कोण म्हटलं जन्म एकदाच भेटतो
जन्म रोज होत असतो
पण मृत्यू मात्र आयुष्यात
एकदाच भेटत असतो
रोज भेटत असलेल्या
नव्या जन्माचा वापर करत रहा
एकदा मिळणाऱ्या मृत्यूला
कवटाळण्या पासून दूर रहा
मृत्यूला कवटाळने म्हणजे
जगणं सोडून देणे होय
आयुष्यात भेटणाऱ्या अनुभवाला
कायमचे दूर करणे होय
आयुष्यात दुःख आले तरी
अनुभव त्याचे घेत चला
आयुष्य हे अनुभवांनी समृद्ध बनवणे
हीच खरी जीवन जगण्याची कला
दुःख मिळाले म्हणजे
कसे वागायचे नाही हे कळते
चुका करतच राहिलो तर
नियमित दुःख मिळतच राहते
कधी इतरांच्या चुकांमुळं सुद्धा
आयुष्यात दुःख मिळत असते
सोडून देऊन तो दिवस,विषय,काळ
आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करायचे असते.
क्षणिक निर्णयाने तुम्ही
आयुष्य गमावू नका
तो क्षण कायमचा नव्हे आयुष्यातील
हे समजून घेऊन जगणं सोडू नका.
सोडाल जगणं तुम्ही तर
दुःखी होतील काही काळ आप्तेष्ट
पण तुमच्या जाण्याने
तुमचे आयुष्य कायमचे होईल नष्ट
आयुष्य नष्ट झाले तर दुःख
त्रासातून व्हाल नक्कीच मुक्त
पण आयुष्य हे जगायचे असते काही कामांसाठी खास
नव्हे वैयक्तिक आयुष्यासाठी फक्त
स्वतःसोबत इतरांसाठी जगत असताना
जगण्याचा आनंद येत राहील
त्यातून दुःख व वाईट अनुभवांचा
वियोग होऊन जाईल.
© जी.संदीप(गोणार,नांदेड)
९५५२८०३९८०


