मागील दोन दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपास काही जण विरोध करत आहेत. काल वर्तमानपत्रवरील संपाच्या विरोधातील बातम्या पण निदर्शनास आल्या आहेत. संपाला पाठिंबा नसाल देत तर नका देऊ पण विरोध कशासाठी ? तुम्ही काय तुमच्या खिशातून त्यांना पेन्शन देणार आहात का ? विरोध करणाऱ्यांचा विचार केला तर त्यात जास्तीत जास्त हे सत्ताधाऱ्यांचे समर्थकच आहेत असे निदर्शनास आले आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ येत असतील तर तसे झाले नाही पाहिजे यासाठी हा प्रयत्न. मागील सरकारच्या काळात एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनात काही मागण्या घेऊन आंदोलन करणारे आज सत्तेत आहेत. त्या मागण्या हे सत्ताधारी का लागू करत नाही ? त्या आंदोलनादरम्यान केलेला सगळा अट्टाहास हा कशासाठी होता ? एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी का सत्तेसाठी ? असा प्रश्न उपस्थित होतो. पण तरीही राजकीय नेत्यांचे समर्थक एखाद्या राजकीय नेत्याने जी भूमिका घेतली तीच समर्थन करत फिरतात. राजकीय नेते हे निवडून येईपर्यंत एका राजकीय पक्षाचे असतात. पण जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते त्यांच्या मतदार संघातील प्रत्येक मतदारांचे प्रतिनिधी असतात मग निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभा राहिलेला उमेदवार का असेना. ही बाजू समजून न घेता राजकीय नेत्यांचे तुम्ही समर्थन करत असाल तर मला वाटते की मलमुत्राचे पिवळे पाणी जर तुम्हाला मोसंबीचा ज्यूस म्हणून दिले तरी ते तुम्ही आनंदाने प्याल का काय असा प्रश्न पडतो ?
या आंदोलनाला विरोध करत असताना एक मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला तो म्हणजे यांना कोणतेही काम करण्यासाठी त्या फाईल वर वजन ठेवावे लागते मग कशाला हवी आहे पेन्शन. फाईल वर वजन ठेवावे लागते म्हणून पेन्शन देऊ नये असा विचार करणाऱ्या विचारसरणीची कीव येते. हे तर अस झालं गरज आहे मला मी कसही काम करून घेईल पण चुकीचं काम केलं म्हणून काम करणाऱ्यांना दोष देईल. पण फाईल वर वजन ठेवायला कोण तयार असतो ? तर ज्याला माहीत आहे की नियमानुसार आपल काम होणार नाही, मग ते काम होण्याची अपेक्षा करतो, त्या अपेक्षेतून स्वतः च त्या फाईल वर वजन ठेवतो. कालांतराने त्या वजनाची कर्मचाऱ्याला सवय होते आणि नवीन रुजू झालेला कर्मचारी सुद्धा त्या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनतो. जर एखादा कर्मचारी व्यवस्थेचा भाग बनत नसेल तर त्याला काय त्रास होतो हे तोच जाणतो. अशा परिस्थिती प्रत्येक कर्मचारी लाच घेणारा आहे अस समजून जर विरोध करत असाल तर कीव येते तुमची आणि तुमच्या बुद्धिमत्तेची. लाच घेतली जाते हे तुम्हाला माहीत आहे तर मग लाचलुचपत विभागातील कर्मचाऱ्यांना कामाला लावता येत नाही का तुम्हाला ? सत्ताधाऱ्यांचे तळवे चाटनाऱ्यानो स्वतःच्या डोक्यात मेंदू असेल आणि तुमचा आत्मसन्मान जागा असेल तर स्वतः ला काही प्रश्न विचारा. आयुष्यभर एका सरकारी क्षेत्रात काम कराल आणि रिटायरमेंट नंतर तुम्हाला दुसऱ्याच्या हाताकडे डोळे लावून रहावं लागतं असेल तर कस वाटेल ? रिटायरमेंट नंतर येणाऱ्या पैशात आयुष्यभरात काही पाहिलेली स्वप्न पूर्ण करावी लागत असतील (घर,गाडी,मुलांची काही स्वप्ने) त्यात तो पैसा खर्च होत असेल तर मग कर्मचाऱ्यांनी उतारवयात कोणाकडे पहायचं ? येणारी पिढी उतारवयात किती म्हणून साथ देईल हे कोणी शाश्वती देईल का ? चांगल्या संस्कारात वाढलेली एक मेकांचा आदर करावा माणुसकी जपावी या संस्कारात वाढलेली आजचीच पिढी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत आहेत. येणाऱ्या काळात काय होऊ शकेल याची शाश्वती तुम्हाला आहे काय ?
या सर्व गोष्टींचा विचार करून पेन्शन आंदोलनास होत असलेला विरोध हा चुकीचा वाटतो. लाच घेतल्या जाते, शासकीय कर्मचारी नियमानुसार काम करत नाहीत. या तक्रारींवर एकच उपाय आहे. जो कर्मचारी नियमानुसार काम करत नाही त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन देणे.शासकीय किंवा प्रशासकीय कर्मचारी हे नोकर आहेत त्यांना जनतेच्या सेवेसाठी तिथं पाठवलं आहे याची जाणीव निर्माण करून देऊन नागरिक म्हणून आपली भूमिका आपण पार पाडणे गरजेचे आहे. लाच देणारच नसाल तर कोणी लाच घेईलच कशाला ? देशातील कोणत्याही नागरिकाने माझ कोणतेही काम नियमाने होत असेल तरच करेल अन्यथा माझे काम नाही झाले तर मी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही. असा जर निर्णय घेतला तर कशाला कोणी भ्रष्टाचार करेल आणि कशाला कोणता शासकीय कर्मचारी व्यवस्थित काम करणे सोडेल. त्यामुळं या होत असलेल्या आंदोलनास विरोध करणे हा बालबुद्धीचा प्रकार वाटतो. या कर्मचाऱ्यांच्या संपामुळ नागरिकांना खूप त्रास होत आहे. तोच त्रास लक्षात घेऊन शासनाच्या विरोधात जनतेचा प्रक्षोभ झाला पाहिजे. शासकीय नोकरसोबतच अन्य क्षेत्रात काम करणारा प्रत्येक नागरिक हा पेन्शन चा हक्कदार आहे. देशातील प्रत्येक नागरिक आप आपल्या क्षेत्रात देशाच्या विकासात योगदान देत असतो. त्यामुळं उतारवयात सन्मानाने जगायचे असेल तर प्रत्येकाला याची जाणीव ठेवावीच लागेल.
#माझा_पेन्शन_आंदोलनास_पाठिंबा_आहे.

Khar ahe sir
ReplyDeleteखर आहे हो
ReplyDeleteसत्य परिस्थिती ची ओळख या लेखातून करून दिलात त्या बद्दल धन्यवाद.
Good
ReplyDelete