विचारांचे हल्ले रोखून दाखवा
प्रतिकांवर हल्ले काय चढवताय
धमक असेल तुमच्यात तर
विचारांचे हल्ले रोखून दाखवा
आम्हीही मानू विजयाचे शिलेदार तुम्हाला
आमच्यासोबत खरी लढाई लढून तर दाखवा.
ऐपत नाही तुमची
विचारांच्या लढाईची
म्हणून नौटंकी करताय
असल्या भ्याड हल्ल्याची ?
तुमच्या असल्या हल्ल्याने होईल आमचे
आणि काही प्रमाणात वास्तुचें नुकसान
पण बुद्ध विचारांशिवाय
मानव जात होईल सुनसान
बुद्ध विचार पेरणारा आंबेडकर
का सलतोय तुमच्या मनात ?
त्याने तुमच्या व्यवस्थेला हादरा दिला
हीच तर खंत नाही ना तुम्हा जणांत.
ती खंत तुम्ही निरर्थक पणे
मनात बाळगत बसू नका.
त्यांनी दिलेला मार्ग हा एकतेचा व
समानतेचा आहे हे जगाला सुद्धा सांगायला विसरू नका.
देशाचे प्रधानसेवक सुद्धा विविध
राष्ट्राध्यक्षांना देतात बुद्ध मूर्तीच भेट.
मग तुम्हीच ठरवा ईतर दैवतांपेक्षा
बुद्ध ठरलेत का नाही ग्रेट.
एवढी ताकद त्या विचारात आहे
म्हणून करू लागलेत काहीजण विरोध
आणि घडवून आणत आहेत
हल्ले मानवावर आणि प्रतिकांवर सुद्धा
पण हल्लेखोरांनो एक लक्षात घ्या
ती तुमची बुद्धी नाही आणि मानसिकता सुद्धा.
म्हणून हल्लेखोरांनो एखाद्याच्या दावणीला बांधून असे भ्याड कामे करू नका.
योग्य आयोग्याची जाणीव करून घेऊन.
सम्यक विचारांना समजून घेऊन एकोप्याने राहण्याचा निर्णय सोडू नका.
कोरोनांने माणसात माणुसकी
आल्याचं सोंग मिरवत बसू नका
माणूस कालही द्वेषयुक्त होता
आजही आहे आणि उद्याही राहील
त्यातून वाचायला कोरोना तर नाहीच
पण बुद्धशिवाय दुसरं काही आहे असं सांगू नका.
सुधारणेच सोंग घेणं
असत खूप सोपं
जेव्हा येते स्वतःवर वेळ
तेव्हा होते खूप दुःख मोठं.
या प्रतिकांवरच्या हल्ल्याने
बाबासाहेब संपणार नाही
तो एक असा घटक आहे
इथल्या प्रत्येकाच्या रक्तात
तो सापडल्याशिवाय राहत नाही.
त्यामुळं आंबेडकराला
संपवण्याचे
स्वप्न तुम्ही सोडून द्या.
तुम्हीही तसा विचार अंगिकारा आणि
स्वतःच्या चौरंगी विकास करून घ्या.
© जी.संदीप(गोणार,नांदेड.)
9552803980
Right Sandeep
ReplyDeleteखूप छान
ReplyDeletegreat....
ReplyDelete