Monday, June 1, 2020

आम्हाला मेड इन इंडिया हवंय ?



         " आम्हाला मेड इन इंडिया हवंय ? "

      #चीन मार्फत भारतात काही #कुरघोडी घडतात तेव्हा एकमताने बहुसंख्य नागरिकांचा एक सूर सोशल मीडियावर फिरायला लागतो. की चीनच्या वस्तूंची होळी करायची व भारतीय वस्तूंचा स्वीकार करायचा. तसंच काही वातावरण सध्या देशभर पसरलेलं आहे.
     जानेवारीत देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, त्यानंतर आपल्या चाचण्यांच प्रमाण कमी त्यामुळं त्यानंतर मार्च पर्यंत रुग्ण आढळले नाही. मार्च मध्ये रुग्ण संख्या वाढायला लागली, त्यातच हा व्हायरस चीनने प्रयोगशाळेत तयार केला अशी चर्चा सुरु झाली. मग काय चीन म्हटल्यावर तर आमची #आग भडकली व सुरु झाली आमची सोशल मीडियावर वरील #मोहीम
" #चिनी #वस्तू #नाकारा #स्वदेशीचा #स्वीकारकरा." हि मोहीम राबवणाऱ्यांना #वास्तवाचं काहीही भान नाही. राजकीय लोकांनी सांगितलं म्हणून निघाले हे #बोटाने टायपायला. 
        ज्या चीनच्या वस्तू नाकारायचे असं आपण म्हणतो त्या चीनचा आणि आपला व्यवहार कसा आहे हे थोडं पाहूया. देशातील सर्वात मोठा बाजार हा चीनने व्यापला आहे. त्याला #कारणीभूत कोण ? हे #सत्ताधारी. 2019 पर्यंतची चीन ची भारतातील #आयात व #निर्यातीचा आकडा देतो चीनच्या वस्तूंचा विरोध करणाऱ्यांनी तो खास करून लक्षात घ्यावा. 2019 ची चीनची भारतातील गुंतवणूक म्हणा किंवा आयात म्हणा ती आहे $ 74.72 billion (56,23,61,40,00,000 एवढे भारतीय रुपये) व त्याच वर्षीची निर्यात (म्हणजे भारताकडून चीनने खरेदी केली) $17.95 billion ( 13,51,23,11,25,000 भारतीय रुपये) जवळपास चार पट गुंतवणूक चीन भारतात करतो आणि तेही केंद्रशासनाच्या मदतीने.
        आपला मोबाईल चायना फ्री आहे का ? असा एक संदेश सध्या व्हायरल होतोय. त्यातून आपल्या #मोबाईल मध्ये चायना चे अँप आहेत का असतील तर ते डिलीट करावेत या साठी हि मोहीम राबवली जातेय असं समजत. पण ही मोहीम कोणी सुरु केली का केली याबद्दल काहीही कल्पना नाही. चीनच्या विरोधातील मुद्दा आहे तर करा सपोर्ट या भावनेनं तो संदेश पुढं पसरत जातोय. चीन च्या अँप ले विरोध करणाऱ्यांसाठी काही खास भारतीय अँप च्या आर्थिक गुंतवणूक दारांबद्दल खाली माहिती देत आहे. वाचून लक्षात घ्यावे.
           त्यासोबतच आपण ज्या #इंडियनकंपनीचा गवगवा करता त्यातील प्रमुख कंपन्यांमध्ये चीनमधील कंपन्यांचे शेयर्स आहेत.
त्यात,
01) पेटीएम-
               मुख्य कार्यालय: नोएडा
                संस्थापक।    :  विजय शेखर शर्मा
     चीन मार्फत गुंतवणूक : 625 मिलियन       
                                      डॉलर(alibaba)

02)हाईक-
               मुख्य कार्यालय : नवी दिल्ली
                संस्थापक       : कवीण भारती मित्तल
     चीन मार्फत गुंतवणूक   : 1.4 बिलियन डॉलर
                             
03) स्नॅपडील-
       मुख्य कार्यालय :  नवी दिल्ली
        संस्थापक       :  कुणाल बहाल,रोहित बन्सल         
 चीन मार्फत गुंतवणूक : 1.58 बिलियन डॉलर

04)ओला-
             मुख्य कार्यालय: बेंगलुर
              संस्थापक।    : भाविष अग्रवाल
     चीन मार्फत गुंतवणूक : 36.49%   
      (tangent & soft bank group)

05) मेकमाय ट्रिप ईबीबो
             मुख्य कार्यालय: गुरंगाव(हरियाणा)
              संस्थापक।    : दीप कालरा
     चीन मार्फत गुंतवणूक : दोन चिनी कम्पनी    
                                     मार्फत 91% गुंतवणूक.

            हि काही प्रमुख देशी कंपन्यांमधील चीनची गुंतवणूक. 
       हि झाली आकडेवारी पण चीन भारताला नेमकं काय विकते आणि काय घेऊन जाते त्त्यातील काही मुख्य वस्तूंची यादी पुढीलप्रमाणे: 
     भारताची आयात (म्हणजे चीनकडून घेतो) :  
* इलेक्ट्रॉनिक उपकरणे: billion 16 अब्ज
* मशीन्स, इंजिन, पंप: $9.8 अब्ज
* सेंद्रिय रसायने: .$6.3 अब्ज
* खतेः $ 2.7 अब्ज
* लोह आणि स्टील: $ 2.3 अब्ज
* प्लास्टिकः ics 1.7 अब्ज
* लोह किंवा स्टील उत्पादने: $ 1.4 अब्ज
* रत्ने, मौल्यवान धातू, नाणी: $ 1.3 अब्ज
* जहाजे, नौका: $ 1.3 अब्ज
* वैद्यकीय, तांत्रिक उपकरणे: billion १.२ अब्ज

भारताची निर्यात (चीनला देतो):

* कापूस: $ 3.2 अब्ज
* रत्ने, मौल्यवान धातू, नाणी: $ 2.5 अब्ज
* तांबे: $ 2.3 अब्ज
* ऑरेस, स्लॅग, राखः $ 1.3 अब्ज
* सेंद्रिय रसायने: $ 1.1 अब्ज
* मीठ, सल्फर, दगड, सिमेंटः $ 958.7 दशलक्ष
* मशीन्स, इंजिन, पंप: $ 639.7lmillion
* प्लास्टिकः $ 499.7 दशलक्ष
* इलेक्ट्रॉनिक उपकरणे: $ 440 दशलक्ष
* फोर्स्किन्स वगळता रॉ लपविला जातो: $ 432.7
                      (Source wikipedia

         आदी बाबी दिल्या आणि घेतल्या जातात.या सर्व बाबींचा विचार करता असे लक्षात येते की, आयात जास्त आणि निर्यात कमी आहे. भारत आणि चीन यांचा करार झाला आहे त्यानुसार हा व्यवहार चालू आहे. नियमित करारानुसार जर व्यवहार चालू असेल तर मग आपण कोणाचा विरोध करतोय ? देशात चिनी कम्पन्या आपले उत्पादन तयार करतात त्यावर made in india चा शिक्का असतो. मग हे उत्पादन स्वीकारणार का नाकारणार ? हा सर्व व्यवहार पाहून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे.
       आपण चिनी मालाचा विरोध करतो म्हणजे आपल्या व्यापाऱ्यांवर आपण संकट ओढवून घेतोय. देशात सीमेवरून माल #आयात झाला. त्याची #किंमत चीनला पोहचली. मग तो माल भारतात आल्यानंतर त्यामुळं होणारा नफा किंवा तोटा हा स्थानिक व्यापाऱ्यांना होणार. मग यात चीनचे काय नुकसान ? त्यामुळं स्थानिकांनी #चीनच्या वस्तू किंवा मालाला विरोध करण्या ऐवजी तो माल देशात येणार नाही. याबद्दल शासनावर #दबाव आणावा लागेल. तसं तुम्ही करणार नाही. कारण , राजकारणात आम्हाला इंटरेस्ट नाही म्हणून हात वर करणार. पण हे राजकारण नाही तर शासन आहे . या शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण हे सामान्यांचा अधिकार आहे. तो अधिकार संविधानाने आम्हा सर्वांना दिला आहे तरी सुद्धा आम्ही त्याचा वापर करत नाही. आणि #लढत बसतो #स्थानिक स्तरावर. देशात चीनचा कोण-कोणता माल येतो हे आपण काही प्रमाणात। पाहिलं. एक खास मुद्दा सांगायचा म्हणजे देशातील चीनकडे 0.2% निर्यात कमी झाली. कारण काय तर भारताकडून दर्जेदार माल येत नाही. घ्या आता आपण चीनला दर्जेदार माल देत नाही. म्हणजे देशात केंद्रशासनाच्या परवानगीने येणारा माल हा  दर्जेदार आहे असं चीनच शासन म्हणते. आणी आपण मिरवतो कि, "चीनच्या मालाची काही खात्री नसते." त्यांनी तर तुम्हाला चुना लावला आणि तुम्ही इकडे खुश. 
        एक फोटो या सोबत शेयर केलाय. ते उत्पादन तयार करणारी कंपनी चीनची पण ते उत्पादन तयार झालं भारतात मग हे उत्पादन आपण खरेदी करायचं का ? कारण तुम्हाला "made in india"पाहिजे ना म्हणून विचारलं? नेमकं काय स्वीकारायचं हे आता तुम्हीच ठरवा.
        देशात तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे. या तरुणाईला धर्म आणि जातीच्या नावावर लढायला भाग पडतोय इथला राजकारणी आणि विकासाला दूर लोटतोय. आधुनिक तंत्रज्ञान विदेशातून मागवतोय कच्चा माल त्यांना देतोय. पण जर भारतानेच कच्चा माल व  तरुणाई चा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य वापर करून घेतला तर देश बाजारपेठ का बनेल देश सुद्धा निर्यातदार होईल. याची जाणीव तुम्हा नागरिकांना होणं गरजेचं आहे. हे जेव्हा होईल तेव्हा शासन चिनी वस्तू नाकारेल व आपल्या निर्माण केलेल्या वस्तू निर्यात करेल. हे आपण करू शकतो. तेवढं मनुष्यबळ, आर्थिक रसद, आधुनिक तंत्रज्ञान, नवं-नव्या कल्पनांचा तरुण वर्ग देशात मुबलक प्रमाणात आहे. तरुणाईला दर्जेदार शिक्षण देऊन, धर्माच्या नावावर रस्त्यावर उतरवणे थांबले तर हे नक्कीच घडेल, पण असं जर घडलं तर येणाऱ्या काळात या राजकीय लोकांना कोण किंमत देईल ?
         या सर्व बाबींची जाण आजच्या तरुणाईने करून घ्यावी देव, धर्म किंवा जातीने आपला विकास होणार नाही. आपला विकास होण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची गरज आहे. ते शिक्षण शासनाने उपलब्ध करून द्यावे यासाठी झगडा. सोशल मीडियावर धर्म, जातीच्या नावाने भांडण करत बसण्यापेक्षा मूलभूत हक्कांच्या संदर्भात लढाई सुरू करा. सोशल मीडिया हा टाइमपास करण्यासोबतच तुमचे आयुष्य आनंदी करण्यास व देशाच्या विकासात हातभार लावण्यास मदत करतो. त्यामुळं घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीवर लगेच बिनडोक पणे प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य-अयोग्य बाबीचा विचार करून आपले पाऊल उचलावे. व घडत असलेल्या गोष्टीत जर शासनाचा सहभाग असेल त्याचा जाब शासनाला विचारावा व या विदेशी मालाची होळी करण्याचा धंदा थांबवावा. हि वेळच आपल्यावर येणार नाही याची खबरदारी घ्यावी. तेव्हाच तुम्हाला #मेडईनइंडिया भेटेल. #अन्यथा मेड ईन इंडिया हे एक #सोंग ठरेल.

©️ जी.संदीप (गोणार,नांदेड)
           9552803980

2 comments:

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...