Tuesday, February 7, 2023

डॉ.बाबासाहेब स्वाधार योजना 2023-24, नांदेड.





शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून स्वधार फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरून त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह समाजकल्याण कार्यालय येथे निर्धारित तारखेपर्यंत सबमिट करावे लागणार आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करून उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिसणाऱ्या ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर तयार झालेल्या आयडी पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन करून पुढील प्रक्रिया करावी. 


 त्यासाठी आवश्यक असलेली विद्यार्थी माहिती

१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:

२. वडिलांचे संपूर्ण नाव :

३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :

४. आधार कार्ड क्र. :

५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :

६. अर्जदाराचे वय :

७. अर्जदाराचे लिंग :

८. आईचे संपूर्ण नाव :

९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :

१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र

११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :

१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :

१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :

१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :

१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )

१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:

१७. अभ्यासक्रम :

१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :

१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :

२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):

२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:

२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.

• प्रवेश वर्ष / दिनांक

• उत्तीर्ण महिना / वर्ष

• प्राप्त गुण

• एकूण गुण

याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.

बँकेची माहिती

• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव

• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :

• शाखा

• खातेक्रमांक

• IFSC code

अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे

१ अर्जदाराचा फोटो

२ अर्जदाराची सही

३ जातीचा दाखला

४ आधार कार्डाची प्रत

५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.

६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र

७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.

८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :

९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :

१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .

११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :

१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :

१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला

१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :

१५ शपथपत्र / हमीपत्र :

१६ भाडे करारनामा :

वेबसाईट :- syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx


शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी दिनांक

10 फेब्रुवारी ते 04 मार्च 2023. पर्यंत समाजकल्याण कार्यालय नांदेड येथे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जमा करावे.








Sunday, December 18, 2022

राजकारण रंगाचे.

(हा लेख धर्माच्या भक्तीत तल्लीन असणाऱ्या पण तात्विक विचार करणाऱ्यांसाठी तात्विक विचार न करणाऱ्या मित्रांनी उगच वाद घालून स्वतः चा वेळ वाया घालवू नये.)


धर्माच्या नावावर विविध मुद्दे उपस्थित करून वाद निर्माण केला जात आहे. धर्म म्हणजे उत्तम आणि आनंदी माणूस म्हणून जगण्यासाठीची नियमावली अस मला वाटते.

        उत्तम माणूस व्हायचं असेल तर कोणत्याही गोष्टीवरून वाद निर्माण व्हावा अशी परिस्थिती का निर्माण केली जात आहे. एकमेकांचा धर्म एकमेकांना योग्य वाटत असेल तर तुमचे धर्म माणसा-माणसात तेढ निर्माण करायला सांगतात का ? तुमचे धर्म असे माणसा-माणसात तेढ निर्माण करणारे असतील तर त्या धर्मांना आग लावा. माणूस म्हणून जगण्यासाठी पृथ्वीतलावरील प्रत्येक घटकावर प्रेम करन त्यांचं संगोपन आणि संवर्धन करणं हे आद्य कर्तव्य आहे.

        एखाद्याने व्यक्तीने कोणाएकविरुद्धा चुकीचा व्यवहार केला असेल तर त्या व्यक्तीला लगेच त्याची चूक लक्षात आणून द्या. त्या एका व्यक्तीमूळ त्या धर्माला वेठीस धरणे योग्य नव्हे ना. हिंदू धर्म मुस्लिमांचा द्वेष करतो आणि मुस्लिम हिंदूंचा. असा द्वेष केल्याने साध्य काय होणार आहे ?

       *दिवसभरातील 24 तासात धर्माला आणि तुमच्या आदर्श देवाला बाजूला ठेवून पहा. मग कळेल जगण्यासाठी धर्माची खरच आवश्यकता आहे का ?* जगण्यासाठी धर्माची आवश्यकता नसेल तर मग धर्मामुळ एवढे वाद का वाढवत आहात ?

        धर्म तुमच्या पोटाची भूक भागवत नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. मग ते खाजगी काम करन असो अथवा शासकीय काम असो. मग ते काम तुम्ही प्रामाणिक पने करत असता का ? चार पैशासाठी लाचारी करून चुकीचे काम करत असाल ते ते काम करण्यासाठी तुमचा धर्म तुम्हाला परवानगी देतो का ? मग अशावेळी तुमचा धर्म धोक्यात आहे अस वाटत नाही का ? 

        ठराविक रंगाचा वापर कुठेतरी करण्यात आला म्हणून तुमचा धर्म धोक्यात येतो ? रंगाचा आणि धर्माचा संबंधच काय एवढंच तुम्हाला रंगाचा राग येतो तर मग भगवा रंग जोडून दुसरे रंग जिथे जिथे वापरला गेला असेल ती प्रत्येक गोष्ट टाळा. आहे का हिम्मत ? प्रत्येक गोष्ट भगव्या रंगातच असेल तरच स्वीकार करा.  आणि भगवा रंग इतर कोणाला वापरूच देऊ नका, कारण त्याने तुमचा अपमान होईल ? या गोष्टीचा विचार केला तर असा प्रश्न पडतो की, तुमचा धर्म प्रतिकात आहे का ? तुमचा धर्म माणसाने माणसाशी कसे वागावे हे सांगत नाही का ? तुमचा धर्म प्रतिकांवरून वाद करायला शिकवतो का ? तुमचा धर्म तुम्हाला जातीवरून मतभेद करायला शिकवतो का ? तुमचा धर्म एखाद्याच्या राहणीमानावरून वाद करायला शिकवतो का ?

       या सगळ्या गोष्टी करण्यास कोणताही धर्म सांगत नसेल अस मला वाटत. मग हे सगळ करायला सांगते कोण ? हे सगळ करायला सांगणारा त्या त्या धर्मातील विशिष्ट वर्ग आहे. ज्यात त्याला माणसा-माणसात मतभेद निर्माण करून इथे अशांतता असलेली पहायला आवडते. या अशंतातेतून  मानवाच्या मुख्य गरजा बाजूला राहतात. शासन म्हणून जनतेसाठी जबाबदारीने करावी लागणारी कामे न करता धर्माची संकल्पना वापरून मुख्य मुद्द्यापासून आपलं लक्ष धर्माच्या मुद्द्यावर वळवून ठेवतात. या धर्माच्या नशेत स्वतःला एवढं गुरफटून ठेवतो की आपण करतोय ते योग्य का अयोग्य हा विचारच डोक्यात येत नाही.

        लव्ह जिहाद ही संकल्पना हिंदू आणि मुस्लिम धर्मियातील प्रेमियुगलांसंदर्भात वापरली जाते. विशिष्ट जाती धर्मात जन्म घेणे हे काय तुमच्या माझ्या हातात असते का ? मग एखादा मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी एक मेकांच्या संपर्कात आले त्यांचा सहवास कित्येक वर्ष चालू राहिला ( कॉलेज किंवा काम करण्याचं क्षेत्र यापैकी काहीही कारण असू शकते) त्या संपर्कातून ते एकमेकांना हवे हवेसे वाटू लागले तर यात धर्माचा काय दोष ? माणूस माणसाला प्रिय होतो. निसर्गाने दिलेल्या शरीर रचनेनुसार वयानुरूप भिन्न लिंगी आकर्षण वाढत जाते. निसर्गाने दिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी तसा जोडीदार हवा असतो. तो जोडीदार निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला निसर्गाने दिला आहे. निसर्गाने दिलेल्या त्या अधिकारावर मानवाने बंधने लादली. या बंधनातून दोन भिन्नलिंगी एक मेकांना आवडत असतील आणि त्यांचा धर्म वेगळा आहे म्हणून त्याला विरोध करत असाल तर हे योग्य आहे का ?

           श्रद्धा वालकर प्रकरण जर पाहिले तर त्यात त्या आफताबची गुन्हेगारी मानसिकता तयार होण्यात धर्माचा काय हात ? त्याला तसा अमानवी गुन्हा करण्याची वेळ का आली ? त्याला तो गुन्हा करण्यासाठीच जे धाडस प्राप्त झालं ते कुठून झालं ? त्याने तो गुन्हा करत असताना जी साधने वापरली ती साधने कुठून घेतली ? तो गुन्हा केल्यानंतर त्या देहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी त्याने काय काय माहिती मिळवली ? ती माहिती त्याला कुठून मिळाली ? गुन्हा घडल्यानंतर आपल्यावर काय कार्यवाही होईल याचा अंदाज घेऊन त्या कार्यवाहीस सामोरे कसे जायचे याबद्दलची तयारी त्याने कुठून केली ? या सगळ्या घटना घडामोडीत त्याच्या धर्माचा किती टक्के रोल आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कधी शोधून पाहाल का ?

         प्रेम हे विविध दोन जाती किंवा धर्मामधील मुला मुलींमध्ये झाले तर ते आम्हाला का पचत नाही. ऑनर किलिंग च्या घटना का घडतात ? श्रद्धा च्या प्रकरणात जसा आवाज चढला तसाच आवाज अन्य प्रकरणात का नाही चढत ? युपी मध्ये अन्यायग्रस्त मुलीचा अंत्यविधी पोलीस स्वतः ते पण रात्री केला जातो. अशावेळी तुमचा आवाज का वाढत नाही ? मंदिरात बलात्कार होतो आणि आरोपी मोकाट फिरतो, अशावेळी तुमचा आवाज शांत का असतो ? खैरलांजी घडते, उन्नाव, हाथरस, कठूवा घडते ( या प्रकरणात अन्यायाचा कळस गाठलेला असतो) पण तरी तुमचा आवाज दबलेला असतो ? अरे तुम्हाला जर एक दिवसासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं तर तुम्ही काय हैदोस घालाल याचा अंदाज आहे ना तुम्हाला ? मग तो हैदोस घालण्यास कोणता धर्म सांगतो ? असा माणसा - माणसात भेद घालणारा धर्म असेल तर त्या धर्माची गुणवत्ता आणि उपयोगिता किती असेल हे यावरून सिद्ध होते. त्यामुळं कोणताही धर्म आचरण करायचा असेल तर तो धर्म इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये.

         धर्माच्या अंधत्वाने तुमचा विकास होणार नाही. मनेवरील धर्माची जू बाजूला काढून ठेवून समान मानव म्हणून जगायचा प्रयत्न करुया एक मेकांसोबत राहून एक मेकांना विकास करण्यासाठी झगडूया काही जुन्या पारंपरिक कालबाह्य परंपरा नाहीशा करूया. शिक्षण, रोजगार, आरोग्य या सोबतच देशातील प्रत्येक नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी शासकीय आणि प्रशासकीय नोकर कसे राबवून घेता येतील. यासाठी प्रयत्न करुया. अन्यथा गुलाम आहात गुलामच रहा. धर्मा धर्मात वाद पेटवत रहा. शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी जसे सांगतील तेच करत रहा. देश गेला खड्ड्यात तरी चालेल देशातील नागरिक जिवंत नाही राहिले तरी चालेल. पण तुमचा धर्म तुम्ही जपून ठेवा. लख लाभ तुम्हाला तुमचा धर्म आणि तुमचं गुलामितील स्वातंत्र्य.

©जी.संदीप(गोणार,नांदेड)

      9552803980

Thursday, December 1, 2022

हे राजीनामा सत्र चालूच राहील....

 





          लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभअसलेल्या पत्रकारितेत एका चॅनल च नाव जनसामान्य हक्काने घेत होते. त्यातील एक आवाज होता रविश कुमार जो सत्ताधाऱ्यांच्या नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारत होता ? वास्तव काय ते नागरिकांच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न करत होता. हाच आवाज सत्ताधाऱ्यांना बंद करायचा होता. पण तो बंद करणार कसा ? त्याला विकत तर घेऊ शकत नाही जस अन्य पत्रकारांना विकत घेऊ शकतो. त्याने आपला भाव कोणाला करूच दिला नाही कधी. मग त्याचा आवाज बंद कसा करायचा ? मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावर एक शक्कल लढवली आणि त्या चॅनल मधील शेयर चा भाग विकत घेतला आणि तो आवाज दाबण्याचा अधिकचा समभाग विकत घेऊन तो प्रयत्न केला. पण तरी सुद्धा रवीश चा आवाज दबायला तयार नव्हता. त्या आवाजावर एव्हढा दबाव आला की, तो आवाज घुटमत राहिला. मग अशा सर्व परिस्थितीत त्या आवाजानेच निर्णय घेतला की, इथ घुटमत राहण्यापेक्षा दूर होण योग्य समजून शेवटी त्यांनी राजीनामा दिला. सत्ताधाऱ्यांचा मानस पूर्ण झाला.

        या घटनेमुळे काही जणांना खूप आनंद होतोय, जनसामान्यांचा आवाज दाबल्या गेला आणि सत्ताधाऱ्यांच्या गोष्टीला विरोध करणारा आवाज संपला. पण हा आवाज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होता म्हणजे विरोधकांच्या सर्थनर्थ होता का ? हा आवाज संवैधानिक कामाच्या विरोधात होता का ? हा आवाज लोकशाहीच्या विरोधात होता का ? हा आवाज उथळपणे निर्माण झालेला होता का ? या सगळ्यांचा विचार एकदा आपण करून पहावा.

        हा आवाज सामान्य नागरिकांच्या हितासाठी होता ना ?  मग हा आवाज सामान्य नागरिकांच्या हितासाठी होता तर त्या आवाजाच्या समर्थनार्थ आपल्याला उभे रहावे लागेल. कारण मागील काही वर्षापासून मीडियाच्या बाबतीत विचार केला तर नवीन चॅनल ला परवनगी नाही. जरी परवानगी दिली तरी ती स्वतंत्रपणे चालणारे चॅनल नाही. जे चॅनल सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यानुसार काम करतात त्या चॅनल ला सहकार्य केलं जातं. अन्य चॅनल वर बंदी आणली जाते किंवा त्यावर हवी तशी कार्यवाही केली जाते. अन्यथा जाहिरातींचा पुरवठा खंडित केला जातो मग त्या शासकीय असो अथवा खाजगी. अशावेळी ते चॅनल लवकरच बंद पडते आणि सत्ताधाऱ्यांचे मनसुबे साध्य होतात. अशावेळी नागरिक म्हणून आपल्याला आपली भूमिका कठोरपणे पार पाडावी लागणार आहे. जे चॅनल तुमच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार नाही त्या चॅनल चा TRP वाढवून त्याला समर्थन देण्याऐवजी ते चॅनल पाहणे बंद करावेत. काही चॅनल तळवे चाटण्याच काम करत 24 तास लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून नाही तर एखाद्याची रखेल बनून प्रसारण करत असते. असे चॅनल डीटीएच च्या माध्यमातून फ्री मध्ये पुरवले जातात. आपण पैशाची चिंता करून ते फ्री चे चॅनल पाहत राहतो आणि त्या चॅनल वाल्यांचे खिसे भरतो. यातून सामान्य नागरिकांसाठी आवाज वाढवणारे चॅनल आर्थिक पाठबळ नसल्यामुळ बंद पडतात आणि सुरू होतो दर्जाहीन पत्रकारितेचा प्रवास.

       दर्जाहीन पत्रकारितेला रोखायच असेल दलाल आणि बिकावू मीडिया तयार होऊ नये अस वाटत असेल सामान्यांच्या आवाज होऊ पाहत असलेल्या प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक संघर्षात साथ देणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे हे असे राजीनामा सत्र थांबेल अन्यथा हे चालतच राहील.


© जी.संदीप (गोणार,नांदेड)

     9552803980

Saturday, March 12, 2022

बेरोजगार तरुणाला निराशेच्या काळात लढण्याचं बळ देणारी कादंबरी : अस्वस्थ नायक


अस्वस्थ नायक...











    या कादंबरीतील नायक प्रशांत आयुष्यात एक आदर्श शिक्षक व्हायचं हे एकच स्वप्न घेऊन जगणाऱ्या तरुणाची चित्तरकथा म्हणजे अस्वस्थ नायक.  आदर्श शिक्षक व्हायचं तर त्यासाठी डी.एड. करावं लागत. डी.एड. करायचं असेल तर शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावा लागतो. शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा तर दोन लाखाच डोनेशन द्यावं लागत. तेवढं डोनेशन आणायचं तरी कुठून ? शेती आहे पण निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतात काही पिकत नाही. शेतात पिकत नाही तर मग पैसा तरी कसा जमा होणार ? या सर्व अडचणींवर मात करून आनंदी आयुष्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अल्प दरात शेती  विकून डोनेशन देऊन डी.एड. करायचं ठरते. तडजोड करून 50000 रुपये फिस भरून डी.एड चा प्रवास सुरू होऊन संपतो आणि कादंबरीचा खरा प्रवास सुरू होतो.

          आयुष्य जगण्यासाठी राहायला घर नाही आई - वडिलांचां सहारा नाही. गावी जायचं तर गावी काही सहारा नाही. अशा अवस्थेत शहरात एका मित्राच्या खोलीवर तिला खोली तरी कशी म्हणावं असा प्रश्न मनात निर्माण करणारी ती जुनी अडगळीतील वास्तू. पाहताक्षणीच त्यात कोणीही रहायला तयार होणार नाही अशा स्थितीत असलेल्या खोलीत, जिथे मानवाची कमी उंदीर आणि ढेकुनाची वस्ती जास्त अशा खोलीत राहून. शिक्षकाची नोकरी मिळेपर्यंत पोटाची भूक भागवण्यासाठी काहीतरी काम शोधणारा कादंबरीचा नायक प्रशांत.

कापडाच्या दुकानात काम मिळेल या आशेने विचारपूस करून सुरुवात करून, एका ग्रामीण भागात पैसे न घेता शिकवायला तयार होणारा आपण एक उत्तम शिक्षक होऊ या स्वप्नाने पछाडलेल्या तरुणाची ही कहाणी. 

        एकदा कादंबरी हातात घेतल्यानंतर पूर्ण संपवल्याविना तिला बाजूला ठेवावं असा विचार डोक्यात न येऊ देणारा नायकाचा प्रवास मनाला बधीर करून जातो. आपण बेरोजगार आहोत यात आपला दोष नसताना सुद्धा प्रत्येक स्थितीत स्वतःला सामावून घेत बेरोजगारी माणसाला काय काय करायला भाग पाडते याचे एक एक कंगोरे यात अतिशय समर्पक पणे मांडलेले आहेत.     

           कापडाच्या दुकानात काम करण्यासाठी प्रतिष्ठितांचे दाखले घेऊन दुकानात गेल्यानंतर गुंड, दादा, गुन्हेगार व्यक्तीचा दाखला दिसताच त्याला रोजगार नाकारणारा शेठ, सभ्य आणि होतकरू आहे अस समजून दवाखान्यात कंपाऊंडर चे काम मिळाले आणि आणि आता शिक्षकाची नोकरी मिळेपर्यंत आनंदाने जगता येईल या स्वप्नात जगत असतानाच तो जॉब सोडण्याचं आलेलं संकट.

       बेरोजगारीच्या अगतिकतेचा फायदा घेत समजशिक्षाची उपाधी देत धर्माचे ठेकेदार गंगाजल विकायचे काम करायला लावतात. ते काम किती पवित्र आहे. तू जर धर्माचे काम केलास तर तुला शिक्षकाची नोकरी नक्की लागेल अशा विचाराचा ठप्पा त्याच्या मेंदूवर मारतात.आपण आतापर्यंत धर्माचं काम न केल्यामुळ आपल्याला नोकरी मिळाली नाही हे काम जर केलं तर आपल्याला नक्कीच नोकरी मिळेल अशी मानसिकता घेऊन, एक आदर्श शिक्षक होता येईल या आशेवर धर्मांध गंगाजल विकण्याच काम म्हणजेच मार्केटिंग च काम करतो. पहिल्याच दिवशी दिलेलं टार्गेट पूर्ण करतो आणि फक्त पाणी पिऊन दिवस काढत असलेल्या पोटात समाधानाचे चार घास टाकतो. पण ही परिस्थिती तरी कुठ टिकून राहते. लगेच दुसऱ्याच दिवशी बाबरी मस्जिद पाडल्यामुळे देशभर दंगल माजते. हा जो काम करत होता ते सुद्धा त्याचाच भाग होता हे या नायकाला लक्षात सुद्धा येत नाही. दंगल सुरू झाल्यामुळे त्याच्या रोजगाराचा मार्ग पुन्हा बंद होतो. पुन्हा उपासमारीची वेळ येते पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते. दंगलीत सापडल्यानंतर पोलिसांचा मार पडल्यामूळ शरीर रक्तबंबाळ होते. त्याच स्थितीत पोलीस व्हॅन मध्ये टाकून दवाखान्यात admit करतात. तिथे उपचार घेत असताना चार दिवस सुखाने जातात. वेळेवर चहा नाश्ता जेवण मिळत असते. त्यामुळं नायकाला वाटते की, आपल्या शरीची मोठी हनी व्हायला पाहिजे होती. ज्यामुळे आपण जास्त दिवस इथे राहू शकलो असतो आणि पोटा पाण्याचा प्रश्न आला नसता. दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर जिथे त्याची राहण्याची सोय झाली होती आणि त्याच काही सामान जिथे ठेवलं होत त्या धर्मकार्यालयाकडे जातो. पण ते कार्यालय बंदच असते. शहरात दंगल चालूच असते. त्या दंगलीतून स्वतः ला वाचवण्यासाठी निवारा शोधतो. पण कुठेच सहारा मिळत नाही. अशा स्थितीत तो पोलीस स्टेशन गाठतो. तिथे काही वेळ आसरा मिळाल्यानंतर पोलीस व्हॅन मधूनच त्याला शहराच्या बाहेर सोडलं जातं. 

         शहराच्या बाहेर गेल्यानंतर एका चर्च च्या आश्रयाला काही दिवस राहतो. तिथली सेवा, शुश्रुषा पाहून प्रभावित होतो. पण एक आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीबद्दल चर्च मधील फादर च मत ऐकून तो तिथून जायला तयार होतो. त्यावेळी फादर आणि त्याच्यात झालेला युक्तिवाद हा बेरोजगार युवकाला धार्मिक ठेकेदार कसे प्रभावित करू पाहतात हे लक्षात आणून दिल्याशिवाय राहत नाही.

         हा सर्व प्रवास चालू असताना अशोक नावाचा व्यक्ती त्याला भेटत असतो. जो त्याची खडान - खडा माहिती मिळवत असतो. तो कुठे जातोय काय करतोय या सर्व गोष्टींवर त्याची नजर असते. दवाखान्यात कंपाऊंडर ची नोकरी करत असताना पेन विकणारा म्हणून तर कधी राखीव जागांच्या समर्थनातील आंदोलनात. यांच्या भेटी झालेल्या असतात.चर्च मधून बाहेर पडल्यानंतर तो थेट एका शिक्षणसंस्थेच्या सेक्रेटरी ला भेटायला जातो. नोकरीसाठी गयावया करतो पण पैशाअभावी निराशाच हाती येते. या सगळ्या आगतीकतेत तो कुठे जावं काय खावं हा विचार करत असताना त्याला अशोक ची आठवण होते. तोच जिव्हाळ्याचा माणूस त्याला वाटायला लागतो. अशोक ने दिलेला पत्ता आठवतो आणि त्याच्या दिलेल्या पत्त्यावर पोहचतो. अशोक रूम वरच असतो. दरम्यानच्या काळात काय काय घडलं ते सगळ सांगत असतो. संस्थेवरील भेटीबद्दल सुद्धा तो सांगतो आणि त्याला हे सुद्धा सांगून टाकतो की,  तू ज्या सेक्रेटरी कडे गेला होतास त्याच्याकडेच उद्या जाऊन तुझी ऑर्डर घे. ही बातमी ऐकताच जणू स्वर्गच प्राप्त झाला अशा आनंदात तो स्वतःला स्वप्नाच्या दुनियेत घेऊन जातो.

         पण तो आनंद सुद्धा जास्त काळ टिकत नाही. का टिकत नाही ? पुन्हा कोणत संकट येते त्याच्यासमोर हे सगळ समजून घ्यायला, बेरोजगार तरुणाची वाताहत, त्याची जिद्दीने लढण्याची इच्छाशक्ती जाणून घ्यायला, शहरातील एका संस्थेत नोकरी मिळाली असताना सुद्धा ग्रामीण भागात मोफत शिकवण्याचा स्वीकार का करतो हे सर्व जाऊन घ्यायला मात्र कादंबरी नक्कीच वाचावी लागेल.


कादंबरीचे नाव : अस्वस्थ नायक

ले. उत्तम कांबळे

(जेष्ठ पत्रकार,संपादक,लेखक)

लेखन प्रकार:- कादंबरी.

प्रकाशन :- मनोविकास प्रकाशन पुणे.

पृष्ठ संख्या : 183

स्वागत मूल्य :- 200


परीक्षक : जी.संदीप(गोणार,नांदेड)

9552803980

Monday, February 21, 2022

गुन्हा आणि गुन्हेगारीची शिक्षा.....फाशीच का ?






 हिंगणघाट येथील पीडितेचा मृत्यू झाला आणि पुन्हा काही मुद्दे चर्चेला आले त्यात प्रेम महिलेवरील बलात्कार महिला असुरक्षित झाले आहे आरोपीला शिक्षा या सर्व बाबींवर विविध स्तरांतून चर्चा होत आहे त्यासंदर्भात घेतलेला आढावा.... 

      महिलेवर अन्याय झाला, बलात्कार करून खून केला की आरोपीला फासावर लटकवा ही मानसिकता जोर धरत आहे पण, हा न्याय आहे का ?..... आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल आणि अत्याचार पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळेल ? हा प्रश्न आपण भावनिक ओघात विसरून चाललो असे वाटत नाही का ? मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला न्याय कसा मिळू शकेल ? मेल्यानंतर त्या व्यक्तीचा न्यायाशी काय संबंध ? या प्रश्नाची उत्तरे आम्हाला आधी जाणून घ्यावी लागतील त्या नंतरच योग्य शिक्षेचा विचार होईल. ती जाणून घेण्यापूर्वी आपण काही संकल्पना समजून घेऊया त्यात 

01) आत्मा,

2 ) मेल्यानंतर आत्म्यास शांती प्राप्त होणे.

03) देहदंड दिला म्हणजे न्याय मिळणे....

         निसर्गाचा ऊर्जा निर्मिती संदर्भात एक नियम आहे, ज्याला ऊर्जा अक्षय्यतेचा नियम म्हणतात. जो सांगतो की - "ऊर्जा निर्माण करता येत नाही, व नष्टही करता येत नाही, तर ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होत असते." म्हणजेच निसर्गतः नवीन कोणतीही गोष्ट निर्माण होत नाही तर त्याआधी कोणत्यातरी रुपात निसर्गात दडलेले असते. त्यापासून नवीन तयार होत असतात. तसेच प्राण्याच्या बाबतीत सुद्धा उघडते प्राणी हा निसर्गातील विविध घटकांपासून बनतो, ज्यात माती, पाणी, अग्नी हवा आणि आकाश ज्याला पंच महाभूते अस म्हटलं जातं. या घटकातील कणांपासून प्रत्येक मानव तयार होतो. त्यानंतर त्याची वाढ होत राहते. (त्याच्या तयार होण्यास दुवा म्हणून स्त्री आणि पुरुष काम करतात ही बाब वेगळी.)

     या वाढीमध्ये वयानुसार त्यांच्या भावनिक विकास होत राहतो. मानवाच्या जन्मतः भावना विकसित झालेल्या नसतात, वयपरत्वे व  व ज्ञानानुसार त्याच्या भावना वाढत जातात. त्याच पद्धतीने आयुष्याच्या शेवटाकडे असताना त्याच्या भावना कमी होत जातात.  तो भावनाहीन होतो व शेवटी त्याचा अंत होतो. म्हणजेच मानवाच्या जन्मापासून अंतापर्यंत त्याच्या भावनांचा प्रवास सुरू असतो. तो मृत झाल्यानंतर त्याच्या भावना नष्ट होतात. त्याच्या नंतर त्याच्या बाबतीत न्याय अन्यायाचा मुद्दा शिल्लकच राहत नाही. मग पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याचा प्रश्नच कुठे येतो.  यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे ज्या बाबींपासून आपले शरीर तयार झाले (वरील पाच घटकांपासून) ते घटक त्यात मिसळून जातात व मानवी शरीर नष्ट होते.

        मानव नष्ट होतो म्हणजे त्याचा अस्तित्व नाहीसे होते. मानव मरण्यापूर्वी त्याच्या भावना कमी व्हायला लागलेली असतात. त्यामुळे त्याच्या मृत्यूपश्चात कोणता अवयव निसर्गात भरकटतोय असे म्हणण्यास वाव प्राप्त होत नाही. त्यामुळे आत्मा हा विषय आपल्या मनातून अशा गुन्हेगारी बाबींसाठी दूर ठेवूया. वैचारिक पातळीवर जेव्हा या बाबींचा विचार करण्यात येतो तेव्हा असे कुठेही जाणवत नाही की मृत्युपश्चात काही घडत असेल. निर्भयाच्या प्रकरणात आठ वर्ष होत आली आहेत या आठ वर्षात निर्भयाच्याअशांत आत्म्याने त्यांचा बदला घ्यायला हवा होता. पण तसे घडले नाही.

       त्यामुळे आत्मा ही संकल्पना अशा प्रकरणात पूरती बाजूला ठेवूया. मग आत्मा जर बाजूला ठेवला तर तिच्या आत्म्यास शांती लाभो हा मुद्दा शिल्लक राहत नाही. मग असे असेल तर न्याय मिळण्याची, न्याय मागण्याची विचारसरणी नक्कीच बदलण्यास मदत होईल गुन्हेगाराला योग्य शिक्षेची मागणी वाढेल.

      आत्मा ही संकल्पना अशा गुन्ह्यात बाजूला ठेवत असताना किंवा त्या अमान्य करत असताना तिच्या शांतीचा मुद्दा आपल्या उपस्थित होत नाही व त्यातून आपण ही संकल्पना बाजूला ठेवतो.

      त्यानंतर तिसरा मुद्दा आहे देहदंड दिला म्हणजे न्याय मिळाला ? म्हणजे कोणाला न्याय मिळाला ? वरील दोन प्रश्नांचा विचार केल्यास काही बाबी स्पष्ट व्हायला लागतील यात न्याय मिळाला हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल पुढील दोन आपण समजून घेऊया.

    १. न्याय कोणाला देतोय.

    २. तो कॉनमार्फत देतोय.

    न्याय जिवंत व्यक्तीला देत नाही, म्हणजेच पीडितेचा आत्मा आहे व त्या आत्म्यास न्याय मिळावा म्हणून गुन्हेगारांना देहदंड केला जातो. येथे न्याय त्या व्यक्तीला दिला जातो का ? तर याचे उत्तर नकारात्मक येईल. म्हणजेच न्याय हा पीडितेला दिला जात नाही हे स्पष्ट होतेय (पीडित जिवंत नसताना). म्हणजेच न्याय पीडितेच्या आत्म्याला देतोय अस आपल मानण आहे. पण खरंच न्याय मिळतो का ? आत्मा ही मानसिक किंवा धार्मिक संकल्पना आहे. या प्रकरणापुरती ती बाजूला ठेवली तर हा न्याय होऊ शकेल का ?

         दुसरा मुद्दा न्याय कोणामार्फत दिला जातो ? व कोणाला दिला जातो ? मुळात न्याय दिला जातो असं म्हणण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही असे मला वाटते. यात गुन्हेगाराला शिक्षा होते मग येथे न्यायाचा मुद्दाच उपस्थित होत नाही. कारण अत्याचारपीडित व्यक्तीशी घडलेला कोणताही प्रसंग  कोणत्याही गोष्टींने तो रद्द होऊ शकत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे झालेली हानी भरून निघू शकत नाही. मग असे असताना त्या शिक्षकांच्या बदल्यात न्याय हा शब्द आपण कसा वापरू शकतो ?  शिक्षा देणारी व्यवस्था ही अस्तित्वात असलेल्या घटकांनाच शिक्षा देते. व्यवस्था फक्त शिक्षा देण्याचे काम करते. ते सुद्धा  अधार्मिक संकल्पनांना. मग आपण धार्मिक बाबीसाठी संविधानिक रित्या न्याय मागतो व न्याय मंडळाकडून गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा झाली म्हणजे न्याय मिळाला असं समजतो. पण हे चुकीचं आहे.

      देहदंड झाला  म्हणजे त्या व्यक्तीच अस्तित्व नष्ट होते. एखादा व्यक्ती मृत्यू पावतो म्हणजे तो पृथ्वीतलावरील प्रत्येक बाबीतून मुक्त होतो.

       हिंगणघाट येथील पीडितेचा मृत्यू झाला आणि पुन्हा काही मुद्दे चर्चेला आले त्यात प्रेम महिलेवरील बलात्कार महिला असुरक्षित झाले आहे आरोपीला शिक्षा या सर्व बाबींवर विविध स्तरांतून चर्चा होत आहे त्यासंदर्भात घेतलेला आढावा.... 

      महिलेवर अन्याय झाला, बलात्कार करून खून केला की आरोपीला फासावर लटकवा ही मानसिकता जोर धरत आहे पण, हा न्याय आहे का ?..... आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल आणि अत्याचार पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळेल ? हा प्रश्न आपण भावनिक ओघात विसरून चाललो असे वाटत नाही का ? मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला न्याय कसा मिळू शकेल ? मेल्यानंतर त्या व्यक्तीचा न्यायाशी काय संबंध ? या प्रश्नाची उत्तरे आम्हाला आधी जाणून घ्यावी लागतील त्या नंतरच योग्य शिक्षेचा विचार होईल. ती जाणून घेण्यापूर्वी आपण काही संकल्पना समजून घेऊया त्यात 

01) आत्मा,

2 ) मेल्यानंतर आत्म्यास शांती प्राप्त होणे.

03) देहदंड दिला म्हणजे न्याय मिळणे....

         निसर्गाचा ऊर्जा निर्मिती संदर्भात एक नियम आहे, ज्याला ऊर्जा अक्षय्यतेचा नियम म्हणतात. जो सांगतो की - "ऊर्जा निर्माण करता येत नाही, व नष्टही करता येत नाही, तर ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होत असते." म्हणजेच निसर्गतः नवीन कोणतीही गोष्ट निर्माण होत नाही तर त्याआधी कोणत्यातरी रुपात निसर्गात दडलेले असते. त्यापासून नवीन तयार होत असतात. तसेच प्राण्याच्या बाबतीत सुद्धा उघडते प्राणी हा निसर्गातील विविध घटकांपासून बनतो, ज्यात माती, पाणी, अग्नी हवा आणि आकाश ज्याला पंच महाभूते अस म्हटलं जातं. या घटकातील कणांपासून प्रत्येक मानव तयार होतो. त्यानंतर त्याची वाढ होत राहते. (त्याच्या तयार होण्यास दुवा म्हणून स्त्री आणि पुरुष काम करतात ही बाब वेगळी.)

     या वाढीमध्ये वयानुसार त्यांच्या भावनिक विकास होत राहतो. मानवाच्या जन्मतः भावना विकसित झालेल्या नसतात, वयपरत्वे व  व ज्ञानानुसार त्याच्या भावना वाढत जातात. त्याच पद्धतीने आयुष्याच्या शेवटाकडे असताना त्याच्या भावना कमी होत जातात.  तो भावनाहीन होतो व शेवटी त्याचा अंत होतो. म्हणजेच मानवाच्या जन्मापासून अंतापर्यंत त्याच्या भावनांचा प्रवास सुरू असतो. तो मृत झाल्यानंतर त्याच्या भावना नष्ट होतात. त्याच्या नंतर त्याच्या बाबतीत न्याय अन्यायाचा मुद्दा शिल्लकच राहत नाही. मग पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याचा प्रश्नच कुठे येतो.  यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे ज्या बाबींपासून आपले शरीर तयार झाले (वरील पाच घटकांपासून) ते घटक त्यात मिसळून जातात व मानवी शरीर नष्ट होते.

        मानव नष्ट होतो म्हणजे त्याचा अस्तित्व नाहीसे होते. मानव मरण्यापूर्वी त्याच्या भावना कमी व्हायला लागलेली असतात. त्यामुळे त्याच्या मृत्यूपश्चात कोणता अवयव निसर्गात भरकटतोय असे म्हणण्यास वाव प्राप्त होत नाही. त्यामुळे आत्मा हा विषय आपल्या मनातून अशा गुन्हेगारी बाबींसाठी दूर ठेवूया. वैचारिक पातळीवर जेव्हा या बाबींचा विचार करण्यात येतो तेव्हा असे कुठेही जाणवत नाही की मृत्युपश्चात काही घडत असेल. निर्भयाच्या प्रकरणात आठ वर्ष होत आली आहेत या आठ वर्षात निर्भयाच्याअशांत आत्म्याने त्यांचा बदला घ्यायला हवा होता. पण तसे घडले नाही.

       त्यामुळे आत्मा ही संकल्पना अशा प्रकरणात पूरती बाजूला ठेवूया. मग आत्मा जर बाजूला ठेवला तर तिच्या आत्म्यास शांती लाभो हा मुद्दा शिल्लक राहत नाही. मग असे असेल तर न्याय मिळण्याची, न्याय मागण्याची विचारसरणी नक्कीच बदलण्यास मदत होईल गुन्हेगाराला योग्य शिक्षेची मागणी वाढेल.

      आत्मा ही संकल्पना अशा गुन्ह्यात बाजूला ठेवत असताना किंवा त्या अमान्य करत असताना तिच्या शांतीचा मुद्दा आपल्या उपस्थित होत नाही व त्यातून आपण ही संकल्पना बाजूला ठेवतो.

      त्यानंतर तिसरा मुद्दा आहे देहदंड दिला म्हणजे न्याय मिळाला ? म्हणजे कोणाला न्याय मिळाला ? वरील दोन प्रश्नांचा विचार केल्यास काही बाबी स्पष्ट व्हायला लागतील यात न्याय मिळाला हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल पुढील दोन आपण समजून घेऊया.

    १. न्याय कोणाला देतोय.

    २. तो कॉनमार्फत देतोय.

    न्याय जिवंत व्यक्तीला देत नाही, म्हणजेच पीडितेचा आत्मा आहे व त्या आत्म्यास न्याय मिळावा म्हणून गुन्हेगारांना देहदंड केला जातो. येथे न्याय त्या व्यक्तीला दिला जातो का ? तर याचे उत्तर नकारात्मक येईल. म्हणजेच न्याय हा पीडितेला दिला जात नाही हे स्पष्ट होतेय (पीडित जिवंत नसताना). म्हणजेच न्याय पीडितेच्या आत्म्याला देतोय अस आपल मानण आहे. पण खरंच न्याय मिळतो का ? आत्मा ही मानसिक किंवा धार्मिक संकल्पना आहे. या प्रकरणापुरती ती बाजूला ठेवली तर हा न्याय होऊ शकेल का ?

         दुसरा मुद्दा न्याय कोणामार्फत दिला जातो ? व कोणाला दिला जातो ? मुळात न्याय दिला जातो असं म्हणण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही असे मला वाटते. यात गुन्हेगाराला शिक्षा होते मग येथे न्यायाचा मुद्दाच उपस्थित होत नाही. कारण अत्याचारपीडित व्यक्तीशी घडलेला कोणताही प्रसंग  कोणत्याही गोष्टींने तो रद्द होऊ शकत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे झालेली हानी भरून निघू शकत नाही. मग असे असताना त्या शिक्षकांच्या बदल्यात न्याय हा शब्द आपण कसा वापरू शकतो ?  शिक्षा देणारी व्यवस्था ही अस्तित्वात असलेल्या घटकांनाच शिक्षा देते. व्यवस्था फक्त शिक्षा देण्याचे काम करते. ते सुद्धा  अधार्मिक संकल्पनांना. मग आपण धार्मिक बाबीसाठी संविधानिक रित्या न्याय मागतो व न्याय मंडळाकडून गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा झाली म्हणजे न्याय मिळाला असं समजतो. पण हे चुकीचं आहे.

      देहदंड झाला  म्हणजे त्या व्यक्तीच अस्तित्व नष्ट होते. एखादा व्यक्ती मृत्यू पावतो म्हणजे तो पृथ्वीतलावरील प्रत्येक बाबीतून मुक्त होतो.हिंगणघाट येथील पीडितेचा मृत्यू झाला आणि पुन्हा काही मुद्दे चर्चेला आले त्यात प्रेम महिलेवरील बलात्कार महिला असुरक्षित झाले आहे आरोपीला शिक्षा या सर्व बाबींवर विविध स्तरांतून चर्चा होत आहे त्यासंदर्भात घेतलेला आढावा.... 

      महिलेवर अन्याय झाला, बलात्कार करून खून केला की आरोपीला फासावर लटकवा ही मानसिकता जोर धरत आहे पण, हा न्याय आहे का ?..... आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल आणि अत्याचार पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळेल ? हा प्रश्न आपण भावनिक ओघात विसरून चाललो असे वाटत नाही का ? मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला न्याय कसा मिळू शकेल ? मेल्यानंतर त्या व्यक्तीचा न्यायाशी काय संबंध ? या प्रश्नाची उत्तरे आम्हाला आधी जाणून घ्यावी लागतील त्या नंतरच योग्य शिक्षेचा विचार होईल. ती जाणून घेण्यापूर्वी आपण काही संकल्पना समजून घेऊया त्यात 

01) आत्मा,

2 ) मेल्यानंतर आत्म्यास शांती प्राप्त होणे.

03) देहदंड दिला म्हणजे न्याय मिळणे....

         निसर्गाचा ऊर्जा निर्मिती संदर्भात एक नियम आहे, ज्याला ऊर्जा अक्षय्यतेचा नियम म्हणतात. जो सांगतो की - "ऊर्जा निर्माण करता येत नाही, व नष्टही करता येत नाही, तर ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होत असते." म्हणजेच निसर्गतः नवीन कोणतीही गोष्ट निर्माण होत नाही तर त्याआधी कोणत्यातरी रुपात निसर्गात दडलेले असते. त्यापासून नवीन तयार होत असतात. तसेच प्राण्याच्या बाबतीत सुद्धा उघडते प्राणी हा निसर्गातील विविध घटकांपासून बनतो, ज्यात माती, पाणी, अग्नी हवा आणि आकाश ज्याला पंच महाभूते अस म्हटलं जातं. या घटकातील कणांपासून प्रत्येक मानव तयार होतो. त्यानंतर त्याची वाढ होत राहते. (त्याच्या तयार होण्यास दुवा म्हणून स्त्री आणि पुरुष काम करतात ही बाब वेगळी.)

     या वाढीमध्ये वयानुसार त्यांच्या भावनिक विकास होत राहतो. मानवाच्या जन्मतः भावना विकसित झालेल्या नसतात, वयपरत्वे व  व ज्ञानानुसार त्याच्या भावना वाढत जातात. त्याच पद्धतीने आयुष्याच्या शेवटाकडे असताना त्याच्या भावना कमी होत जातात.  तो भावनाहीन होतो व शेवटी त्याचा अंत होतो. म्हणजेच मानवाच्या जन्मापासून अंतापर्यंत त्याच्या भावनांचा प्रवास सुरू असतो. तो मृत झाल्यानंतर त्याच्या भावना नष्ट होतात. त्याच्या नंतर त्याच्या बाबतीत न्याय अन्यायाचा मुद्दा शिल्लकच राहत नाही. मग पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याचा प्रश्नच कुठे येतो.  यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे ज्या बाबींपासून आपले शरीर तयार झाले (वरील पाच घटकांपासून) ते घटक त्यात मिसळून जातात व मानवी शरीर नष्ट होते.

        मानव नष्ट होतो म्हणजे त्याचा अस्तित्व नाहीसे होते. मानव मरण्यापूर्वी त्याच्या भावना कमी व्हायला लागलेली असतात. त्यामुळे त्याच्या मृत्यूपश्चात कोणता अवयव निसर्गात भरकटतोय असे म्हणण्यास वाव प्राप्त होत नाही. त्यामुळे आत्मा हा विषय आपल्या मनातून अशा गुन्हेगारी बाबींसाठी दूर ठेवूया. वैचारिक पातळीवर जेव्हा या बाबींचा विचार करण्यात येतो तेव्हा असे कुठेही जाणवत नाही की मृत्युपश्चात काही घडत असेल. निर्भयाच्या प्रकरणात आठ वर्ष होत आली आहेत या आठ वर्षात निर्भयाच्याअशांत आत्म्याने त्यांचा बदला घ्यायला हवा होता. पण तसे घडले नाही.

       त्यामुळे आत्मा ही संकल्पना अशा प्रकरणात पूरती बाजूला ठेवूया. मग आत्मा जर बाजूला ठेवला तर तिच्या आत्म्यास शांती लाभो हा मुद्दा शिल्लक राहत नाही. मग असे असेल तर न्याय मिळण्याची, न्याय मागण्याची विचारसरणी नक्कीच बदलण्यास मदत होईल गुन्हेगाराला योग्य शिक्षेची मागणी वाढेल.

      आत्मा ही संकल्पना अशा गुन्ह्यात बाजूला ठेवत असताना किंवा त्या अमान्य करत असताना तिच्या शांतीचा मुद्दा आपल्या उपस्थित होत नाही व त्यातून आपण ही संकल्पना बाजूला ठेवतो.

      त्यानंतर तिसरा मुद्दा आहे देहदंड दिला म्हणजे न्याय मिळाला ? म्हणजे कोणाला न्याय मिळाला ? वरील दोन प्रश्नांचा विचार केल्यास काही बाबी स्पष्ट व्हायला लागतील यात न्याय मिळाला हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल पुढील दोन आपण समजून घेऊया.

    १. न्याय कोणाला देतोय.

    २. तो कॉनमार्फत देतोय.

    न्याय जिवंत व्यक्तीला देत नाही, म्हणजेच पीडितेचा आत्मा आहे व त्या आत्म्यास न्याय मिळावा म्हणून गुन्हेगारांना देहदंड केला जातो. येथे न्याय त्या व्यक्तीला दिला जातो का ? तर याचे उत्तर नकारात्मक येईल. म्हणजेच न्याय हा पीडितेला दिला जात नाही हे स्पष्ट होतेय (पीडित जिवंत नसताना). म्हणजेच न्याय पीडितेच्या आत्म्याला देतोय अस आपल मानण आहे. पण खरंच न्याय मिळतो का ? आत्मा ही मानसिक किंवा धार्मिक संकल्पना आहे. या प्रकरणापुरती ती बाजूला ठेवली तर हा न्याय होऊ शकेल का ?

         दुसरा मुद्दा न्याय कोणामार्फत दिला जातो ? व कोणाला दिला जातो ? मुळात न्याय दिला जातो असं म्हणण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही असे मला वाटते. यात गुन्हेगाराला शिक्षा होते मग येथे न्यायाचा मुद्दाच उपस्थित होत नाही. कारण अत्याचारपीडित व्यक्तीशी घडलेला कोणताही प्रसंग  कोणत्याही गोष्टींने तो रद्द होऊ शकत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे झालेली हानी भरून निघू शकत नाही. मग असे असताना त्या शिक्षकांच्या बदल्यात न्याय हा शब्द आपण कसा वापरू शकतो ?  शिक्षा देणारी व्यवस्था ही अस्तित्वात असलेल्या घटकांनाच शिक्षा देते. व्यवस्था फक्त शिक्षा देण्याचे काम करते. ते सुद्धा  अधार्मिक संकल्पनांना. मग आपण धार्मिक बाबीसाठी संविधानिक रित्या न्याय मागतो व न्याय मंडळाकडून गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा झाली म्हणजे न्याय मिळाला असं समजतो. पण हे चुकीचं आहे.

      देहदंड झाला  म्हणजे त्या व्यक्तीच अस्तित्व नष्ट होते. एखादा व्यक्ती मृत्यू पावतो म्हणजे तो पृथ्वीतलावरील प्रत्येक बाबीतून मुक्त होतो.

       जिवंत असताना जो त्रास होतो त्या त्रासामुळे त्याला केलेल्या गुन्ह्याच्या वापराबद्दल काहीही वाईट वाटत नाही, त्याला मृत्युदंड होईपर्यंत कदाचित वाईट वाटेल. पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे काय ? तो मेल्यानंतर त्याला कशाचा पश्चाताप होणार आहे. मानवी जीवनाच अंतिम सत्य आहे मृत्यू , या मृत्यूनंतर त्याला कोणत्याही प्रकारची जाणीव राहत नाही. मग असे असतानाही आम्ही त्याच्या मृत्यूचा आग्रह का धरतो ? याचा नक्कीच विचार व्हावा. भावनिक होऊन आम्ही एखाद्या प्रकरणात विचार न करता न्याय मागत असू तर तो नक्कीच चुकीचा ठरेल. यातून ती गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होण्यास मदत होईल असे वाटत नाही.

        कारण हैदराबादचे प्रकरण घडून फक्त दोन महिने झाले असताना सुद्धा हिंगणघाट च्या आरोपीच्या मनात काहीही भीती नव्हती,औरंगाबादचे प्रकरण, आंदोलनकर्त्यांमध्ये जाऊन हस्तमैथुन करणे, नागपूरच्या महिला डॉक्टर वर झालेला ऍसिड हल्ला. हे सर्व का ? मग विचार करा कोणत्याही गुन्हेगाराला देहदंड योग्य ठरेल का ? निर्भयाचे प्रकरण बाजूला ठेवून, अपराध्याच्या मनात भीती निर्माण होण्यासाठी हैदराबादचे प्रकरण समोर घेतले तर त्याच्या डोक्यात मृत्यू चा विचार डोक्यात नसेल का ? आला असेल तर मग तरी सुद्धा त्याने असा प्रयत्न का केला ? याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. याचे उत्तर जर स्वतः शोधलात तर कदाचित तुम्ही सुद्धा देहदंडाच्या शिक्षेबद्दल नक्कीच विचार कराल. मानवाधिकार आयोगाच्या बाजूने विचार न करता जीवित मानवी मूल्यांच्या बाजूने विचार केल्यास याचे कारण लक्षात येईल.

      जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दलची वासना मेंदूवर प्रभावित होते अशा वेळी इतर कोणताही विचार किंवा त्याच्या परिणामाचा विचार डोक्यात नसतो. असे असताना  मन व मेंदू बधिर होतो. त्याला फक्त ती एकच गोष्ट दिसत असते.  तर शेजारी काय चाललंय याचं सुद्धा भान नसते. हे याच प्रकारात होते असे नाही तर प्रत्येक प्रकारच्या वासनेत असे होत असते.  वासना म्हणजे असते तरी काय ? तर वासना म्हणजे भूक. मग ती कोणत्याही प्रकारचे असो. अशावेळी माणूस तिथे स्वतःचं भान विसरून ती भूक नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. भूक ही नेहमी नैसर्गिकच असते असे नाही, काही वेळा ती जबरदस्तीने निर्माण करून ती भागवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकारातून असे बलात्कारासारखे प्रकरण घडत असतात.

     तर मग असे असताना एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यामुळे असे प्रकरण भविष्यात घडणार नाहीत असे आपण कसे म्हणू शकतो. त्यामुळं या भुकेची संकल्पना मनातून काढून टाकणे गरजेचं आहे.

      कोणतीही गोष्ट घडत असताना त्या मागची काही कारणं असतात. ती कारणे जाणून घेऊन त्या कारणांवर जेव्हा हल्ला करू तेव्हा ते गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होईल. पण आम्ही असे गुन्हे घडण्यास  कोणती कारणे  जबाबदार आहेत किंवा कोणती मानसिकता कारणीभूत आहे याचे मूळ न शोधता आम्ही त्यांच्या फांद्यावर घाव घालत आहोत. अशा फांद्यावर घाव घालण्याने  कोणत्याही बाबी संपत नसतात. जसा भावनेच्या भरात गुन्हा घडतो तसेच भावनेच्या भरात न्याय मागून आपण पुन्हा दुसरा गुन्हा तर घडवत नाहीत ना ?

     त्या कारणांचा विचार न करता सरळ सरळ देहदंडाची शिक्षा मागतोय. अन्याय अत्याचाराची प्रकरणे पाहता काही बाबी लक्षात येतात ती म्हणजे, अत्याचारपीडित हा ठराविक वयातील आहे अशी बाब नाही. तर तो  चार महिन्याच्या मुलीपासून ते वयाच्या शेवटच्या प्रवासाकडे असणाऱ्या महिलांवर व अशा प्रकारचे अत्याचार होत आलेले आहेत. त्यातील दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त स्त्रीच नाही तर पुरुष सुद्धा या प्रकाराचे बळी पडलेल्या आहेत.  मग मानसिकता फक्त स्त्रियांच्याच बाबतीत  नाही तर पुरुष सुद्धा  या प्रकाराचे बळी पडलेल्या आहेत. मानसिकता फक्त स्त्रीयासंदर्भात च आहे असे नाही तर ती भोगण्यासंदर्भात आहे. या मानसिकतेला नष्ट करायचे असेल तर देहदंड हा पर्याय कसा होऊ शकेल ? हैदराबाद प्रकरणात एन्काऊंटर झाला पण तरीही असे प्रकरण घडतच आहेत. प्रत्येक तासाला असे दोन प्रकार उघडकीस येत आहेत.मग उघडकीस येत नाहीत असे प्रकरण किती असतील याचा विचार करणे गरजेचे आहे.

      अशा उघडकीस न येणार्‍या व पीडित जिवंत असलेल्या प्रकरणाचे काय याबद्दल विचार करणे खूप गरजेचे आहे. म्हणून या भावनिक मागणीवर प्रत्येक नागरिकाने विचार करावा व न्यायालयाने या बाबीचा विचार करून या संदर्भात योग्य ती शिक्षा द्यावी. न्यायासंदर्भात पुढील भागात...

© जी.संदीप(गोणार,नांदेड)

            9552803980

Tuesday, January 25, 2022

संविधान.



 आनंदाला उधाण आल असेल

तिरंगा नभात फडकणार असेल

मी जे हक्क आणि अधिकार देतोय

त्यामुळं तुमची स्वप्नपूर्ती होत असेल


बाबासाहेबांच्या कष्टाचं फळ

उपभोगताय जीवनभर तुम्ही

त्या हक्क आणि अधिकारासाठी

संघटित राहताय ना तुम्ही ?


काय ? संविधानामुळ तुम्हास

पूर्णपणे हक्क आणि अधिकार मिळत नाहीत.

याचा अर्थ तुम्ही स्वतः अद्याप

हवे तेवढे जागृत झालेच नाहीत.


तुम्हाला सन्मानाचे जगणे मिळत नाही

यात माझा काय दोष

अबे, मुर्खानो मताधिकार बजावताना 

तुम्हीच असता की रे बहोष


तुमच्या कर्टीव्यांच खापर

माझ्या डोक्यावर फोडू नका

मला समजावून घेटल्याविना

हा सोहळा साजरा करू नका.


अरे संविधान हा तुमचा

मुलग्रंथ असायला पाहिजे

त्यातील कर्तव्य हक्क अधिकार

जाणून घ्यायला पाहिजे.


कर्तव्य, हक्क आणि अधिकार जाणून घेऊन

त्याची अंमबजावणी करण्यास भाग पाडा.

अन्यथा तुम्ही तुमच्या अस्मितेस

कायमचे असेच मातीत गाडा


असा सोहळा साजरा केल्याने

तुमचे भविष्य बहरास येणार नाही

माझी अंमलबजावणी योग्य होत नसेल

तर मला तीळभरही आनंद होणार नाही.


©जी.संदीप(गोणार,नांदेड)

Sunday, January 2, 2022

सावित्रीबाई जयंती विशेष : स्त्रीशिक्षण व वास्तव




 एखादी समस्या जाणून घेऊन त्या समस्येवर उपाय काढणारे त्या काळातील समाजसुधारक म्हणून फुले दाम्पत्यांचं नाव घेतलं जातं. म्हणजेच आम्हाला शिकण्याचा अधिकार नसताना आमच्यासाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याच काम फुले दाम्पत्याने केले. हे काम करत असताना त्यात महत्वाचा वाटा जो होता तो म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा. पण हे ऐकून वाचून आम्हाला गुळ-गुळीत झालेले शब्द आहेत. त्यातून जी प्रेरणा भेटायला पाहिजे ती आम्हाला भेटत नाही. म्हणजे आम्हाला या शब्दातील भाव काढून टाकून जो फक्त अक्षर आहेत तेवढेच वाचतोय आणि त्यातून आम्हाला काहीही प्रेरणा मिळत नाही अस झालंय. कोणत्याही महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी असेल तर कोण काय बोलेल याचा अंदाज श्रोता वर्ग लावत आहे. म्हणजे आपण काय सांगणार हे आता ऐकणाऱ्याला कळत आहे. मग हा घोटीव इतिहास किती वर्षे सांगायचा. सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगावर शेण,दगड, गोटे यांचा मारा सहन केला आणि आमच्यासाठी शिकवण्याचा काम चालूच ठेवले. या शब्दातून आम्हाला फक्त काहीवेळा ऊर्जा मिळते पण त्यांच्या या कार्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे परिस्थितीनुसार आपल्याला कामे करावी लागतील. जर आम्हाला खरचं कामे करायची असतील तर परिस्थितीला बद्दलवायचे असेल तर इतिहासावर नाही तर वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागते. आम्ही इतिहास सांगत असताना फक्त इतिहासावरच लक्ष केंद्रित करतोया भविष्याचा आमच्याकडे काहीही संबंध नाही असं दिसतंय. अशाने आमची अधोगती,द्वेषभाव, विषमता नष्ट होणारच नाही. मग आम्हाला खरंच जर या देशात समतामुलक व्यवस्था निर्माण करायची असेल तर आम्हाला इतिहास जरूर सांगावा लागेल पण तो सांगत असताना ज्या शिक्षणाची गरज फुले कुटुंबियांना जाणवली त्याचा उद्देश पूर्ण झाला का ? नसेल झाला तर मग आम्ही कुठे आणि का कमी पडतोय याच चिंतन आम्ही का करत नाही ? याचा जेव्हा विचार करतो तेव्हा अशी शंका येते की आम्हाला राजकीय पोळ्या भाजून पोट भरायची आहेत त्यामुळं आम्ही अस काहीही करत नाही. कदाचित ही शंका प्रत्येक वेळी लागू होणार नाही. ही जर शंका खरी नसेल तर त्याच स्पष्टीकरण द्या... जर असेल खरी तर ही शंका नाहीशी करण्यासाठी काम करा.

     आज प्रत्येक स्त्री शिक्षण घ्यावी म्हणून आपण धडपड करतोय पण ही शिकलेली स्त्री समतेच जीवन जगत आहे का ? तिला समाजात सन्मानाची वागणूक भेटते का ? समाजात स्त्री शिकली ते फक्त आणि फक्त आर्थिक सोर्स म्हणून पण कमावणाऱ्या स्त्रीने कधी फुले दाम्पत्याच्या त्यागाचा किंवा ध्येय उद्दिष्टांचा विचार केलाय का ? जर ही स्त्री अशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसेल तर तुम्हाला आज जयंती साजरी करण्याचा काय अधिकार आहे ? तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असेल तर डॉक्टर ती तुम्ही खाऊ नका अस सांगतात आणि तुम्ही ते ऐकता. पण आयुष्याभर आम्हाला काही चालीरितींमुळे त्रास होतो पण तरीही आम्ही त्या चालीरीती सतत चालूच ठवतो. या विचारांमुळे होणाऱ्या ऍलर्जी साठी तुम्ही कोणत्या गोष्टी करणं थांबवलं ? म्हणजे आम्हाला शिक्षण भेटलं, उच्च शिक्षणाच्या जोरावर आम्हाला नोकरी भेटली पण ही नोकरी करत असताना आमच्या सन्मानाचे काय ? मग आम्ही शिकलेल्या शिक्षणाचा फायदा काय ? आपण शिकल्यानंतर आपल्यात वैचारिक परिवर्तन व्हायला पाहिजे. हे होणं गरजेचं आहे. आजची स्थिती बघता आज आम्हाला कोणत्याही संजसुधारकांची गरज नाही. कारण ज्ञानाचे दरवाजे आमच्यासाठी 24 तास खुले आहेत. आम्हाला हवे तेव्हा हवे ते ज्ञान घेऊ शकतो म्हणजे आम्हाला आता कोणतेही कार्य करण्यासाठी ज्ञान उपलब्ध होत आहे. फक्त गरज आहे ती एका चिंगरीची आणि तो चिंगरी निर्माण करणारा शब्द आहे  "का ?" हा एक शब्द जर वापरत गेलात तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यासोबत घडत असलेल्या अन्यायाला वाचा फोडतो मग तो स्त्रीवरील किंवा पुरुषावरील असो. त्यामुळं आज आम्हाला आमचा विकास करण्यासाठी कोणत्याही त्रयस्थाची मदत लागणार नाही यातून महापुरुषांना अपेक्षित समाज घटक होऊ व आदर्श समाज घडवू.

✍️✍️@ जी.संदीप (नांदेड)

            9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...