मित्रांनो,
जरा डोळस व्हा रे !
देव ही दुय्यम गरज आहे
जरा प्राथमिक गरज ओळखा रे.
अश्मयुगात समूहाने राहताना पोटाच्या भुकेनंतर
शारीरिक भुकेकडे लक्ष दिलं जायचं
अविकसित काळातील लोकांना समजलं
मग तुमच्या डोक्यात कधी यायचं ?
बुद्धिवान प्राणी म्हणून
विविध शोध लावत गेलो
कधी स्वतः वेडे ठरलो तर
कधी दुसऱ्यांना वेड्यात काढण्यास धन्य मानलो.
विविध शोध लागत असता
मनोरंजनावर येऊन ठेपलो
मानवी मनातील भीतीचा आधार घेत
देवाचा शोध लावून ठेवलो.
तो जर आहे तर,
जन्मावेळीच आपल्या मनात विचार टाकेल
त्याची आराधना करण्यासाठी
सगळे मार्ग आधीच सांगून टाकेल
मानवाने निर्मिलेल यंत्र सुद्धा
कमांड दिली तसेच काम करते
तशाच कमांड देवानेही आपल्यात दिल्या असत्या
हे तुम्हास का नाही उपजते ?
देव आहे हे मान्य करायचं
बिनधास्त करा ना रे !
त्या देवासाठी तुम्ही आप आपसात भांडता
हे तुमच्या देवाला तरी मान्य होईल का रे ?
देवाच्या नावावर तुम्हाला ईथ
एक मेकांत लढवल जात
ती लढाई चालू असताना
संविधानिक हक्क अधिकारापासून दूर ठेवलं जातं
हक्क अधिकारच मोल
तुम्हा कधीच समजू दिलं जात नाही
कारण, एखादी गोष्ट मिळत नसेल
तर रुजवलं जात की, "ते तुमच्या नशिबातच नाही."
त्या नशिबाचा निर्मिक(बनवणारा) देव असेल
तर तो देव चुकीचा आहे का ?
एखाद्याकडे गडगंज संपत्ती द्यावी आणि
दुसऱ्यास एकवेळच्या जेवणासाठी मोताज ठेवावं का ?
गडगंज संपत्तीवाला निडरपणे शेकडो चुका करतो
तरी त्याला त्याच्यावर देव कोपण्याची भीती नसते
पण सामान्य गरीब माणूस रस्त्यावरून चालताना
मुंगीवर पाय पडत असताना हजार वेळा विचार करतो.
शुद्ध निर्मळ अशा गरीब मनावर
देव तुमचा कोपतो का रे ?
गरिबांना तासो-न-तास रांगेत उभा करतो
आणि श्रीमंतांना सेकंदात दर्शन देतो असे का रे ?
अशा तुमच्या एका देवाच
भल मोठ मंदिर उभारल्या जातंय
ते मंदिर पूर्ण होण्याआधीच तिथं
म्हणे त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जातेय
तिथे त्या देवाचा मोठेपणा करायचाय
का ? राजकारण्यांना मते मागायचीत ?
कारण ! प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर सुद्धा
कामाच्या कारणास्तव देव दर्शन बंद राहील
राजकारण्यांचाच जर असेल हा डाव
तर तुमच्या भावनेशी खेळणाऱ्यांना करून टाका पायचित
किती म्हणून त्या राजकारण्यांची बाजू घेत
तुमच्या विकासाचे मार्ग बंद करून घेणार
धर्माच्या नावावर तुमचा वापर करून घेऊन
ते तुमच्या पिढ्यांच वाटोळ करून टाकणार.
हेच बघा ना, तुम्ही आरक्षणासाठी लढत असताना
कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढून ते मोकळे झाले.
आरक्षण जरी तुम्हा दिले तर हे लक्षात घ्या
त्याच्या अंमलबजावणीचे सगळे रस्ते बंद केले.
त्यामुळं धर्माच्या नावावर होत असलेलं तांडव
थांबवण्यासाठी त्यांना विरोध करा रे
अन्यथा पुन्हा परकियांची
गुलामी स्विकाराया तयार व्हा रे.
त्यावेळी तुम्ही पुजलेला
कोणताही देव धावून येणार नाही
हे इतिहासावरून सिद्ध होतंय
मी मनाच काहीही सांगत नाही
इतिहासावर नजर टाकाल तर
मानवी क्रांत्याच निदर्शनास येतील
कोणत्याही देवाने तुमची सुटका केली नाही
याची पावलोपावली दाखले दिसतील
देव मानायचा का न मानायचा
हे तुमचं स्वातंत्र्य अवडीने जपा
देवाच्या नावावरील गोष्टीत स्वतःला किती गुंतवायच
हे ठरवण्यासाठी मात्र सदैव स्वतःचा मेंदू वापरा.
©जी.संदीप (गोणार,नांदेड.)
9552803980
%20(5).jpeg)
No comments:
Post a Comment