असं who चा रिपोर्ट सांगतो. तो फक्त रिपोर्ट आहे. रिपोर्ट तयार करत असताना देशातील चाचण्यांचा विचार who ने कधी केलाच नाही. मग जिथं चाचन्याच होत नाहीत तिथं आकडे कसे निदर्शनास येतील. 30 जानेवारीला पहिला रुग्ण आढळला तर मग त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कोणीही बाधित नसेल हे कशावरून ? त्यांची चाचणीच झाली नसेल तर रुग्ण वाढायचा प्रश्नच नाही. हा रोग संपर्क जन्य आहे हे माहित असताना. संपर्क टाळण्यासाठी केंद्राने लगेच काही उपाययोजना का केल्या नाहीत. 20 मार्च रोजी 195 वर आकडा पोहचतो. 22 मार्च ला जनता कर्फ्यु लागू होतो. सायंकाळी 05 वाजता रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना उद्देशून प्रधानमंत्री चिंतीत होतात.  पण कर्फ्यु चा विचार डोक्यात नसतो. दरम्यान मध्यप्रदेश मध्ये सत्तेचं राजकारण सुरूच असते. 23 मार्च रोजी  शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात. लगेच दुसऱ्या दिवशी बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना राज्यपाल सांगतात. 24 मार्च रोजी मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करतात आणि सायंकाळी देशाचे प्रधानमंत्री लाईव्ह येतात व देशाला संबोधित करून सांगतात की, 'उद्यापासून(25 मार्च) 21 दिवसांचा 25 मार्च ते 14 एप्रिल लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. आपण जिथे आहात तिथेच रहा. सुरक्षित रहा. घाबरून जाऊ नका. अफवांवर विश्वास ठेवू नका.'राजकारण समाधानपूर्वक व हवं तसं पार पाडल्यानंतर हे सोंग का ?
         देशातील कोणता घटक कुठे आहे. याच यांना काहीही देणं घेणं नाही. यांचे निर्णय हुकूमशाहासारखे उद्या म्हणजे उद्याच. नोटबंदी, gst, आणि हि टाळेबंदी. ठीक आहे निर्णय चांगला आहे. 100% सहमत आहोत आम्ही याच्याशी. पण यामुळे उदभवणारी जी स्थिती आहे त्याबद्दल आपलं काय नियोजन आहे. नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा असं म्हणतो की,' नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही त्यामुळं तिच्यामुळं होणाऱ्या परिणामाच नियोजन करणे शक्य झालं नाही. पण या नैसर्गिक अपत्तीमुळं तुम्ही जी कृत्रिम आपत्ती निर्माण केलीय त्याच काय नियोजन केलंय ? साधारणतः मागील 60 दिवसांपासून तुमचं नियोजन दिसून येतंय. 15 मार्च ला काही गर्दीचे ठिकाणे बंद करता आणि 22 मार्च ला टाळेबंदीची घोषणा करता. काय वाटते तुम्हाला 15 मार्च ते 25 मार्च दरम्यान वेळ दिला सर्वाना ? आप-आपल्या गावी जायला. असं जर असत तर प्रत्येक राज्यातील व्यवसाय ठप्प झाले असते. तेलंगणा राज्याने 12 मे रोजी बिहार कडे केलेली मागणी हे सांगून जाते. राज्यांतर्गत कामगार काम करण्यासाठी स्थलांतर केलेले आहेत. कोणत्याही राज्याची भिस्त स्वतःच्या कामगारांवर अवलंबून नाही. बिकानेर या एका शब्दाने लक्षात येत कि.महाराष्ट्र राज्यात चालणारी बेकरी ही कुठले नागरिक चालवतात. त्यामुळं आपण या प्रत्येकाना घरी पोहचण्याची संधी का दिली नाही ? असा सवाल सामान्य कामगार करतोय. जगभरातील नागरिकांना तुम्ही स्वखर्चाने देशात आणता आणि देशातील नागरिकांना आहे त्या स्थितीत राहण्यास सांगता. व्वा रे तुमचे देशप्रेम ? तुमचे देशातील प्रत्येक नागरिकांवर प्रेम आहे की, व्यवस्थेप्रमाणेच आहे. जो आपल्या कामाचा त्यालाच किंमत द्यायची अन्य लोकांचा काही संबंध नाही. ही लोकशाही आहे. तुम्हाला तुमच्या मर्जीने निर्णय घेता येत नाहीत पण एक हाती सत्ता आहे म्हणून हवे तसे निर्णय घेणे चुकीचं आहे. कारण तुमच्या या निर्णयाचे विपरीत परिणाम सुद्धा खूप घडत आहेत. 
        देशातील कोरोणाबाधितांचा आकडा लक्षात घेत लॉकडाऊन मध्ये वाढ केली, यातून सामान्य नागरिक बेचैन झाला. त्यांना मानसिक बळ मिळावं म्हणून गॅस सिलेंडर मोफत केलं, प्रत्येकी 05 kg तांदूळ मोफत, महिलेच्या खात्यावर 500 रुपये जमा करण्यात आले. त्याबद्दल आपले खूप-खूप धन्यवाद. तुमच्या या सहकार्याने ज्यांनी आपल्याकडे काही बचत करून ठेवली होती त्यांना मदत नक्कीच झाली. पण, ज्यांचे पूर्ण आयुष्य दिवसभराच्या कमाईवर चालते. बुद्धिपेक्षा शारीरिक कष्टाचा वापर जास्तीत जास्त करतात अशा लोकांचं काय ? देशात साधारणपणे 25-30 करोडलोक पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकत असतात. त्यांच्यापर्यंत तुमची हि मदत कशी पोहचणार त्यासाठी आपण काय नियोजन केलंय ? तुम्हाला आर्थिक साहाय्य देणारा विदेशातील नागरिक व देशातील कारखानदार, व्यवसायिक यांचीच जबाबदारी तुम्ही घ्याल का ? पहिल्या लॉकडाऊन दरम्यान जनता शांत होती. कारण विषय फक्त 21 दिवसांचा होता. जेव्हा 11 एप्रिल ला लाईव्ह येऊन तुम्ही सांगता कि,'3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे. दुसरा टप्पा संपण्यापूर्वीच गृहमंत्रालयामार्फत तिसरा टप्पा लागू करण्याची घोषणा करण्यात येते आता 17 मे पूर्वी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढल्याची घोषणा होणार ? लॉकडाऊन ज्या वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला कोणत्या राज्याच्या मुखमंत्र्याशी आपला संवाद झाला. त्यांच्या राज्यातील समस्या, परराज्यातील मजूर संख्या, त्यातून निर्माण होणारी स्थिती कशी हाताळायची याबद्दल काही मार्गदर्शन आपण केलं का ? लॉकडाऊन आपण वाढवतच नेताय ? हरकत नाही सध्या काहीही पर्याय नाही म्हणून तो पर्याय स्वीकारला योग्य पण नियोजनशून्य का ? लोकडाऊनमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतेय म्हणून आपण कंपन्या सुरु करण्यावर भर देताय. नुकतंच राज्यात 25000 कंपन्या सुरु करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा हा मोठा प्रश्न आहे. कंपनी व्यवस्थापन आपणास योग्य ती व्यवस्था दाखवेल पण हे नियोजन सदासर्वकाळ राहील याबद्दल सुद्धा प्रश्न निर्माण होत आहेत. हे मी सांगत नाही तर मानसिकता सांगतोय. आपण लॉकडाऊन ची सुरुवात कठोरपणे केली. पण तीच कठोरता आता नाही. त्यात शिथिलता आली आहे. कारण जनतेचं पॅनिक होणं हे असेलही. पण जनता ज्यामुळं पॅनिक झाली ती व्यवस्था निर्माण व्हायला कारणीभूत आपणच आहात ना. मग यावर व्यवस्थित नियोजन करावंच लागेल. मागील काही दिवसांपूर्वी एका केंद्रीय विभागाकडून स्टेटमेंट आलं होतं की,'आम्हाला कोरोनासह जगायाची तयारी करावी लागेल.' हे नागरिकांना सांगण्यापेक्षा आपण प्रत्येक नागरिकांची काळजी घेत हे करावं. हे काम करत असताना शासनाच्या ग्रामीण पातळीपर्यंत प्रतिनिधी आहेत. ते सर्व प्रतिनिधी या कामी लावावीत. अन्यथा पुन्हा तुमचे कोरोनासह जगण्याचं नियोजन सामान्यांच्या जीवावर बेतल्याविना राहणार नाही. लॉकडाऊन सुद्धा ज्यांचा त्याच्याशी संबंध न्हवता अशा सामान्यांच्याच जीवावर बेतला असं वाटतंय. कारण अपूर्ण नियोजनाअभावी हुकूमशाहीवृत्तीने लॉकडाऊन जाहीर तर केला. पण त्यामुळे उदभवणाऱ्या परिस्थितीचा कुठंच काहीही थांगपत्ता नाही. राज्यात नागरिकांचे प्रतिनिधी कशासाठी असतात. त्या प्रतिनिधींशी आपण असा कोणताही आपत्कालीन निर्णय लागू करत असताना चर्चा का करत नाही. अचानक उद्भवणाऱ्या स्तितीमुळं राज्य या स्थितीला कशी तोंड देतील, त्यांची आपत्कालीन व्यवस्था कशी आहे याबद्दल काहीही देणं-घेणं नाही ? व्वा ! रे देशाचे नेतृत्व ?
       लॉकडाऊन चा एक अनोखा फायदा मात्र जरूर झाला. निसर्गातील ओझोनचा पडलेलं छिद्र नाहीस झालं, नदीचे पाणी स्वच्छ झाले, पालक आपल्या पाल्यांसोबत वेळ घालवत आहेत. काही ठिकाणी नात्यात घट्ट वीण बांधली जात आहे. आपण कोण आहोत हे जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला आहे. काही जण छंद जोपासत आहेत. पण या सर्वांच प्रमाण तेवढं नाही जेवढं सामान्य घटकांवर याचा विपरीत परिणाम झाला. मानवी घटकानुसार लॉकडाऊन चा परिणाम हा दुसऱ्या भागात आपल्या समोर उद्या (13 मे) सायंकाळी 05 वाजता आपल्यासमोर मांडेल. उद्याच लाईव्ह सेशनमूळ टाईप करणं शक्य न झाल्यास परवा (14 मे) रोजी सकाळी 11 वाजता आपल्यासमोर नक्की मांडण्याचा प्रयत्न करेन..........

(आपली साथ राहील हि अपेक्षा.....)
क्रमशः....


ता.क. : अपेक्षा करूयात 08 वाजताच्या संवादात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

8 comments:

  1. प्रतिक्रिया व्यक्त करताना कृपया आपले नाव नोंदवावे.....

    ReplyDelete
  2. छान विश्लेषण आहे संदिप सर

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. खूप सखोल मांडणी..

    ReplyDelete

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...