खैरलांजीचा तो प्रसंग आठवता
येतात आजही अंगावर शहारे
प्राण्यासारखे तो प्रसंग प्रत्यक्ष
पाहण्यास तुम्हा लाज कशी वाटली नाही रे ?
पाहत होता शेकडोंचा समुदाय
हैवाण प्राण्यासारखा निर्बुद्धपणे
करत होते अत्याचार आणि हत्या
मानव असून सैतानाप्रमाणे
क्रूरपणे हत्या होत असतानाही
शेकडोंचा समुदाय षंढपणे पाहत राहतो
न्याय मिळण्याच सोडा इथे
जगण्याचा हक्कच हिरावून घेतल्या जातो.
अजून किती वर्षे जातीच्या
नावाखाली बळी घेत राहणार
पूर्ण कुटुंब संपले न्यायाच्या प्रतिक्षेतच
मग सांगा गुन्हेगारांना सजा कधी देणार.
त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी
वैगरे आम्हाला न्याय हवा नाही.
पुन्हा गुन्हेगार घडू नयेत यासाठी
कठोर शिक्षेशिवाय पर्याय नाही.
देहदंडाच्या शिक्षने न्याय इथे
त्यांना व आम्हा मिळणार नाही
ते जिवंत राहून जेव्हा भोगतील सजा
त्याविना अशी मानसिकता बदलणार नाही.
रास्ता रोको, निषेध, कॅडलं, अशा लढल्याने
तात्कालिक समाधान आम्हा मिळेल न्याय नाही.
न्यायाच्या प्रतिक्षेतच 14 वर्षच काय
कित्येक पिढ्या गेल्याविना राहणार नाही.
असेल माणुसकी जिवंत तर एकदा
प्रत्येकाने चढवला पाहिजे आवाज सजेसाठी
मग आम्हाला कशाला राहील गरज
प्रत्यक्ष उतरण्याची रस्त्यावर न्यायासाठी
©जी.संदीप (गोणार,नांदेड)
9552803980

No comments:
Post a Comment