माझ मला दुकान सुरू करून,
माझ्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवायचा आहे.
माझा मला दबाव गट निर्माण करून,
माझी ताकद मला वाढवायची आहे.
समाजाच्या नावाने राजकारणात आणि प्रशासनात,
माझ्याबद्दल भीती निर्माण करायची आहे.
माझं कोणतेही काम नावावरून झालं पाहिजे
बाकी समाजाचं आणि माझं देणं घेणं काय आहे ?
समाजाच्याच नावावर मी येईल पुढं,
पण समाजाचं मला काही तेवढं देणं घेणं नाय,
ज्या समजाला बाबासाहेबांनी सगळ काही दिलेलं असताना,
त्यांच्यासाठी लढण्यात आता काही अर्थ उरला नाय.
तरुण मुलं मुली भरकटलीत रिल्स आणि प्रेमाच्या मागे
बेरोजगार धावतोय आपल्या नशिबाच्या मागे
मग आम्ही तरी कोणासाठी एक व्हायचं
ते पण नेमकं कोणाच्या मागे ?
आम्हाला आमचे दुकान थाटू द्या,
चार पैशासाठी बड्या राजकारण्यांची गुलामी करू द्या.
तुम्हाला जरी वाटत असल आम्ही त्यांची गुलामी करत आहोत,
तरी तुम्हाला बिनधास्त काहीही वाटू द्या.
कारण आमच्या आयुष्यात जे सुख येतंय,
त्या पुढं त्या गुलामीला विसरून जाऊ द्या.
अन्याय अत्याचार घडले समाजातील कोणावर,
तर तिथं पुढं पुढं आम्हालाच राहू द्या.
अन्याय झालेल्या कुटुंबाची सहानुभूती,
आम्हाला जास्तीत जास्त कमवू द्या.
त्या कुटुंबाचं नंतर काय होईल,
त्यांचं पुनर्वसन आणि अन्य सर्व खड्ड्यात जाऊ द्या.
आम्ही त्याच सांत्वन करायला समोर होतो,
याच क्रेडिट आमच्या नावावर आम्हाला जमा करू द्या.
आमचा ठराविक असा उत्पन्नाचा स्त्रोत नसताना,
व्यवसाय क्षेत्रात आम्हाला जम बसवू द्या.
त्याच आलेल्या पैशातून चार पैसे पीडितांना देऊन,
समाजासाठी काम केल्याचा मान आम्हाला घेऊ द्या.
एकत्रित येण्यात काही नाही पडलंय,
एकत्रित येऊन कोणीतरी एखादाच मोठा होणार हे तुम्हाला नाही कळणार.
त्या पेक्षा असे विभागून राहिलेलं किती बरे आहोत हे आम्हीच जाणतो,
सगळे दलाली करून प्रत्येक दिवशी समाजाला विकूनच मोठे होणार.
त्यामुळं समाजावर अन्याय होत राहू द्या,
आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत,
तुम्हाला हवी असेल जरा आर्थिक मदत
ती आमच्या पध्दतीने आम्ही करायला तयार आहोत.
एकतेच्या नावाने एकत्रित येऊन बैठका घेऊ सदैव
पण एक होण्याचं स्वप्न पाहू नका तुम्ही कधीही,
एक होण्याचं नियोजन होऊ देणार नाही आम्ही,
अस सदैव घडतंच आल आहे या आधीही.
तुम्ही भोगत रहा अन्याय अत्याचार,
आम्ही आवाज उठवायला रस्त्यावर येऊ.
तुम्हाला न्याय मिळो अथवा ना मिळो,
आम्ही मात्र आमची पोळी शेकून घेत राहू.
एवढीच आमच्या विभागून राहण्याची चीड तुम्हाला येते तर,
कोणत्याही कार्यक्रमात बोलवून का आमचा मोठेपणा करता ?
आमच्या येण्याने मोठेपणा भेटतो अस समजून,
तुम्ही तुमचीच इज्जत चव्हाट्यावर आणता.
काही दिवसांसाठी आम्हाला डोक्यावर घेणं सोडून द्या,
कोणत्याही कार्यक्रमात बोलवन सोडून द्या,
असेल हिम्मत तर आम्ही आवाज दिल्यानंतर,
तुम्ही लगेच धावत येणं सोडून द्या.
मग बघा कस आम्ही एक व्हायला सुरुवात करू,
समाजासाठी प्रामाणिक पणे लढायला सुरुवात करू,
बाबासाहेबांनी जो रथ आणला आहे समाजाचा,
त्याला योग्य ठिकाणी पोहचवून त्याचा प्रवास संपवून टाकू.
पण तुम्हाला ते जमायचं नाही
कारण आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा हे मनी ठसवल आहे तुम्ही,
मनात भीती निर्माण झालीय तुमच्या की,
आम्हाला मोठेपणा नाही दिलं तर तुम्हाला सुद्धा विचारेल का कोणी ?
पण आमच्या वीणा तुमचं काही म्हणजे काहीच आडत नाही,
तरी तुमचा स्वभाव काही बदलत नाही.
गटागटाने आमच्या पाठीशी उभे राहणे तुम्ही काही सोडत नाही,
तरी लाजा वाटतात का नालयाकांनो तुम्हाला,
अस म्हणायला की आमच्या समाजात एकीच नाही.
आमच्या समाजात एकीच नाही.
© जी.संदीप ( गोणार, नांदेड.)





