Saturday, March 28, 2026

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”


     


मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. एवढेच नाही तर गुगल ला सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये तेच नाव आहे. एवढ सगळ कशामुळे तो व्यक्ती खरंच चुकीचा वागला का ? तर त्याचे उत्तर आहे हो तो 100% चुकीच वागला. स्वतःची पत्नी असताना स्वतःच एक अस्तित्व असताना हिंदू संस्कृतीनुसार एक पत्नित्व हे आदर्शवाद असताना तो इतर महिलांशी असे असभ्य कृत्य करतो म्हणून तो गुन्हेगारच आहे. पण हा गुन्हा करण्यास त्याला सुरुवातीपासून पाठबळ देणारे किंवा त्याला अप्रत्यक्षरित्या मोठ करणारेही तितकेच गुन्हेगार आहेत त्याचं काय ?

       तो खरात जेव्हा सुरुवातीला हे भोंदूगिरीच दुकान मांडला तेव्हा त्याला समर्थन देऊन त्याच्याकडे आपल्या ओळखीतले लोक पाठवणारे गुन्हेगार नव्हेत का ? संविधान विज्ञानाची कास धरा हे सांगत असताना अशा भोंदूगिरीच्या मागे लागून अनर्थ होतो हे समजत नसेल तर त्या खरात ला दोषी ठरवून काय साध्य होणार आहे ? पुरोगामी महाराष्ट्र म्हणून शिव,फुले,शाहू,आंबेडकरांचे नाव रोज घेत असताना या चारही महापुरुषांनी कधी अशा गोष्टींना थारा दिला का ? शिवराय युद्धासाठी कोणती वेळ चांगली आहे हे बघण्यासाठी कधी कोणत्या ज्योतिषाकडे गेले काय ? स्वतःला मूल होत नाही म्हणून महात्मा फुले कधी कोणत्या बाबा बुवाकडे गेले काय ? देशावर इंग्रजांच आक्रमण असताना ते देशासाठी घातक आहे त्यांना देशाच्या बाहेर हाकलून द्यायचे असेल तर राज्यातील ज्योतिषांना बोलवून शाहू राजांनी कधी मुहूर्त पाहिला काय ? राज्यातील जनतेच्या सन्मानाच्या वागणुकीसाठी प्रयत्न करत असताना पारंपरिक रीतीरीवाज मोडून सामाजिक समतेसाठी प्रयत्न करत असताना कधी मुहूर्त पाहिला का ? किंवा कोणत्या बाबा बुवाकडे गेले का ? बाबासाहेबांनी तर उभ्या आयुष्यात कधीच अशा गोष्टींना थारा दिलाच नाही त्याच्याहीपुढे एक पाऊल जाऊन सांगायचे म्हणजे बाबासाहेबांनी देव ही संकल्पनाच नाकारून सर्व देवच नाकारले.देवाच अस्तित्वच जर बाबासाहेबांनी नाकारलं असेल तर मग तुमच्या भीतीच भांडवल करून देवाच्या नावाने दुकान मांडून बसणाऱ्यांची दुकानदारी कायमची बंदच होईल ना ? ती दुकानदारी कायमची बंद व्हायलाच हवी होती अद्याप पर्यंत पण तसे न घडता असे खरात घडत आहेत. आधी आसाराम झाला त्यानंतर रामरहिम झाला आता हा खरात असे एक नाही हजारो भोंदू या देशात आनंदाने जगत आहेत. कारण ते तुमच्या भीतीच भांडवल करत आहेत. तुमच्या मनातून एखाद्या बाह्य शक्तीने आपलं वाईट होतेय ही भावना नाहीशी होईल तेव्हाच हे असले धंदे बंद होतील अन्यथा एक जाईल तर दुसरा तयार होईल.

          खरात च्या निमित्ताने जो मुद्दा पुढ आला आहे तो अतिशय महत्वाचा आहे की, महिलांच्या मनातील अंधश्रद्धेची आत्मियता कधी कमी होईल ? ज्या बाबाकडे तुम्ही जाता तो तुमचं शारीरिक शोषण करत असताना ते झालेलं शोषण स्वतःच्या पतीला सुद्धा सांगत नाही. ते गप्प गुमान सहन करता आणि काही कालावधीनंतर जेव्हा तुम्हाला सहन होण्याच्या पलीकडे जाईल त्यावेळी त्याबद्दल तक्रार करता. एवढा संयम बाळगायची गरजच का ? घरात एखादेवेळी सासू सासऱ्यांनी काही बोलले तर त्यांच्या तोंडावर लगेच त्यांचा अवमान करता. नवऱ्याला त्यांच्यापासून दूर करून स्वतः वेगळ राहण्याचा निर्णय घेता मग इतक्या असंवेदनशील वेळी मात्र गप्प का ? ते शांत राहणे म्हणजे तो गुन्हा करायला दिलेली तुमची मूक संमती तर नव्हे ना ?

         महिलांनी स्वतःचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नये म्हणून प्रबोधन सुरू असलेल्या या काळात तुम्ही स्वतःच पूर्ण शरीर त्या भोंदूच्या स्वाधीन करत असाल तर इथे दोष नेमका द्यावा कोणाला महिलांना? मानसिकतेला ? का संस्कृतीचा गवगवा करणाऱ्या विशिष्ट विचारसरणीच्या प्रवृत्तीला ?

          डोक्यातून भीतीचे भूत जोपर्यंत उतरणार नाही, महिलेला मूल नाही झालं तर तिला देण्यात येणाऱ्या वागणुकीत जोपर्यंत बदल होणार नाही, तोपर्यंत असे अनगिनत भोंदू तयार होतील आणि समाजात सन्मानाने वावरतील गोष्टी उघडकीस नाहीच आल्या तर त्याच सन्मानाने ते मातीमोल सुद्धा होतील. त्यामुळं परंपरेनुसार चालत येणारी विचारसरणी बदलून जोपर्यंत प्रगल्भ विज्ञानवादी विचारसरणीच्या महिला तयार होणार नाहीत तोपर्यंत हा विध्वंस होतच राहणार यात निसर्ग नियमानुसार माफी नाहीच. वाईट कर्म कराल तर त्याचे भोग भोगावे लागतील असा गैरसमज बाळगण्याची आता तसूभरही गरज नाही. कारण खरात सारख्याच देव काहीच करू शकला नाही त्याला संविधानिक बलाने त्याला त्याची शिक्षा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर देवाच्या भरोशावर सोडून दिलं असतं तर आज आसाराम आणि राम रहीम जेल मध्ये दिसले नसते. ते मुक्तपणे कैक महिलांचा आस्वाद घेत राहिले असते. त्यामुळं देव वाईट कर्माचे फळ देतो देवच आपल्या आयुष्याच चांगलं वाईट ठरवतो हा विचार डोक्यातून काढून टाकून जर एखादा भविष्य सांगणारा आलाच तुमच्या मनात भीतीची मानसिकता तयार करत असेलच तर त्याला आधी त्याची जागा दाखवा आणि असे भोंदू लोकांची मानसिकता जागेवरच ठेचून काढा.

                          © जी.संदीप (गोणार,नांदेड)

Sunday, March 8, 2026

"जयंतीचा जल्लोष की सामाजिक जबाबदारी?”


 तमाम भारतवासीयांना मानाचा स्वाभिमानाचा जयभीम,

         आपल्या आनंदाला उधाण येण्याचा महिना जवळ येत आहे. ज्यांच्या जन्मामुळे आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होतोय अशा महामानवाची जयंती जवळ येत आहे. हा सोहळा येणाऱ्या 14 एप्रिल रोजी विविध देशांमध्ये साजरा करण्यात येणार आहे असे अभिमानाचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जात आहेत. या बाबीचा एक भारतीय म्हणून मला नक्कीच गौरव राहील. आमच्या देशात जन्मलेल्या महापुरुषांची जयंती जगभर विविध स्वरूपात साजरी करण्यात येत आहे.

         पण ही जयंती भारतात साजरी होत असताना तिचे स्वरूप काय ? त्याबद्दल मानसिकता काय ? ती साजरी करत असताना ध्येय धोरणे काय ? ती जयंती साजरी करण्यात बाबासाहेबांच्या स्वप्नांच काय ? अशी अनेक प्रश्न मनाला भेडसावत आहेत. यातील प्रश्नांच्या बाबतीत टप्प्याटप्प्याने जेव्हा मी विचार करतो तेव्हा वरील सर्व बाबीच आम्हाला काहीच देणं घेण नाही असे दिसून येते याच कारण म्हणजे आम्ही बाबासाहेबांची जयंती हीच आमची खरी दिवाळी असे समजतो.

          हिंदू धर्मातील धर्मांतरित म्हणून बौद्ध म्हणून 1956 साली धम्म स्वीकारल्यानंतर आपल्या सांस्कृतिक पर्यायाचे काय हा मोठा प्रश्न आपल्यापुढे निर्माण झाला. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर सुद्धा आपण हिंदू धर्माचेच सण साजरे करतो. हे सण साजरे करत असताना काही बौद्धजन विरोध करतात आणि पर्यायी सोहळ्याला हिंदू धर्माच्या सणाची उपाधी देतात. पण आपली सांस्कृतिक संस्कृती असताना किंवा कालपरत्वे सांस्कृतिक संस्कृती वृध्दिंगत करण्याकडे लक्ष न देता आहे तीच संस्कृती जोपासून किंवा हिंदूंचे सण साजरे करू नका हे सांगून आपण आपला वेळ आणि सांस्कृतिक संस्कृतीचे नुकसान करून घेत आहोत.

        1956 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला म्हणून आपण बौद्ध झालो. पण काही दिवसातच बाबासाहेबांचे निधन झाले आणि आपण सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मार्गावर भरकटलो. अद्यापही आपल्याला कोणत्याच क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आले नाही. बौद्धिक पातळीवर आपण किंवा आपल्यातले काही बांधव उच्चविद्याविभूषित होत आहेत पण त्यांच्या त्या ज्ञानाचा आपल्यासाठी किंवा समाजासाठी हवा तसा वापर होताना दिसत नाही.

            ज्या डॉ.बाबासाहेबांच्या नावाने आपण सोहळा साजरा करतो जल्लोष करतो तो सोहळा नेमका कशासाठी असतो ? डॉ.बाबासाहेबांची जयंती साजरी केल्याने किंवा न केल्याने त्यांचे इतिहासातील स्थान कमी होणार नाही. तर मग आम्ही जयंती का साजरी करतो ? पुढील पिढ्यांना त्यांची जाणीव व्हावी बाबासाहेबांचं कार्य नवीन पिढीला कळत रहावे म्हणून ? का फक्त आम्हाला आमच्या आयुष्यात जल्लोष करायचा आहे म्हणून ?

          वरील बाबीचा विचार करता पहिल्या बाजूने विचार केला आपण तर असा प्रश्न पडतो की ? बाबासाहेबांचा संघर्ष त्यांचा विचार येणाऱ्या पिढीला माहीत व्हावा म्हणून आपण जर हा सोहळा साजरा करत असू तर, बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवून आपण आपल्या समाजासाठी काही योगदान देतोय का ? कुटुंब आधी मग समाज ही भावना कितपत आपल्यात आहे ? बाल भीमाला पुस्तकांची गोडी लागावी त्यांना शिक्षणात पुस्तकांची कमी पडू नये म्हणून काळजी घेणारा बाप रामजी जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण स्वतः बाप म्हणून आज आपल्या मुलांसाठी काय करतोय ? लहान वयात लेकरू रडत असेल तर जेवण करत नसेल तर त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला जेवायला भाग पाडणारे आपण मग बाबासाहेबांची भूमिका उद्देश येणाऱ्या पिढीपर्यंत कसे पोहचवू ? असे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देता येतील ज्यामुळे आपल्या जयंती साजरी करण्याच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील.

        दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला आमच्या आयुष्यात फक्त जल्लोष हवा म्हणून. बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना जयंतीचे स्वरूप बघितले तर सकाळी ध्वजारोहण, भोजनदान, DJ वरील रॅली आणि एखादा प्रबोधनात्मक कार्यक्रम. या स्वरूपातून जयंती साजरी करत असताना या जयंतीसाठीचे आर्थिक नियोजन पाहता या जयंतीसाठी शहरात बिगारी काम करणारा कामगार, मोलमजुरी करणारा मजूर, नोकरदार ते लोकप्रतिनिधी अशा सर्वांकडून निधी गोळा करून त्या निधीच्या माध्यमातून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येते. या सर्व टप्प्यांमध्ये जयंतीच्या स्वरूपाकडून ते जयंतीच्या आर्थिक नियोजनावर यात मांडणी करण्यात येणार आहे. जयंतीसाठी देणगी घेतल्यानंतर ध्वजारोहणासाठी सर्व अनुयायांनी समान देणगी दिलेली असताना सर्व अनुयायांना समान वागणूक दिली जाते का ? गरीब असेल तर त्याला दुय्यम वागणूक आणि जो आर्थिक सधन आहे त्याला उत्तम वागणूक. हा अवमान का ? गरीब आहे तो त्याला त्याची परिस्थिती आणि त्याचे विचार जबाबदार आहेत, पण त्याला समान पातळीवर आणण्याचा उद्देश तर बाबासाहेबांच्या विचारधारेचा आहे ना ? मग त्याला समनपातळीवर आणण्याचा विचार न करता त्याला दुय्यम वागणूक देऊन त्याचे मानसिक खच्चीकरण यानिमित्ताने होत असेल तर अशा जयंती सोहळा साजरा होण्याला काही अर्थ उरेल का ?

          बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात विचारांची देवाणघेवाण या निमित्ताने केली जाते पण विचार देणारा आणि घेणारा यांच्यात एकमत असते का ? 

       विचार देत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून विचार सांगत असतो, पण त्या विचारावर कृतिशील प्रयोग निर्माण होईल आपल्या विचारातून काही नवनिर्माण होईल ही मानसिकता कधीच निदर्शनास येत नाही. विचार देण्यासाठी जात असताना मानधनाची डिमांड असते एक दीड तास जेवढा वेळ शक्य आहे तेवढ्या वेळेत तत्वज्ञान सांगून आपल्या पुढील वाटचालीत ते गुंग होऊन जातात. अशाने बाबासाहेबांच्या कोणत्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे ? कोणते स्वप्न साकार होणार आहे ?

         हे सर्व पाहता आपण करत असलेला हा कार्यक्रम एकप्रकाचे काही अनुयायांच शोषण आहे असे वाटते. कारण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देणगी देणारा प्रत्येक अनुयायी हा सारखा नाही. शहरात राहणारा असंघटित कामगार वर्गातील कामगार आणि ग्रामीण भागातील शेतीत राबणारा मजुरदार हा जयंती मंडळाने आकारलेल्या देणगी एवढीच देणगी देतो. जर काही वेळा एखाद्या कष्ट करणाऱ्या अनुयायाने देणगी देण्यास उशीर केल्यास त्यांना त्यांच्या तोंडावर बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव करून देऊन त्याला लाजिरवाणे करतो. हतबल होऊन तो शेवटी बाबासाहेबांच्या सोहळ्यासाठी म्हणून नाही तर बाबासाहेबांसाठी म्हणून देणगी देतो. पण दिलेल्या त्या देणगीचे आपण काय करतो ? त्याने दिलेल्या पैशाच मोल पैसेवान लोकांना नसेल पण त्याच्यासाठी ती रक्कम म्हणजे त्याच्या काही दिवसाच्या उपजिविकेची रक्कम असते तो उन्हाच्या या झळा सोसत काम करून आपल्या देणगीची पूर्तता करतो पण त्या देणगीचा योग्य विनियोग करणे हे समाजबांधव म्हणून आपली ती जबाबदारी असते. त्या जबाबदारीतून आपण त्या रक्कमेचा विनियोग करतो का ? या दृष्टिकोनातून जेव्हा जयंतीच्या जमा होणाऱ्या निधीकडे जेव्हा पाहतो तेव्हा मनाला चटका बसतो की, खरंच आपण करत असलेला विनियोग त्यातून बाबासाहेबांचे स्वप्न किंवा बाबासाहेबांचे विचार समजत रुजण्यास मदत होईल का ? उन्हाळा झळा सोसून काम करून देणगी देणारा उपासक 10 वर्षानंतर सुद्धा त्याच स्थितीत राहत असेल तर समाज म्हणून इथे आपली आणि डॉ बाबासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नांची हार आहे.

         बाबासाहेबांनी समाजाला संघटित होऊन सर्वच पातळीवर लढा देण्याची शिकवण दिली होती. मग आम्ही संघटित होऊन आम्ही आमच्या सामाजिक, धार्मिक,आर्थिक बाबीवर लढा देत आहोत का ? जयंतीसाठी जमा झालेल्या निधीतून जयंतीसाठी आवश्यक काम करत असताना आपल्या पोटाला भूक लागली तर ती भूक मिटवण्यासाठी त्या जयंतीच्या खर्चातून पैसे खर्च केले जातात. समाजासाठी योगदान देत असताना वेळ देत असताना स्वतःची भूक भागवण्यासाठी आम्ही खिशातून पैसे का सारावेत हा प्रश्न उपस्थित केला जातो ? जयंतीच्या जमा झालेल्या रक्कमेमधून काही रक्कम शिल्लक राहिली तर तीच रक्कम आपापसात वाटून घेऊन स्वतःला चतुर समजणारे महाभाग आपल्या वस्तीत आपल्या समाजात वावरताना दिसतात.मग सांगा अशाने कोणता बाबासाहेबांचा आदर्श आपण पुढे नेणार आहोत पुढील पिढीला कोणता बाबासाहेब सांगणार आहोत ?

         1956 साली बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला त्याचवेळी हिंदू धर्मातील सर्व प्रथांचा त्याग करणे ही आपली जबाबदारी आहे का नाही ? पण आम्ही तसे न करता हिंदू धर्मातील प्रत्येक सण साजरा करतो आणि ते करत असताना मजेशीर कारणे देतो की, आपण कुठं त्यांच्या देवाला जातो आपण कुठे काही करतो फक्त आनंद म्हणून ते सण साजरा करतो. लग्नप्रसंगी हळदीचा सोहळा असो की मार्च मध्ये साजरी होणारी रंगपंचमी असो, रंगपंचमी नंतर पौर्णिमेच्या दिवशी मटण खायला भेटावे म्हणून एक दिवस आधी पौर्णिमा पकडणारे अनुयायी सुद्धा आपल्याकडे काही कमी नाहीत. एवढे सगळे घडत असताना मग आपला हा जयंती साजरा करण्याचा उद्देश तरी काय ?

       जयंती साजरा करण्याचा तुमचा उद्देश काहीही असला तरी एक बाब प्रकर्षाने जाणीव ठेवून यावेळची जयंती साजरी करा की, जयंतीसाठी जमा करण्यात येणारा निधी घेत असताना सर्वसामान्य उपासकांचा विचार करून निधी घ्या. त्यांच्या निधीचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. त्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेऊन जल्लोष करण्याने आपली कोणतीही संस्कृती विकसित होणार नाही, किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामन्यांत रुजणार नाहीत. सध्याच्या पिढीला बाबासाहेब म्हणजे त्रास सहन करून आपल्याला हक्क मिळवून दिले ही फक्त शाब्दिक भावना राहिली आहे. जे चार दोन बाबासाहेबांना महत्व देऊन पुढे येत आहेत ते फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी बाबासाहेब नावाचं भांडवल करून आपली दुकानदारी लावण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळं कोणताच बाबासाहेबांचा विचार भविष्याच्या विकासासाठी, सामाजिक सुधारणेसाठी, आर्थिक आपले धार्मिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वीकारल्या जात नाही. बाबासाहेब हे एक भांडवल आहे त्या भांडवलाचा वापर करून फक्त वैयक्तिक पातळीवर आपण आपला विकास करून घेत आहोत. यापलिकडे बाबासाहेबांचं कोणालाच काहीही देणंघेणं शिल्लक राहिलेलं नाही. बाबासाहेब आणि बाबासाहेबांचं स्वप्न याबद्दल मनात तळमळ असेल तर जातीच स्वरूप आणि जयंतीत होणारी पिळवणूक थांबवणे हे खूप महत्वाचे आहे. त्यातूनच येणारी पिढी बाबासाहेब समजून घेण्याकडे लक्ष देईल अन्यथा कागदोपत्री बौद्ध मनाने हिंदूच राहू, बाबासाहेबांच्या स्वप्नाला मात्र कायमची तिलांजली देऊ यात काहीच शंका नाही असे मला वाटते.

            © जी.संदीप (गोणार,नांदेड)

                    9552803980

Friday, February 13, 2026

"प्रेम की व्यवहार? – तरुणाईसमोरील सामाजिक द्वंद्व"







 प्रेमाचा महिना सुरू झाला आणि चाहूल लागली सर्वांना शरीरात होणाऱ्या बदलातून भावनिक भुकेमधून एक साथीदार मिळवण्याची, मिळविण्यापेक्षा मला पण माझा साथीदार आहे हे गौरवाने सांगण्याची. आजच्या युगात (GenZ) relationship Single म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे अशी मानसिकता तयार होत आहे. त्या मानसिकतेतून आयुष्याच्या 13-14 व्या वर्षापासून मला समजून घेणार, मला भावनिक साथ देणार, सोशल मीडियावर मित्रपरिवारात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी विरुद्धलिंगी साथीदार हवाय ही मानसिकता आज दृढ होताना दिसत आहे. या मानसिकतेतूनच विरुद्धलिंगी आकर्षण होऊन त्यातून एक नात निर्माण होतंय त्याला बेस्ट फ्रेंड किंवा मग बॉय फ्रेंड असे नाव देऊन त्या नात्याला पुढे नेले जात त्यातून प्रेम भावना वाढत जाऊन आजची पिढी प्राथमिक गरजेप्रमाणे प्रेम करणारी व्यक्ती असलीच पाहिजे अशी दृढ भावना घेऊन वावरताना दिसत आहे.

            'प्रेम' ही मानसिक भावना आहे त्या प्रेम भावनेवरच हे जग टिकून राहू शकते कोणत्याही क्षणी केलेला राग द्वेष हा माणसाच्या विनाशाचे कारण आहे. "वैर जिंकावे प्रेमाने,युद्धाने वाढते युद्ध" या उक्तीनुसार प्रेमाने पूर्ण जग जिंकू शकतो. त्यामुळं मानवी जीवनात प्रेम ही भावना अतिशय महत्वाची आहेच. त्याविना माणूस जगूच शकत नाही. माणसाच्या सभोवताली असलेल्या प्रत्येक घटकावर तो प्रेम करायला लागला तर तो नक्कीच समृद्ध नागरिक आणि निसर्ग घडवू शकतो. प्रेमाच्या भावनेविना मानवी जीवन हे दुःखमय होऊन जाईल त्यामुळं प्रेम ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात असते आहे आणि राहीलच त्याविना मानवी जीवन जगणे अशक्यच. एखादा गुन्हेगार, दरोडेखोर जरी असला तरी तो आपल्या कामावर किंवा त्याच्या ध्येयावर प्रेम करतोच.

        पण किशोरवयात आकर्षणाची निर्माण होणारी भावना आणि त्या भावनेतून जे नाते निर्माण होते त्या नात्याला दिलेले प्रेम हे नाव यात जो गोंधळ होतो तो प्रत्येक पिढीने निर्माण केलेलं एक गूढ आहे. वयोमानानुसार शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे विरुद्धलिंगी आकर्षण आणि त्या आकर्षणातून मित्रपरिवारात स्वतःची वेगळी छाप पडण्यासाठी विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत जुळलेलं नातं त्या नात्याला दिलेली प्रेमाची उपमा ते नाते वैयक्तिक पातळीवर टिकवत असताना ते काहीवेळा समाधानकारक टिकते पण बरेचदा ते काही महिन्यातच संपुष्टात येते. त्यामागे मुलगा आणि मुलींची अपेक्षा कारणीभूत आहेत. नात्याची सुरुवात करताना मित्र मैत्रिणींच्या म्हणण्यावरून (अरे बघ ना ती तुझ्याकडेच बघतेय, अगं बघ ना तो तुझ्याकडेच बघत आहे) हे नाते जुळते, ते जुळवत असताना कोणत्याच बाबीचा विचार नसतो, दृष्टीकोन नसतो, सुरुवात केली जाते भविष्यात जे घडेल त्याला सामोरे जाण्यासाठी तयार राहू अशा भूमिकेतून ते नाते पुढे येते काही वेळा फक्त शारीरिक गरजेसाठी काही महिन्यासाठीच नात टिकवलं जात आणि नंतर ते नात संपुष्टात येतं. 

          नात्याची सुरुवात प्रेम या भावनेने होत असेल तर, प्रेमाने जग पण जिंकता येते असे शब्द वारंवार कानावर येत असताना ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली मुलं/मुली प्रेमाच्या नात्याने एकत्रित येऊन पुन्हा ही दूर का जातात ? काही तरुण तरुणींचे प्रेमाचे नाते टिकतात पण सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक भावनेच्या दबावाखाली नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो त्यातून आत्महत्या किंवा हत्या असे प्रकार घडत राहतात. NCRB अहवालानुसार दरवर्षी साधारणपणे 250-300 गुन्हे प्रेम प्रकरणातील हत्येचे घडतात.

          काही महिन्यापूर्वी नांदेड मधील देशभर गेलेला एक हत्येचा प्रकार त्या प्रेम प्रकरणात मुलीने घेतलेली भूमिका. या प्रकरणात चर्चिल्या गेलेले काही मुद्दे जातीच्या बाहेर जाऊन प्रेम कशाला करावं ?, गुन्हेगार पोराला कोणता बाप पोरगी देईल काय ?, या मुद्द्यांमधला दुसरा जे मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे गुन्हेगाराला कोणता बाप पोरगी देईल काय ? तो मुलगा गुन्हेगार घडण्यात काही अंशी मुलीच्या वडिलांचा हात होताच ना कारण तो मुलगा मुलीच्या वडिलासोबतच काम करत होता मुलीकडच्या कुटुंबातील भाऊ वडील हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेच होते ना ? मग एक गुन्हेगार वडील त्या मुलाला सोबत घेऊन काम करतो तो गुन्हेगार मुलीच्या गुन्हेगार वडिलांसोबत राहतो तरी मग वडील त्या मुलाला मुलगी देईल का ? असा प्रश्न का ? राहिला प्रश्न जातीच्या बाहेर जाऊन प्रेम का केलं ?

          उच्च जातीचे समजले जाणाऱ्या जातीतील मूल जेव्हा त्यांच्यापेक्षा खालच्या जातीच्या मुलीसोबत प्रेम करून लग्न करण्याचा विचार करतील तेव्हा ते लग्न लावून दिलं जात का ? लग्न लावून दिलं जात नसेल तर मग त्या मुलासोबत अन्याय्य वागणूक होते का ? याचे उत्तर नाही असेच येईल. मग खालच्या जातीतील मुलाने वरच्या जातीतील मुलीशी प्रेम केलं म्हणून त्याची हत्या करणे हा कोणता न्याय आहे ? प्रेम हे भावनेचा संबंध आहे ते होत असते नियोजनबद्ध केल्या जात नाही. कारण नियोजनबद्ध प्रेम करण्याची शिकवण देण्याएवढे प्रगल्भ विचाराचे आईवडिलांचे विचार नाहीत. जिथे आईवडील आपल्या मुलांमध्ये आपल्या परिसरात विचारांची प्रगल्भता निर्माण करत नाहीत तिथे स्वतःच्या मुलावर काय प्रगल्भतेचे विचार रुजवू शकतील ? पोटजातीत विवाह व्हावेत एवढी प्रगल्भता नसलेले पालक जाती अंतर्गत विवाहास कसे मंजुरी देतील. जातीअंतर्गत किंवा पोटजातीत विवाह करत असताना मुलगा किंवा मुलगी नोकरीने उच्च पदावर आहे का हे मात्र नक्की विचारत घेतलं जात आणि तिथे सगळे विरोध गळून पडतात. शेवटी प्रेम हरते आणि व्यवहार जिंकतो.

         या सर्व व्यवहाराचा विचार करताना आजच्या तरुणाईने आर्थिक,सामाजिक आणि धार्मिक बाजू लक्षात घेऊन प्रेमाचा व्यवहार केला तर उत्तम राहील असे वाटते. प्रेम ही संकल्पना जरी भावनिक असली तरी त्या भावनेला व्यवहाराच्या तराजूत तोलून तुम्ही व्यवहार केला तर ते प्रेम नक्कीच तुमचे होईल अन्यथा तुमचे प्रेम हे परक्याचे झाल्याविना राहणार नाही.

        प्रेम करत असताना समोरच्याची जात, धर्म, त्यांची आर्थिक पातळी आणि सामाजिक दर्जा हे पाहूनच प्रेम करावं अशी सामाजिक विचारसरणी निर्माण होत आहे असे दिसते. तुमच प्रेम हे तेव्हाच स्वीकारलं जाईल जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा कमवण्यात किंवा सामाजिक पातळीवर वरचा असेल. जात खालची असली आणि विचारसरणी प्रगल्भ आणि सोबत आर्थिक पातळी उच्च असली की लगेच तुमचे प्रेम समाजमान्य होऊ शकते समाजमान्य जरी नाही झाले तरी कुटुंबमान्य नक्कीच होऊ शकते त्यामुळं तरुणाईने प्रेमाच्या भावनेत त्या प्रवाहात जात असताना समोरच्याची जात, धर्म, आर्थिक पातळी पाहून प्रेमाच्या होडीत प्रवेश करावा तेव्हाच ते प्रेम आयुष्यभरासाठी टिकू शकेल. अन्यथा प्रेम संपेल किंवा प्रेमात माणूस संपेल. प्रेम चिरंकाल टिकवायचे असेल या मानवी जन्माचा आनंद घेऊन स्वतःसोबत इतरांच्या आयुष्यासाठी काही करायचे असेल तर आजच्या तरुणाईने स्वतःला विशिष्ट शिस्त लावून घ्यावीच लागेल. तरच या प्रेमरूपी सुरुवातीला एक सुंदर वळण मिळून आयुष्य आनंदी होऊ शकते.

© जी.संदीप ( गोणार,नांदेड)

           9552803980

Saturday, August 16, 2025

स्वातंत्र्य हे असे कसे ?







#Sunday_specil



एका दिवसाच्या स्वातंत्र्य दिनानातून जर बाहेर आले असाल तर या गोष्टीकडे जरा लक्ष द्या देशावर जर खरच प्रेम असेल तर स्वातंत्र्यदिनीच काय घडलं आहे याकडे पण मेंदू उघडा ठेवून पहा जरा.

        पहिले चित्र स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वीएकमहिन्यापासून आंदोलन सुरू असते त्या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नाही म्हणून आंदोलक स्वातंत्र्य दिनी आपले म्हणणे राजकीय नेत्याकडे घेऊन जाऊ पाहतो पण त्या आंदोलकाला स्वातंत्र्य दिनी(स्वदेशीयांच्या सत्तेत) सुद्धा अशी लाथ कमरेत बसते. प्रश्न घेऊन समोर येणे हा गुन्हा आहे ? ब्रिटिशांची सत्ता असताना असा त्रास स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्रयोध्दांना दिला जायचा पण परवाच हा प्रसंग कोणत्या गुर्मीत भारतीय जनतेला भोगावा लागला हे कळायला मार्ग नाही. मग या जनतेने आता कोणते चलेजाव चे आंदोलन करायचे आणि कोणाच्या विरोधात ? आंदोलक चुकला असेल त्याने काही चूक केली असेलच पण म्हणून या स्वातंत्र्यात त्याच्या सन्मालाला अशी लाथ घालाल काय ? ते पण त्याच्या चिमुरड्या बालकासमोर ? अरे नालायकांनो किती वर्ष स्वातंत्र्याचा उपभोग न घेता फक्त स्वातंत्र्याची गोडवे गात बसायची ? गरिबीतून वर आलेला प्रशासकीय अधिकारी सुद्धा असा गुर्मीत वागायला लागला तर लोकशाही कधीच या देशात रुजणार नाही. फक्त कागदोपत्री काही प्रमाणात चालू राहील.

         दुसरे चित्र शेतकरी आंदोलनाची दखल घेतली जात नाही हे लक्षात येताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आंदोलक नदीत उडी मारून आपला जीव गमावतो. स्वातंत्र्यात प्रशासनातील कर्मचाऱ्यांसमोर जर असे करण्याची वेळ येत असेल तर या स्वातंत्र्याचा अंमल किती योग्य मार्गाने सुरू आहे यावर विचार करण्याएवढी लायकी असेलच तुमची. 

         तिसरे चित्र स्वातंत्र्य दिनादिवशीच राष्ट्रध्वज जमिनीवर रेखाटून त्यावर विशिष्ट ध्वज उभा केला जातो.(हे चित्र कुठले आहे याबद्दल माहिती उपलब्ध नाही.कोणाकडे सविस्तर माहिती असेल तर कळवावे). स्वातंत्र्य दिनी अशा घटना उघडकीस येतात आणि त्यावर काहीच कार्यवाही होत नसेल तर तुमच्यात देशभक्ती किती आहे हे आपण दाखवून देताय. असा राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करून  ईतर कोणत्याही रंगाचा ध्वज वर असता तर हेच देशभक्तीच्या नावाने  पिपाणी वाजवणारे आज आकाश पाताळ एक केले असते. पण आज जेव्हा देशभक्तीचे ज्ञान पाजणारेच जेव्हा अक्कल गहाण ठेवतात आणि आपल्या रक्तात किती देशभक्ती आहे हे सिद्ध करतात तेव्हा मात्र त्यांच्या देशभक्तीची कीव येते.

       ऐन स्वातंत्र्यदिनी या गोष्टी घडत असताना आम्ही कोणता स्वातंत्र्य दिन साजरा केला मग ? नैतिकस्वातंत्र्य जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वतंत्र हे काडीमोलच आहे. स्वातंत्र्याचा प्रभावीपणे अंमल व्हावा म्हणून लोकशाही स्वीकारली पण या लोकशाहीत मतदान सुद्धा धमक्या देऊन घेतले जाते. वोटर लिस्ट मध्ये मतदार दाखवून मतदार बूथ वरील कर्मचाऱ्यांना धमकी देऊन त्यांना बाजूला सारून हवं त्या उमेदवाराला मतदान करून घेतल्या जाते. मतदानाबद्दलच हे सत्य कोणीही नाकारणार नाहीच. तरीसुद्धा प्रत्येक जण शांत राहून पाहत बसतो लोकशाहीत कोणीही निवडून आले तरी आमची चूल चालवण्यासाठी आम्हालाच कष्ट करावे लागतात असे म्हणत नशिबाला दोष देऊन बाजूला होतो.

       नशीब आणि आपली चूल चालवायला आपल्यालाच कष्ट करावे लागतात हे जेव्हा या सामन्यांच्या डोक्यातून जाईल तेव्हाच लोकशाही रुजण्यास खरी सुरुवात होईल. तुमची चूल चालवायची असेल तर त्यासाठी तुमच्या हाताला रोजगार हवा, तो रोजगार कोणता करावा यासाठीच दर्जेदार शिक्षण हवं शिक्षण. या दोन्ही गोष्टी करण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आहे. यात तुमच्या नशिबाचा काहीही हात नाही. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत या स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. हे स्वातंत्र्य असून नसल्यासारखेच आहे असे म्हणावे लागेल.

© जी.संदीप.(गोणार,नांदेड.)

         9552803980

Friday, February 14, 2025

नक्कीच असावं कुणीतरी !

 नक्कीच असावं कोणीतरी !


नक्कीच असावं कोणीतरी...

तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची

जाणीव करून देऊन

तुमचा सन्मान वाढवणार.


नक्कीच असावं कोणीतरी...

तुमच्यातील भीतीला/कमीपणाला नाहीस करून

संघर्षमय आयुष्यासाठी

तुमचं मनोबल वाढवणार


नक्कीच असावं कोणीतरी...

प्राण्यांप्रमाणे जीवन जगण्याऐवजी

प्रत्येकाला सन्मानाने जगता याव

यासाठी आयुष्याचे क्षण वेचणारं


नक्कीच असावं कोणीतरी...

मनात कल्पनेचे महाल न बांधता

संघर्षमय वास्तवाच्या झोपडीत

आयुष्याचा प्रवास आनंदाने करणार


नक्कीच असावं कोणीतरी...

पारंपरिक प्रथांना छेद देऊन

माणूस म्हणून जगण्यासोबतच

इतरांनाही तशीच प्रेरणा देणार.

              © संदीप गोणारकर..✍️ ❤️ 

                   9552803980


नक्कीच असावं कुणीतरी 

भरकट लेल्या मनाला आधार देणार 

चुकलेल्या वाटेला मार्गस्थ करणार 

सुख दुःखात प्रेमाने कुरवाळणार


                    -जगदीश गोणारकर


नक्कीच असावं कुणीतरी,

सुकलेल्या मनाला फुलवणार,

नैराश्यात बुडालेल्या अंतकरणाला

आशेचा दीपक दाखवणारं.....

                      _संजीवनी काळे


कुणीतरी असावं आपल्याला आपल म्हणणार,

आपल म्हणताना आपल्यातलं आपलेपण जपणार

कुणी तरी असावं, साद घालणार

साद घालताना हळूच लपणार...

कुणी तरी असावं.....😊

                           -विशाखा वाघमारे...


असावं कुणी तरी,


जगाने नाकारल्यावर,

आपल्याला स्वीकारनारं..!

जगाने पाठ फिरविल्यावर,

पाठीशी उभं राहणारं..!


असावं कुणी तरी,


स्वार्थाला नाकारून,

निःस्वार्थ प्रेम करणारं...

आयुष्याच्या काळरात्री,

हातात हात धरणारं...!


असावं कुणी तरी,


दबलेल्या भावनांना,

वाट मोकळी करणारं..!

फुटलाच जर अश्रूंचा बांध,

तेव्हा घट्ट मिठी मारणारं..!


खरचं असावं कुणी तरी..!


                      - उमेश राजभोज❤️✍️


नक्कीच कुणी तरी असावं

"काय झालं" आपुलिने विचारणार

सुखात दुःखात साथ देणार

कोणत्याही परिस्थितीत सोबत राहणार


नक्कीच असावं कोणीतरी...


                                 -जीवन ढगे


" नक्की च असावा कोणी तरी 


तु चल पुढ मी आहे म्हणून

हातात हात घेऊनी बळ देणारे 


नक्की च असाव कोणी तरी

संघर्षात डोळे पुसून 

यशात अभिमान बाळगणार " 

📚♥️💫


                 - प्रतीक्षा धडेकर


नक्कीच कुनितरी असाव .॥

व्याकुळलेल्या मनाला अलगद सावरण्याला

अन बेधुंद झालेल्या जगण्याला आवरायला .

नक्कीच कुनितरी असाव॥

मनातील चार गोष्टी एकायला 

अन मनातील चार गोष्टी सांगायला

नक्कीच कोनीतरी असाव

हळव्या मनाला सावरायला

अन बावळ्या मनाला आवरायला ।

नक्कीच कोनितरी असाव

                      - विलास राऊत


नक्कीच असावं कुणीतरी

तुमच्या छोट्या यशावर

मनापासून आनंद मानणारं

आणि अपयशातही तुम्हाला

सांभाळून घेणारं...


नक्कीच असावं कुणीतरी

जीवनाच्या वाटचालीत

प्रेरणा देणारं,

तुमच्या स्वप्नांना बळ देणारं...


नक्कीच असावं कुणीतरी

तुमच्या सुखात सहभागी होणारं

आणि दु:खातही हात द्यायला

समोर उभं राहणारं...


नक्कीच असावं कुणीतरी

ज्याच्याशी मन मोकळं

करता येईल,

आणि तो तुमचं ऐकून

समजून घेईल...


*प्रा.जयपाल कांबळे*

संशोधक विद्यार्थी

नांदेड

Tuesday, February 13, 2024

14 फेब्रुवारी ..?

 



आम्ही फक्त गुन्हा घडला की,
त्यावर हळहळ व्यक्त करतो.
तो का घडला, कोणी घडवला
याकडे मात्र कानाडोळा करतो.

पुलवामा घडला, अथवा असो घडवला गेला ?
पण त्यात मारले गेले आमचे सैनिक
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहने
एवढेच शिल्लक आहे का आमचे कर्तव्य नैतिक ?

त्यांच्या नावाने प्रेम दिनाच्या दिवशीच
काळा दिन साजरा केला जातो
अशा प्रतीद्वंदी दिवस साजरा करण्याने
फक्त द्वेशच मनात साठवला जातो.

नसेल साजरा करायचा प्रेम दिन
नका करू कोण तुम्हाला सक्ती केलंय ?
पण सैनिकांच्या नावाखाली
काळा दिन साजरा करण्याने काय प्राप्त केलंय ?

प्रत्येक वर्षी काळा दिन साजरा करून
सैनिकांसाठी काही हासिल झालंय का ?
काळा दिनाचा हट्ट सोडून दोषींना सजा देण्याचा विचार
कधीच डोक्यात येत नाही तुमच्या, अस का ?

सैनिकांच्या जीवांचा खरचं कळवळा आहे की
फक्त एक दिवसाची सहानुभूती दाखवायची ?
पारंपरिक संस्कृतीच्या नावाखाली,
घडत असलेल्या प्रसंगात आपली दंडेलशाही पुढं आणायची ?

ज्यांच्या बळावर हे असले थेर तुम्ही करताय
त्यांना एकदा विचारून बघा.
त्या रोड वर तेवढा शस्त्रसाठा आला कसा ?
नाही मिळणार उत्तर, पण त्यांच्या तोंडावरचे भाव नक्की बघा

मग तुम्ही समजून घ्या की,
काळा दिन किती दिवस साजरा करायचा ?
उगाच एखाद्या बाबीला विरोध करण्यासाठी,
निरर्थक का आग्रह धरायचा ?

अरे तुम्ही या दिनाला विरोध करण्याचं कारण हे तर नाही ना,
तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रियशी न असणे ?
असल काही असल तर सावरा जरा स्वतःला.
आयुष्यात प्रेमाविना काहीही टिकन अशक्य आहे,
हे समजावून सांगा मेंदू आणि मनाला.

हा प्रेम व्यक्त करण्यात त्यांचं चुकत असेल खूप काही,
म्हणून काय मग त्या दिनाला विरोध करायचा का ?
एवढाच तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला आवडत नसेल
तर अन्य मार्गाचा वापर करायचा ना ?

© जी.संदीप (गोणार,नांदेड)
         9552803980

Friday, February 2, 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती 23-24 नांदेड.

 





शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून स्वधार फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरून त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह समाजकल्याण कार्यालय येथे निर्धारित तारखेपर्यंत सबमिट करावे लागणार आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करून उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिसणाऱ्या ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर तयार झालेल्या आयडी पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन करून पुढील प्रक्रिया करावी. 


 त्यासाठी आवश्यक असलेली विद्यार्थी माहिती

१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:

२. वडिलांचे संपूर्ण नाव :

३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :

४. आधार कार्ड क्र. :

५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :

६. अर्जदाराचे वय :

७. अर्जदाराचे लिंग :

८. आईचे संपूर्ण नाव :

९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :

१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र

११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :

१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :

१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :

१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :

१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )

१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:

१७. अभ्यासक्रम :

१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :

१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :

२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):

२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:

२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.

• प्रवेश वर्ष / दिनांक

• उत्तीर्ण महिना / वर्ष

• प्राप्त गुण

• एकूण गुण

याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.

बँकेची माहिती

• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव

• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :

• शाखा

• खातेक्रमांक

• IFSC code

अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे

१ अर्जदाराचा फोटो

२ अर्जदाराची सही

३ जातीचा दाखला

४ आधार कार्डाची प्रत

५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.

६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र

७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.

८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :

९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :

१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .

११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :

१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :

१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला

१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :

१५ शपथपत्र / हमीपत्र :

१६ भाडे करारनामा :



रीनिवल अर्जासाठी :-

०१) चालू वर्षाचे बोनाफाईड

०२) मागील वर्षाचे गुणपत्रक

०३) जातीचा दाखला

०४) चालू वर्षाचे उत्पंनाचे प्रमाणपत्र

०५) बँक पासबुक

०६) भाडे करारनामा

०७) रूमचा जिओग्रफिकल लोकेशन असलेला फोटो

०८) मेस/भोजनालय बिलाची पावती

०९) रीनीवल अर्ज सादर करत असताना हमीपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

वेबसाईट :- syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx


शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दिनांक

1 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024. पर्यंत  महाविद्यालयात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जमा करावे.



फॉर्म भरण्याची दिनांक वाढवण्यात आली आहे, वाढीव दिनांक 15 मार्च 2024 आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.





प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी नवीन फॉर्म भरावा. तो भरत असताना आपल्या आपल्या मागील वर्षी दिलेल्या परीक्षेचा मार्कमेमो सोबत जोडावा.



Wednesday, January 24, 2024

मतदार राजा




     भारतात कोठेही असलास, कोणत्याही जाती धर्मातील असलास, कितीही गरीब अथवा श्रीमंत असलास तरी तुझी किंमत कमी होणार नाही. वरील कोणत्याही गोष्टीवरून किंमत कमी जास्त होणार नाही. किंवा एखाद्याला जास्त किंमत मिळणार नाही. हा सन्मान तुला लोकशाहीने दिला आहे. सरपंच ते लोकसभा सदस्य निवडणूक कोणतीही असो, उमेदवार तुझ्या दाराला येतो, तू गरीब आहेस किंवा खालच्या जातीतला आहेस म्हणून तो तुझा सन्मान करणार नाही असं नाही. गावातील गडगंज संपत्ती असलेला व्यक्ती असो अथवा प्रचलित स्वघोषित उच्च कुलीन जातीतील व्यक्ती असो अथवा फुटपाथवर आपल आयुष्य जगणारा सामान्य भिकारी असो, या सर्वांना समान स्थरावर आणणारी ताकद म्हणजे मताधिकार होय. 

       लोकशाहीत मताचा अधिकार तुमचं भविष्य ठरवत असते. तुमचं भविष्य हे नशीब किंवा तळहातावरील रेषा ठरवण्याचा काळ 1956 सालीच नाहीसा झाला. एक नविन बळ तुमच्या एका बोटात संविधानाने दिलं तो अधिकार सन्मानाने बजावा. तुमचं भविष्य उज्वल घडवण्यासाठी हा मताधिकार आहे.

        भावकीतील उमेदवार आहे, एक कोंबडी आणि दारूची बॉटल आठ दिवस तुला भेटते म्हणून, धर्मासाठी ते मोठ मोठाले मंदिर बांधतील, धर्माच्या नावावर अन्नछत्र सुरू करतील, तुला फुकटच खायला देतील, तुला तुझ्या कुटुंबाला सबसिडी च्या नावावर पैसे देतील. हे असल सगळ तुला स्वतः कमवता येते, धर्माची श्रद्धास्थान निर्माण करणं हे धर्माचे अनुयायी म्हणून आपली जबाबदारी आहे. ते उभारण्यासाठी आपण सक्षम होऊ एवढं कवण्याच सामर्थ्य आणि साधने उपल्ब्ध करून देणं हे त्यांची जबाबदारी असते हे तू ओळख आणि असे धर्म, मटण दारू, फुकटचे पैसे देणाऱ्या उमेदवाराला तू तुझ मत कधीचं देऊ नकोस.

       आज तू मला वर्षाला 12000, मोफत राशन मिळत आहे, मझ्या धर्मातील देवांचे मंदिरे बांधली जात आहेत, याची जाणीव ठेवून तू मतदान करशील तर तुझ्या येणाऱ्या पिढीसाठी काय आदर्श ठेवशील.

         आयुष्यात जन्म घ्यायचं सत्ताधारी जे फुकट देतील त्यावर जस जमेल तस आयुष्य जगायचं. स्वतः कष्ट करण्याच्या संधी ची मागणीच करायची नाही का ? देशात तरुण वर्ग म्हणून मिरवत असताना तो तरुण सोशल मीडियावर आपल नको ते मत व्यक्त करून वाद घडवून आणत असेल आणि त्यातच तो गुंग राहत असेल तर मग त्याच्या आयुष्यच काय होणार ? आज आई वडील म्हणून तुम्ही त्याची जबाबदारी शेवटच्या श्वासापर्यंत उचलाल पण त्यानंतर त्याच आणि त्याच्या कुटुंबाच काय होणार ? नशिबावर सोडून देणार का ?

        तुमच्या येणाऱ्या पिढ्या दुबळ्या होऊ द्यायचा नसतील, सन्मानच जीवन जगायचं असेल तर त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणा. खाजगी शिक्षण नाही तर शासकीय शिक्षणाचे मार्ग खुले झाले पाहिजेत याकडे लक्ष द्या. शासनाने नागरिकांना फुकट काही देण्यापेक्षा त्यांच्यात  कमवण्याच बळ आलं पाहिजे. उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षणानुसार रोजगार मिळाला पाहिजे, रोजगाराच्या संधी निर्माण करण हे सर्व शासनच काम आहे. तुमच्या नशीबाचा यात काहीच दोष नाही. नशिबावर दोष देऊन तुम्हाला गुलाम ठेवण्याचं काम व्यवस्थेने केले आहे.

        या सगळ्या गोष्टी ज्ञात करून घेऊन व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला म्हणून तुम्हाला शिक्षनापासून दूर ठेवलं जातं. शिक्षणात तुमच्या बुद्धीचा विकास होणार शिक्षण दिलं जातं नाही ? तुम्ही कारकुनी कर्मचारी व्हाल हीच व्यवस्था निर्माण केली जाते ? त्या व्यवस्थेत तुम्ही नशिबाला दोष देऊन मोकळे होता.

        असं होऊ द्यायचं नसेल तुम्हाला तुमचं सन्मानाच आयुष्य जगायचं असेल तर आज संकल्प करूया, मी माझ मत कोणत्याही परिस्थिती विकणार नाही, मी माझं मत धर्माच्या नावावर कधीच देणार नाही, मी माझं मत त्याच उमेदवाराला देईल जो इथल्या नागरिकाच्या आयुष्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करेल, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासोबत त्याच्या साठी शिक्षणाच्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करेल, कोणत्याही पद्धतीचं कोणतीही गोष्ट फुकट देणार नाही, वस्तूची किंमत चार रुपये ठेवून सबसिडी च्या नावावर एक रुपया देऊन आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करणार नाही. बाजारातील कोणतीही वस्तू योग्य त्याच दरात मिळेल, त्या वस्तूच्या कच्च्या मालाची निर्मिती करणाऱ्याला योग्य दर दिल्या जाईल. देशातील कोणताही कामगार असो वर्ग एक ते वर्ग चार किंवा संघटित असंघटित कामगार असो या सर्वांना समान सन्मान देण्याची व्यवस्था जे शासन करेल त्यांनाच या मताधिकाराद्वारे निवडून देईल. अन्यथा त्या शासनाला मी सत्तेत संधी देणार नाही.

        असा विचार कराल तरच संविधानाने तुम्हाला दिलेल्या मताच्या अधिकाराचा सन्मान होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सन्मान मिळेल.  लोकशाहीची योग्य वाटचाल सुरु राहील. पर्यायाने समृद्ध भारत घडेल भारतातील प्रत्येक नागरिक सन्मानाने जगेल. भारतातील प्रत्येक नागरिक जर सन्मानाने जगाला तर देशाचा जि.डी.पी. उचावेल सोबतच दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल मग देश सुजलाम सुफलाम होण्यापासून कोण रोखेल ?

      हे सर्व घडण्यासाठी तुम्ही एक मतदार राजा आहात म्हणून तुम्ही तुमची योग्य जबाबदारी पार पाडा.

©जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Wednesday, January 17, 2024

स्वतःचा मेंदू वापरा

 




मित्रांनो,

जरा डोळस व्हा रे !

देव ही दुय्यम गरज आहे

जरा प्राथमिक गरज ओळखा रे.


अश्मयुगात समूहाने राहताना पोटाच्या भुकेनंतर

शारीरिक भुकेकडे लक्ष दिलं जायचं

अविकसित काळातील लोकांना समजलं

मग तुमच्या डोक्यात कधी यायचं ?


बुद्धिवान प्राणी म्हणून

विविध शोध लावत गेलो

कधी स्वतः वेडे ठरलो तर

कधी दुसऱ्यांना वेड्यात काढण्यास धन्य मानलो.


विविध शोध लागत असता

मनोरंजनावर येऊन ठेपलो

मानवी मनातील भीतीचा आधार घेत

देवाचा शोध लावून ठेवलो.


तो जर आहे तर,

जन्मावेळीच आपल्या मनात विचार टाकेल

त्याची आराधना करण्यासाठी

सगळे मार्ग आधीच सांगून टाकेल


मानवाने निर्मिलेल यंत्र सुद्धा

कमांड दिली तसेच काम करते

तशाच कमांड देवानेही आपल्यात दिल्या असत्या

हे तुम्हास का नाही उपजते ?


देव आहे हे मान्य करायचं

बिनधास्त करा ना रे !

त्या देवासाठी तुम्ही आप आपसात भांडता

हे तुमच्या देवाला तरी मान्य होईल का रे ?


देवाच्या नावावर तुम्हाला ईथ

एक मेकांत लढवल जात

ती लढाई चालू असताना

संविधानिक हक्क अधिकारापासून दूर ठेवलं जातं


हक्क अधिकारच मोल

तुम्हा कधीच समजू दिलं जात नाही

कारण, एखादी गोष्ट मिळत नसेल

तर रुजवलं जात की, "ते तुमच्या नशिबातच नाही."


त्या नशिबाचा निर्मिक(बनवणारा) देव असेल

तर तो देव चुकीचा आहे का ?

एखाद्याकडे गडगंज संपत्ती द्यावी आणि

दुसऱ्यास एकवेळच्या जेवणासाठी मोताज ठेवावं का ?


गडगंज संपत्तीवाला निडरपणे शेकडो चुका करतो

तरी त्याला त्याच्यावर देव कोपण्याची भीती नसते

पण सामान्य गरीब माणूस रस्त्यावरून चालताना

मुंगीवर पाय पडत असताना हजार वेळा विचार करतो.


शुद्ध निर्मळ अशा गरीब मनावर

देव तुमचा कोपतो का रे ?

गरिबांना तासो-न-तास रांगेत उभा करतो

आणि श्रीमंतांना सेकंदात दर्शन देतो असे का रे ?


अशा तुमच्या एका देवाच

भल मोठ मंदिर उभारल्या जातंय

ते मंदिर पूर्ण होण्याआधीच तिथं

म्हणे त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जातेय


तिथे त्या देवाचा मोठेपणा करायचाय

का ? राजकारण्यांना मते मागायचीत ?

कारण ! प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर सुद्धा

कामाच्या कारणास्तव देव दर्शन बंद राहील

राजकारण्यांचाच जर असेल हा डाव

तर तुमच्या भावनेशी खेळणाऱ्यांना करून टाका पायचित


किती म्हणून त्या राजकारण्यांची बाजू घेत

तुमच्या विकासाचे मार्ग बंद करून घेणार

धर्माच्या नावावर तुमचा वापर करून घेऊन

ते तुमच्या पिढ्यांच वाटोळ करून टाकणार.


हेच बघा ना, तुम्ही आरक्षणासाठी लढत असताना

कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढून ते मोकळे झाले.

आरक्षण जरी तुम्हा दिले तर हे लक्षात घ्या

त्याच्या अंमलबजावणीचे सगळे रस्ते बंद केले.


त्यामुळं धर्माच्या नावावर होत असलेलं तांडव

थांबवण्यासाठी त्यांना विरोध करा रे

अन्यथा पुन्हा परकियांची

गुलामी स्विकाराया तयार व्हा रे.


त्यावेळी तुम्ही पुजलेला

कोणताही देव धावून येणार नाही

हे इतिहासावरून सिद्ध होतंय

मी मनाच काहीही सांगत नाही


इतिहासावर नजर टाकाल तर

मानवी क्रांत्याच निदर्शनास येतील

कोणत्याही देवाने तुमची सुटका केली नाही

याची पावलोपावली दाखले दिसतील


देव मानायचा का न मानायचा

हे तुमचं स्वातंत्र्य अवडीने जपा

देवाच्या नावावरील गोष्टीत स्वतःला किती गुंतवायच

हे ठरवण्यासाठी मात्र सदैव स्वतःचा मेंदू वापरा.

©जी.संदीप (गोणार,नांदेड.)

           9552803980

Friday, January 12, 2024

हे तरुणा भवितव्य तुझ...

 




सत्याचा आव आणि संघर्षाचा घाव आहे तरुणाई, 

अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारा आवाज आहे तरुणाई, 

देशाचा स्वाभिमान व कणा आहे तरुणाई 

जर भेटली तरुणाईला योग्य वेळी योग्य साधने तर,

 देशाचा भविष्यकाळ सुवर्णाक्षरात लिहून टाकेल ही तरुणाई.


जगभरात मिरवतो आम्ही अभिमानाने

सर्वात तरुण देश आहोत म्हणून,

पण तरुणाई इथली भरकटली आहे

योग्य व अचूक दिशा नाही म्हणून.


धर्म-जात यांत गुरफटवल्या जातेय

इथल्या बहुतांश तरुणांना

मग मिशन 20-20 अधुरे राहिल्याचे

का दुःख होणार नाही कलामांना ?


तरुणाई भरकटण्यास राज्यव्यवस्था जबाबदार आहे

माँ साहेबांसारखा मार्ग दाखवण्याऐवजी

जात-धर्मा सोबत सोशल मीडियाची अफू

तरुणांना इथल्या पाजवल्या जात आहे.


त्यातूनच ही तरुणाई ठरत आहे अक्कलशुन्य व बिनडोक

सम्यक विचार गेले हे विसरून

सोशल मीडियाद्वारे मोबाईल डाटा वापरत 

पारंपरिक विषयात बसलेत आपले नाक खुपसून


अशा तरुणाईला कसे समजावे आदर्श ?

देशाचा स्वाभिमान व कणा ?

याची जाणीव तुज होईल का रे ? 

आयुष्यात कधी तरी तरुणा ?


तुला अस घडवण्यात जी व्यवस्था जबाबदार आहे

तिला प्रतिप्रश्न करायला शिकशील का ?

आजच्या युवा दिनी तरुण असण्याच भान ठेवून

व्यवस्थेला वाकवण्याची ताकद स्वतः मध्ये निर्माण करून घेशील का ?

२*२ च्या जागेत दिवस रात्र उद्याच्या उज्वल भविष्याचे

स्वप्न घेऊन पुस्तकांसोबतच जगणारा तू

त्याच भविष्याची राखरांगोळी करणाऱ्या शासनाला 

का डोक्यावर घेऊन मिरवतोस तू .


अरे वेड्या !  धर्मप्रेमी असलेला तू,

तुला अजून कस नाही कळत ?

ते धर्मासाठी नाही स्वतः ला हव्या असलेल्या खुर्चीसाठी,

तूला गर्व असलेल्या धर्माचा वापर करतात.


त्या शासनाला जाब विचारण्यासाठी 

स्वतःला सक्षम बनवत रहा.

धर्माला लावून आग माणूस म्हणून जगण्यासाठी 

व्यवस्थेला धारेवर धरत रहा.


हे तरुणा,

धर्म तुला सन्मान देऊ शकत नाही रे !

त्यासाठी तुलाच उत्तम कर्तव्य करावे लागेल.

त्या उत्तम कर्तव्यासाठी 

संधी निर्माण करणे शासनाचे आहे कर्तव्य

ही बाब ओळखून व्यवस्थेला बोटावर नाचवण्याच

बळ तूला अंगीकाराव लागेल.


व्यवस्था निर्माण करण्याच सोडून देऊन 

तू व्यवस्थेत सामील होऊ नकोस रे !

व्यवस्थेचा गुलाम होऊन वागण्यापेक्षा

व्यवस्थेला झुकवायला शिक रे !


आयुष्यात कर्तव्य सगळ ठरवत असते,

नशिबाच काहीच नसत आपल्या आयुष्यात देण-घेण रे !

आवश्यक त्या संधी आणि आपले प्रयत्नच  

आपला विकास करतात हेच आपल नशीब रे !


:-  जी.संदीप(गोणार, नांदेड.)

९५५२८०३९८०

Monday, November 6, 2023


 पुजारी व्हायचं असेल तर तुम्ही ----- धर्माची दीक्षा घेतलेले असेलच पाहिजे. तरच तुम्हाला पुजारी होता येईल. हे अघोषित आरक्षण नव्हे का ? मुळात आरक्षणाची सुरुवात इथूनच तर झाली आहे ना. मग हे पिढ्यानपिढ्या स्वतःकडे ठेवलेलं आरक्षण दिसत नाही का ? 

        पुजारी व्हायचं असेल तर विशिष्ठ पद्धतीची पूजा करता आलीच पाहिजे, तरच पुजारी होता येईल. अन्यथा नाही, तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर तुमची नियुक्ती केली जाईल. पण तुम्ही विशिष्ठ धर्मातील विशिष्ठ जातीचे असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही त्या विशिष्ठ जातीतील असाल त्यासाठी आवश्यक काही पात्रता नसेल तरी ती तुमच्यात विकसित केली जाईल. पण त्यासाठी तुम्हाला त्या विशिष्ठ जातीत असल्याचे सिद्ध करावे लागेल.

        हे जे अघोषित आरक्षण आहे ते कशाच्या आधारावर आहे ? या भेदाचे कारणीभूत कोण आहेत ? एखाद्याला पूजा करता येत नाही पण त्याची इच्छा आहे ते काम करण्याची मग त्याला संधी मिळेल का ? तो धर्माने हिंदू आहे पण जात वेगळी आहे. त्याला संधी मिळेल का ? नाही मिळणार ना ? का नाही मिळणार ? या प्रश्नांचे उत्तर जर तुम्ही शोधाल तर तुम्हाला आरक्षणाचे मूळ कुठे आहे ते कळेल. 

          आरक्षणामुळे काही समजातील विद्यार्थी विशिष्ठ नोकरीसाठी प्रशिक्षित नसताना त्यांना नोकरीवर घेतले जाते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षित केलं जातं. कारण त्या समाजाला सुद्धा अभिमानच जगणं बहाल करायचं असतं, भारतातील प्रत्येक नागरिक हा समान पातळीवर यावा त्यांना संधी मिळावी. ज्यांना संधी दिली जात नाही  त्यांना संधी देण्यासाठी म्हणून आरक्षणाची वहिवाट निर्माण केली गेली आहे.

         तसेच आरक्षण या पुजाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा असते पण त्याला जात आडवी येते. तुम्ही जर त्या विशिष्ट जातीतील नसाल तर तुम्हाला पुजारी होण्याचा काही एक अधिकार उरत नाही. तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्हाला ती संधी मिळणारच नाही. त्याच धर्मातील व्यक्तीकडे पात्रता नसेल, तरी सुद्धा त्याला ती संधी दिलीच जाते. पण इतर धर्मियांना ती संधी देणे शक्यच नाही. मग हे आरक्षण कोणासाठी आणि कशासाठी आहे ?

         या सर्व बाबींवर जर विचार केला तर सरळ एक मुद्दा लक्षात येतो की, आरक्षण हे आजचे किंवा संविधानातील नाही तर हे आरक्षण तुमच्या पारंपरिक संस्कृतीत रुजलेले आहे. संविधानाने दिलेल आरक्षण संपवायचे असेल तर आधी हे अघोषित आरक्षण संपवावे लागेल. मग कुठे या आरक्षणाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला  प्राप्त होईल. अन्यथा तुमच्या आरक्षण बंदीच्या गाजराच्या पुंग्या मोडून खाल्याविना कोणीच राहणार नाही हे लक्षात असू द्या.

शेवटी बोलायला भाग पाडलच तुम्ही !




काही मुद्दे, काही जणांची मानसिकता विचारात न घेता गप्प राहिलो होतो. आरक्षण म्हणाजे काही जणांना फक्त बौद्ध समाजचं दिसतो. पण हा चष्मा उतरवून टाका मित्रांनो. बौद्ध समाजाचा विकास होण्यास जेवढं आरक्षण कारणीभूत आहे त्यापेक्षा जास्त बाबासाहेबांनी दिलेला मानवतावादी विचारसरणीचा बुद्धांचा धम्म आणि  सन्मानाने जगण्याचा बाबासाहेबांनी दिलेला संदेश(आदेश). बुद्धांची विचारसरणी आणि बाबासाहेबांचा संदेश सोडला तर आरक्षण एससी संवर्गातील 59 जातींना आरक्षण आहे. 58 जातींना सुद्धा बौद्धाएवढेच आरक्षण आहे. पण त्यांचा विकास झाला नाही. मग आरक्षण ही एकच गोष्ट विकासात कारणीभूत आहे असे तुम्हाला वाटते का ? त्याबद्दल नक्कीच विचार व्हावा.

          *घोड्याच्या शर्यतीत गाढवे सुद्धा जिंकायला लागलीत, 2 रुपये किलो गहू आणि 2 रुपयाच्या तांदळासाठी नाही मागत आरक्षण.* आरक्षणाचा आणि राशन दुकानावर भेटणाऱ्या मालाचा काय संबंध हेच कळत नाही. या वाक्यावरून कीव येते तुमच्या त्या विद्वत्तेची 😅 

    पण त्या वाक्यातील द्वेषमूलक शब्द आहेत ना, त्यातून निदर्शनास येणाऱ्या तुमच्या मानसिकतेसाठी आरक्षणाची गरज आहे. संविधानात मिळालेलं आरक्षण हे सुद्धा 2 रुपये गहू आणि तांदळासाठी दिलं नव्हत एवढं सुद्धा तुम्हाला कळू नये. यावरून तुम्ही किती बे अक्कल अहात हे यातून सिद्ध करताय.

आणि तोंड वर वरून गुणवत्तेच्या थापा मारताय ? 

        गुणवत्ता काय असते हे आम्हाला विचारताय तुम्ही ? अरे घरच्याच शाळेत परीक्षा केंद्र असताना, शाळा सुद्धा घरचीच असताना एकही दिवस शाळेत न जाता, एवढंच काय परीक्षा केंद्रावर सुद्धा तुम्ही उपस्थित न राहता 90% मार्क्स घेणारे तुम्ही.  आम्हाला गुणवत्तेच्या गप्पा मारतात, सीईटी द्वारे मेडिकल ला प्रवेश नाही लागला. तर पैसे भरून शिक्षण घेणारे तुम्ही, कॉलेज उपस्थित नाही रहावं वाटल तर वडिलांच्या दबावाने पास होणारे तुम्ही, डी.एड साठी शासकीय फेरीतून घरा जवळच कॉलेज नाही भेटल तर हजारो रुपये डोनेशन भरून घराजवळच कॉलेज घेऊन कॉलेजला न जाणारे तुम्ही. शिक्षक म्हणून नोकरीवर जॉईन होऊन सुद्धा नोकरीला जाण्याची गरज पडणार नाही म्हणून घरच्याच संस्थेत घरी बसून पगार उचलणारे तुम्ही, मुलाखतीच्या नावाखाली भरतीत लाखो रुपये देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना डावलनारे तुम्ही ? आम्हाला गुणवत्तेची भाषा शिकवता काय ? 

       मान्य करूया की तुम्ही अक्कलवान आहात, मग इतके वर्ष तुम्हाला आरक्षण का मिळू शकलं नाही, याचं उत्तर तुम्ही मिळवू शकले नाही ? मित्रांनो आरक्षण हे 2 रुपये गहू आणि 2 रुपये तांदळासाठी आहे अस तुम्हाला वाटते यावरून कळते की तुम्ही किती अक्कलवान आहात.

         मित्रांनो कीव येते रे तुमची, तुमच्याकडे भरमसाट असताना सुद्धा जेव्हा दुसऱ्याच्या ताटात असलेलं  बघून तुमचा जीव तळमळ करतो. आज तुमच्यावर आरक्षण मागण्याची वेळ का आली ? शैक्षणिक संस्था या जास्तीतजास्त तुमच्याच आहेत ना ? मग त्या शैक्षणिक संस्थेत शिकण्यासाठी किती फिस आकारावी याबद्दल काहीच नियमावली नाही ? जो गब्बर येऊन पैसे देईल त्यालाच एडमिशन दिलं जाईल. ही स्थिती कोणी निर्माण केली रे मित्रा ? तुमच्यात काही गरीब आहेत, मान्य आहे. पण त्या गरीबांना वर आणण्यासाठी सोबतच्या समाजाने मदत करायला हवी ना ? सर्व सुविधा उपलब्ध असताना, आपल्या पाल्याला गुणवंत बनवून इतर ठिकाणी जॉब साठी पाठवून, त्याच ठिकाणी समाजातील अन्य गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना व्यवसायाची संधी देऊ शकले असते ना ? पण तशी संधी दिली का ? तसे न करता आपला मुलगा कसाही वागला तरी त्याला त्याच स्वातंत्र्य देऊन स्वैराचाराला मार्ग मोकळा करून दिला. कुठे दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्याची काय गरज आपल्याच शैक्षणिक संस्थेत कामाला लावलं. त्या पाल्याच्या गुणवत्तेतून कितीही पिढ्या बरबाद झाल्या तरी काही संबंध नाही. यातून सर्व काही मलाच मिळालं पाहिजे ही मानसिकता दिसून येते. जर ही मानसिकता असेल तर समाज म्हणून सोबत राहण्याला अर्थ तरी काय उरतो ?

 मित्रांनो तुमच्याकडे चार पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती होती ना ? मग त्या संपत्तीचं योग्य नियोजन का करता आल नाही तुम्हाला ( आमच्या हातात ते काही नव्हतच आम्ही काय करणार?) अस म्हणून स्वतः ला त्या मानसिकतेतून दूर नेण्यात काही अर्थ नाही. कारण तिचं मानसिकता मित्रानो तुमच्यात सुद्धा रुजलेली आहे. त्यापेक्षा कैकपट जास्त स्वार्थी ही पिढी होत आहे. 

     मिञांनो जो समाज एकवेळच्या जेवणाला मोताज होता, तो समाज आज पंचपक्वान खातोय. सोबतच समाजासाठी आपला वेळ आणि पैसा सुद्धा खर्च करतोय, सोबतच येणाऱ्या पिढीसाठी शक्य तेवढी तजवीज करतोय.हा सर्व बदल कशामूळे झाला आहे अस तुम्हाला वाटत ?  फक्त आरक्षणामुळे ? नाही मिञांनो आरक्षणासोबतच त्यांचा आदर्श बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा सुद्धा तितकाच कारणीभूत आहे. मिञांनो ज्या सामजाच आरक्षण पाहून तुमच्या डोळ्यात खुपते ना त्या समजाकडे जेवढं काही होत, त्यापेक्षा कैकपट संपत्ती तुमच्याकडे होती. पण तुमचे नाद तुम्हाला गप्प राहू देतील तरच ना ? त्या नादातच तर आहे नाही ती संपत्ती गमवून बसलात. यासाठी खूप काह दाखले उपलब्ध आहेतच.

   काही जण म्हणतील की, कुटुंबाची विभागणी झाली म्हणून आम्ही गरीब झालोत, आमच्याकडे असलेल्या संपत्तीचं विभाजन झाल आणि आज आम्हाला शिक्षण घेण्यासाठी जास्त फिस द्यावी लागते आणि ती फिस देण्याची आमची ऐपत नाही. म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे असे जे ओरडताय ना ? ही भरमसाट फिस भरण्याची वेळ कोणी आणली रे ? मागासवर्गाने ही जास्त फिस(डोनेशन) ची प्रथा सुरू केली का ? मित्रांनो लाखो रुपये डोनेशन देऊन शिक्षण घ्यायला सुरुवात कोणी केली रे मित्रांनो ? मग मित्रानो ज्यांनी डोनेशन ची प्रथा सुरू केली त्यांच्या विरोधात तुमचा आवाज शांत का ? त्यांच्याविरोधात बोला ना.  त्यांना आरक्षण आहे तर आम्हालाही आरक्षण मिळाले पाहिजे, ते कमी पैशात शिक्षण घेतात मग आम्हाला पण कमी पैशात शिक्षण मिळालं पाहिजे हा असा द्वेष का ? आपल्याकडे जे नाही ते शासनाकडून प्राप्त कसे करून घेता येईल हे बघा ना. कारण ते शासन तिथे तुमच्या आमच्या विकासासाठी बसले आहे ना. मग तुमच्या विकासात येत असलेले अडथळे नाहीसे करण्यासाठी शासन काम करत नसेल तर त्या शासनाला जाब विचारायचा अधिकार आपणास आहेच ना ? हे शासन जर उत्तर देतच नसेल तर मग त्या शासनाला पुन्हा संधी न देण्याचा अधिकार सुद्धा तुमच्या हातात आहेच ना ? मग तुमच्या त्या ताकदीचा कधी वापर करणार आहात का नाही ? का फक्त समाजात तेढ वाढेल याचाच विचार करणार आहात ?

        मिञांनो महाराष्ट्रात एकूण  510 जाती आरक्षण घेतात. त्यापैकी फक्त एकच जात तुम्हाला दिसते का ? ज्या जातीबद्दल तुमच्या मनात आकस आहे ना त्या जतीसोबत  अन्य 58 जाती सुद्धा आरक्षण घेतात तरी त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही.  असा भेदभाव का बर मिञांनो ? त्यांनी तुमचं काही वैयक्तिक नुकसान केलं आहे का ? तुम्हाला कोणती हानी पोहचवली आहे का ? तुम्हाला किंवा तुमच्या पिढ्यांना काही शारीरिक, मानसिक त्रास दिला आहे का ? मग हा एव्हढा द्वेष का आणि कशासाठी ?

         त्या एकाच जातीतील लोक पुढं आले आणि स्वतः ला विकसित करून घेतले. कारण त्यांना त्यांच्या मार्गदात्याने सांगितलं होत की, बाबाहो तुम्ही शिका, तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची पुस्तके घ्या आणि एक रुपयाचा अन्य उपयोगी खर्च करा. त्या समाजाला माहीत होत की, आपला विकास करून घ्यायचा असेल तर दुसरा कोणीच येणार नाही. कोणताच देव येऊन त्यांचा विकास करणार नाही. या जाणिवेतून त्या समाजाने स्वतः ला झोकून देऊन आपल्याला हव्या त्या गोष्टीची पूर्तता करून घेतली. परिस्थिती नव्हती, पोटाला पीळ देऊन आई वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या रक्ताच पाणी केलं. परिस्थिती प्रतिकूल असताना स्वतः ला सावरत प्रत्येक गोष्टीवर मात करत तो समाज आज इथपर्यंत पोहचला.  तोच विकास अन्य 58 जातींना का प्राप्त करून घेता आलं नाही ? त्यांचा विकास झाला म्हणजे त्यांनी कोणाच्या ताटातील हिसकावून घेतले नाही, किंवा त्यांना आहे तर मला का नाही म्हणून आकांडतांडव केलं नाही. याचा नक्कीच विचार करावा.

       मिञांनो तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा वापर कुठे केला ? याचा विचार केला तर तुमच्या लेखी शिक्षणाला महत्वच नव्हत ना. ज्या काळी हा उपेक्षित समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला तेव्हा तुम्ही तुमच्या संपत्तीची उधळण करत होतात. आम्ही शिक्षण घेऊन दुसऱ्याची गुलामी करावी काय ?  या आविर्भावात तुम्ही वावरत होतात.  आज  त्याच मानसिकतेने तुम्हाला रस्त्यावर आणल आहे. अशीच मानसिकता ठेवाल इतरांबद्दल द्वेष मनात राहील तर ती मानसिकता उद्या कुठे नेऊन ठेवलं याचा विचार व्हावा.

         उद्या आरक्षण भेटल्यावर सुद्धा आरक्षणाबत आणि विशिष्ठ समाजाबद्दल तुमच्यात तीच मानसिकता टिकून राहिली तर येणारा काळ खूप घातक ठरेल. स्वतः ला आणि समजाला समोर न्यायचं असेल तर, धर्माची कट्टरता बाजूला ठेवावीच लागेल. जातीला बाजूला ठेवून जर तुम्ही पुढं याल आणि सर्व समाज हातात हात घालून सोबत पुढे गेला तर राज्याचा, राज्यातील प्रत्येक नागरिकांचा सर्वांगीण विकास होईल. 

        अशी कोणत्याही प्रकारची भीक शासनाकडे मागण्याची वेळ येणार नाही.  शासन आपल्याला हव्या त्या सुविधा नक्कीच निर्माण करेल. पण त्या सर्वांत आधी आप - आपसात जी धर्मांधतेची कट्टरता टिकून आहे ती नष्ट व्हावी लागेल तरच हे शक्य आहे. अन्यथा धर्म आणि जातीच्या नावावर राजकारणी आपली पोळी भाजून घेतली तुम्ही भीक मागत रस्त्यावर उतरत रहा. एवढीच आपली लायकी उरेल अन्य काहीही भेटणार नाही एवढं मात्र नक्की.

© जी.संदीप (गोणार,नांदेड.)

              9552803980

Tuesday, October 10, 2023

अन्यथा खुर्ची खाली करा...




 तुम्हाला पाच वर्ष संधी भेटते

त्यात अरोबोंची संपत्ती कमवता.

एक टर्म संपली की पुन्हा दुसऱ्या टर्म साठी,

तुम्ही जीवाचे रान करून निवडून येण्याचा प्रयत्न करता.


दुसरी च काय तिसरी आणि चौथी टर्म सुद्धा तुम्ही प्रयत्न करता

पण ज्यांच्या जीवावर ते सगळ धाडस करता

मग त्यांच्यासाठी काही उत्तम करायचे सोडून

त्यांच्याच तोंडातील घास हिसकून घेण्याचा करंटेपणा का करता ?


पाच वर्षातील तुमच्या मुळे जमा झालेल्या संपत्तीचं ऑडिट केलं तर

तुम्ही तोंड दाखविण्याच्या लायकीचे रहाल का ?

अस असताना खाजगिरकानाचा खेळ मांडून

मतदारांच्या आयुष्याशी खेळायला लाज नाही वाटत का ?


तुम्ही किती काळे कारनामे आणि अवैध धंदे करता,

त्याकडे जनता नजर अंदाज करते.

आणि तीच जनता रस्त्यावर उतरून भीक मागते,

तरी त्यांच्यासाठी आवश्यक त्या गोष्टी न करण्याचं तुमचं धाडस कस होते ?


मान्य आहे जनता बेअक्कल आहे,

मान्य आहे की ती निर्बुद्ध आहे.

पण तुम्ही अक्कलवान म्हणून तिथे असताना,

नियोजनपूर्वक अर्थनिती ढासळवली जात आहे ?

अशी परिस्थिती डोळे आणि मनाला का दिसत आहे ?


पाच वर्षासाठी जर इथ कंत्राटी भरती केली तर,

तुमची सुद्धा पाच वर्षेच मुदत राहू द्या अशी मागणी वाढाया लागेल.

त्या मागणीने तुम्हाला काहीही फरक पडणार नाही,

अशी मानसिकता म्हणजे तुमच्याबद्दलची उद्विग्नता ठरेल.


एवढं उद्विग्न व्हायला तुम्ही का भाग पाडता रे,

जनतेने त्यांच्या हितासाठी तुम्हाला निवडून दिलं

त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करण्याचं सोडून

स्वतःची प्रॉपर्टी का वाढवत बसता रे ?


कमवलेल्या भ्रष्ट संपत्तीतील काही पैसे खर्च करून

करत असाल चमकोगिरीचे चार समाजातील कामे,

चमकोगिरी सोडून जनतेच्या करातून

जनतेसाठी काम करण्यासाठीच निवडून दिलेले असत रे त्याने 


याची जाण ठेवून देशातील नागरिकांसाठी काम कराल का ?

खाजगीकरणाचा जो विचार केलाय त्याला मूठ माती द्याल का ?

खाजगीकरणातूनच सर्व सुविधा घ्याव्या लागत असतील इथ,

तर मग देश विकून टाकूया का रे ?


आहे त्या आर्थिक स्थितीत जनतेसाठी

सरकारी सेवा देता येत नसतील तुम्हाला.

तर खुर्ची खाली करा ना, तिथच चीटकून बसायला

बापाची जायदाद नाही एवढं कस कळत नाही तुम्हाला ?


बापाच्या जायदादी वर हक्क दाखवल्याप्रमाणे

हे तुमचं अधिकारशाही वागणं बंद करा,

जनतेला काय हवं आणि काय नको याकडे लक्ष देऊन,

ते प्रत्येक द्या अन्यथा खुर्ची खाली करा.

© जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Sunday, October 8, 2023

आंदोलन यशस्वी पार पाडले म्हणजे हे यश नव्हे !



      मागील काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आपण दिनांक 06 ऑक्टोबर रोजी चा मोर्चा यशस्वी केला. त्याबद्दल सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन. या मोर्चासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप साऱ्या व्यक्तींनी, विद्यार्थ्यांनी, संघटनांनी मोलाचा संघर्ष केला. या संघर्षातून हा मोर्चा यशस्वी झाला. या मोर्चासाठी कोणत्याही एका व्यक्तीचं योगदान नक्कीच नाही, हे प्रत्येकजण जाणतोच त्यामुळं आपण जो संघर्ष करून लढा दिला आहे त्या लढयाच फलित आपणास मिळाले आहे का ? याचा विचार होणे आता गरजेचे आहे. कोणतेही आंदोलन करत असताना ते तीन मार्गातून जात असते. त्यात पाहिले आंदोलन पूर्व तयारी दुसरा टप्पा प्रत्यक्ष आंदोलन आणि तिसरा टप्पा आंदोलनोत्तर साध्य.

         या काही दिवसातील आंदोलनांची स्थिती पाहता विद्यार्थी मित्रांकडून दोन आंदोलने झाली या आंदोलनात पाहिले दोन टप्पे यशस्वी रित्या पार पाडले गेले पण तिसऱ्या टप्प्याबदल आपण अनभिज्ञ आहोत. काहीजण तिसऱ्या टप्प्याबद्दल ज्ञात असतील सुद्धा पण त्यावर काय कार्यवाही करायची आणि कशी करायची हे विचार करण्यात ते मागेच राहून जाईल. असे जर घडले तर अशा छोट्या छोट्या आंदोलनातून नवीन विद्यार्थी नेते तयार होत जातील जे विद्यार्थी नेते पुढं येतील त्यांना एखाद्या राजकीय पक्षाकडून डिमांड दिली जाईल. ते विद्यार्थी नेते गरजेनुसार स्वतः च अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करतील जेव्हा स्वतः च अस्तिस्त्व निर्माण होण्यास वाव नाही असे दिसेल तेव्हा मात्र अशा छोट्या आंदोलनातून तयार झालेला विद्यार्थी नेता राजकीय पक्षाच्या गळाला अडकेल आणि तुमच्या हक्क अधिकारासाठी लढणे त्याचे कायमचे बंद होईल. राजकीय पक्ष जसा सांगेल त्याला त्या पद्धतीने वागावे लागेल. त्या पक्षाने घेतलेला निर्णय कसा योग्य आणि हितावह आहे हेच विद्यार्थ्यांना समजून सांगेल. असे होऊ द्यायचे नसेल तर तिसऱ्या टप्प्याकडे आपण सर्व विद्यार्थ्यांनी आणि आंदोलनात आपली बरीचशी वर्ष घालवलेल्या मित्रांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे.

         तिसऱ्या टप्प्याचा विचार करताना आपण जे आंदोलन करत आहोत ते आंदोलन न्याय्य आहे का ? ते आंदोलन कशासाठी करत आहोत ? आंदोलन करण्याचा मार्ग कोणता आहे ? आंदोलन गैरसंविधनिक तर नाही ना ?  या सर्व मुद्द्यांचा विचार करून आपल्याला आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारावा लागतो. अन्यथा आपले श्रम मातीमोल ठरतील यात काही शंका नाही. आंदोलनात आपण जो मार्ग वापरणार आहोत या मार्गावरूनच आंदोलनोत्तर टप्पा आपल्याला निश्चित करता येतो.

       आंदोलनाबाबत भूमिका समजून घेत असताना काही मत मतांतरे आहेत त्यात, आंदोलन करणे म्हणजे आम्ही जिवंत असल्यालाचा तो पुरावा आहे, शासनाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही आंदोलन केलेच नाही तर मग शासन आमच्यावर हवे ते निर्णय लादत जाईल. असा विचार असलेला खूप मोठा वर्ग इथ आहे. असा विचार करणाऱ्या व्यक्तींमुळे आणि त्यांच्या विचारातून आंदोलने जन्म घेतात. अशा आंदोलनामुळे आवश्यक ते यश प्राप्त होत नाही. मग यातून आंदोलनात सहभागी होण्याचं प्रमाण कमी होत जात. मागील काही आंदोलने जी झाली त्या आंदोलनात सहभागी व्यक्तींचा विचार करता सर्व आंदोलक हे नवीन जोश आणि अपेक्षा घेऊन रस्त्यावर उतरले होते. 06 ऑक्टोबर चे आंदोलन होण्यापूर्वी सुद्धा खाजगीकरणाच्या विरुद्ध आंदोलन झाले होते. त्या आंदोलनात किती आंदोलक सहभागी होते हे यातील काही मित्रांना माहीतच असेल. मग असे जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी फक्त आंदोलने होत असतील आणि उद्दिष्ट साध्य होण्यासाठी त्याचा काही संबंध नसेल, आम्ही पण काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी च आंदोलन होत असतील तर त्या आंदोलनाचा सामान्य आंदोलकांना काय उपयोग ? सामान्य आंदोलक हा त्या आंदोलनातून ज्या मागण्या घेऊन पुढे येत असतो त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत एवढी प्रामाणिक अपेक्षा घेऊन ते सहभागी होत असतात. पण त्या मागण्यांच काय होते हे त्या सामान्य अंदोलकाला समजतच नाही. तो आंदोलक आंदोलनात मी सहभागी होतो या आनंदात सोशल मीडियावर अपडेट देऊन मोकळा होतो. पण त्या मागण्यांचे काय झाले हा विचार सोडून देऊन त्या अन्यायी नियमाचा अंमल स्वतःवर करून घेऊन शासनाचा गुलाम होऊन वागायला लागतो. शासनाचा नियम स्वीकारायचं च आहे तर मग हे आंदोलनाचा मार्ग स्वीकारून स्वतः चा वेळ वाया घालवण्यात तरी काय अर्थ ? राज्यभर लागू होणारा कायदा तुमच्या एका छोट्याशा आंदोलनाने बदलायला सत्तेत बसलेले काय मूर्ख आहेत काय ?

        ही सर्व स्थिती पाहता मग आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात नेमक असावं तरी काय ? असा प्रश्न जर तुमच्या मनाला पडला असेल तर खरच तुम्ही आंदोलन करण्यास आवश्यक ती मानसिकता घेऊन वावरत आहात हे यातून निष्पन्न होते. पण जर हा प्रश्न मनाला पडला नसेल तर मग मात्र तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी सोबत जाण्यासाठी म्हणून त्या आंदोलनात सहभागी होत असता. असं कोणाच्या तरी आवाहनावरून जर तुम्ही आंदोलनात जाल तर त्यातील तुमची उपस्थिती म्हणजे फक्त एक डोकं वाढल एवढीच राहील बाकी काहीच नाही.

       आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात काय असावे याचा विचार करत असताना, आंदोलनाचा उद्देश काय आहे ? आणि आंदोलनाचा मार्ग कोणता आहे यावरून तिसरा टप्पा ठरवता येतो. उदाहरणार्थ आंदोलन खाजगीकरनाच्या विरोधात असेल तर हे खाजगीकरण शासन करू शकते का ? त्याला कोणता विशेष अधिकार आहे ? ते कोणत्या परिस्थितीत असा निर्णय घेऊ शकतात ? या प्रश्नांची उत्तरे शोधून जर ती उत्तरे सामान्य नागरिकांच्या बाजून येत असतील तर मात्र आंदोलनाचा मार्ग मोकळा होतो. आंदोलन संविधानिक मार्गाने केलं पण त्या आंदोलनाची सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. तर मग ते आंदोलन तीव्र करावे लागेल. आंदोलन तीव्र करून सुद्धा शासन दखल घेत नसेल तर न्यायिक मार्गाचा वापर करून आपली मागणी कशी रास्त आहे हे न्यायालयात आपल्याला पटवून द्यावं लागेल. एवढे सारे प्रयत्न आपण कराल तरच हे खाजगीकरणाच भूत आपल्या मानगुटीवर बसणार नाही. अन्यथा हे खाजगीकरणाचं भूत आपल्या मानगुटीवरून उतरणार नाही एवढं मात्र नक्की. मग सरकार कोणतेही आले तरी त्यात काही बदल होणार नाही. कारण बघा ना, जे सरकार एस. टि. कर्मचाऱ्यांसाठी  आंदोलन करत होते तेच सरकार आता सत्तेत असून सुद्धा त्यांच्या त्या मागण्या मान्य करत नाही. म्हणजे विरोधक हे विरोधातून सत्तेत गेले की त्यांना सुद्धा  तीच बाब योग्य वाटते जी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी अवलंबली होती. 

        अशा स्थितीत एखाद आंदोलन करून आपण त्याचा सोशल मीडियावर बाऊ करतो. हे आंदोलन केलं ते आंदोलन केलं म्हणून आपण मिरवत बसतो पण त्या आंदोलनातून आवश्यक ते ध्येय साध्य  झाल का ? हेच पहायला विसरतो. मग आपण जर एक दिवसाचे आंदोलन करून आपण आपल्यात गुंग राहणार असू तर मग अशा आंदोलनाचा फायदा काय होईल ? आपल्याला आवश्यक असलेलं बदल शासन करेल का ? आपल्याला आवश्यक ते बदल शासन करणार नसेल तर मग त्यांचे निर्णय गप्प गुमाण आपल्याला स्वीकारायचे असतील तर मग हे आंदोलनाचे पाऊल उचलायचे तरी का ? यातून काय साध्य करण्याचा आपला विचार असतो ? या सगळ्या प्रश्नाचा विचार सर्व मित्रांनी करणे गरजेचे आहे. कारण एखाद्या आंदोलनातून काही गैर घडले आणि त्यातून सहभागी आंदोलकांवर जर गुन्हे नोंद झाले तर त्या गुन्ह्याची दखल कोण घेणार आहे ? 

        06 तारखेचे जे आंदोलन झाले त्या आंदोलनातून काय साध्य होईल हे आपल्या सर्वांसमोर आहे. मग या पुढील दिशा ठरवून आपल्याला मार्ग क्रमन करावे लागणार आहे. ही पुढील दिशा ठरवत असताना आपला मार्ग हा संविधानिक असणे खूप गरजेचं आहे. त्या आंदोलनासाठी आवश्यक ती प्रत्येक गोष्ट आपल्याला योग्य मार्गाने मिळवावी लागणार आहे.  मागणी योग्य आहे त्यामुळं ही मागणी मान्य होईपर्यंत कोणतीच भरती केली जाणार नाही. कोणतीच खाजगीकरणाची प्रक्रिया केली जाणार नाही यासाठी न्यायालयीन लढाई सुद्धा आपल्याला लढावी लागणार आहे.

          हे शासन सत्तेवर राहण्यासाठी कोणत्याही थराला गेले आहे. सगळे राजकारणी एका माळेत जाऊन बसले आहेत त्यामुळं सत्ताधाऱ्यांना विरोध करायला कोणताच विरोधक सुद्धा सक्षम नाही. त्यामुळं या निर्णयाविरुद्ध जो लढा द्यायचा आहे तो आपणालाच द्यावा लागणार आहे.      हा लढा नाही दिला तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला दोष देतील वैगरे भ्रामक कल्पना जरा बाजूला ठेवूया. थोडस वेगळ्या बाजूने विचार करूया काही वर्षात तुमचे मूल जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांच्या खाजगी शाळेतील शिक्षणासाठी चा खर्च लागेल तो खर्च या खाजगीकरणाच्या रेट्यात तुम्ही कमवू शकाल का ? या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला पेटून उठून हा लढा तीव्र करावाच लागणार आहे.

        हा लढा देत असताना या लढयात पुढे येणाऱ्या तरुणांनी काही नीतीनियम आणि काही बंधने पाळावे लागतील. पुढे येत असताना स्वतः च्या शिलासोबत आर्थिक सक्षम असणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. जर आर्थिक सक्षम नसाल तर तुम्ही कोणत्याच अमिषाला बळी पडणार नाहीत एवढी कठोर मानसिकता तुम्हाला तुमच्यात निर्माण करावी लागेल. आपण आपल्या ठिकाणी  प्रामाणिक असणे किती गरजेचं आहे आपण  जर प्रामाणिक नसू तर आपण चालवत असलेल्या चळवळीची काय स्थिती होईल याबद्दल यापूर्वी एका कवितेच्या माध्यमातून ती स्थिती मांडलेली आहेच.

           आंदोलनासारख्या सगळ्या गोष्टीद्वारे आपल्याला शासनावर दबाव आणायचा असेल तर त्यासाठी वेळ खर्च करण्याची कुवत आपल्याला निर्माण करावी लागेल. त्यात आंदोलनाला पुढे नेण्यासाठी जी कोणती व्यक्ती पुढाकार घेणार आहे ती व्यक्ती स्वतः साठी आर्थिक सक्षम असावी लागेल. सोबतच निरपेक्ष भाव त्या व्यक्तीत असावा लागेल.ती व्यक्ती जर आर्थिक सक्षम नसेल  आणि निरपेक्ष भाव नसेल तर आंदोलन यशस्वी होण्याची अपेक्षा धूसर होईल. कारण एखाद्या मोठ्या मागणीसंदर्भात आंदोलन असेल आणि ती मागणी मान्य करायची नसेल तर आंदोलनाच्या प्रमुखाला काही अमिषे देऊन मागण्यांना बगल देऊन, मागण्या मान्य केल्याचे भासवले जाईल आणि आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले जाते. मागील काही आंदोलनाचा उपोषनांचा तुम्ही अभ्यास केलात तर त्यातून तुम्हाला ही बाब नक्कीच लक्षात येईल.म्हणजेच आंदोलन हे होत राहतील, त्यातून कोणी मोठा होईल कोणी नष्ट होईल पण मागणी मात्र तिथेच राहील. मागणी मान्य करून घ्यायची असेल तर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले आणि ते आंदोलन यशस्वी झाले म्हणून हुरळून जाऊ नये.

                  © जी.संदीप(गोणार,नांदेड) 9552803980


Wednesday, October 4, 2023

आम्ही राजा नाही गुलामच राहणार ?



        30 सप्टेंबर आणि 01 ऑक्टोबर या दिवसातील 24 तासात नांदेड शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांनी आपला जीव गमावला आणि 70 अत्यवस्थ स्थितीत असल्याची बातमी  नांदेड वासियांच्या कानावर आदळली आणि सगळे सुन्न झाले. काही काळासाठी बधीर झाले. या परिस्थितीत आपल्या कुटुंबातील कोणी व्यक्ती त्यात समाविष्ट असता तर काय स्थिती झाली असती याची कलपणाच न केलेली बरी. नांदेड शासकीय रुग्णालयाची बातमी राज्यभर पसरली आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जाऊ लागले.

       हे राज्यात पहिल्यांदाच घडले असे नाही. मागील काही महिन्यातील अशा घटनांचा आढावा घेतला तर त्यात कळव्यातील शासकीय रुग्णालयात एकाच रात्रीत आगीत होरपळून 17 रुग्णांचा झालेला मृत्यू, भंडारा जिल्ह्यात झालेल्या 10 नवजात बालकांचा मृत्यू, नागपूर मधील शासकीय रुग्णालयात 24 तासात 25 रुग्णांचा झालेला मृत्यू, त्यानंतर नांदेड आणि लगेच नांदेड पाठोपाठ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू.

        ही सगळी आकडेवारी पाहिली तर एकच प्रश्न निर्माण होतो तो नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे शासनाला या घटनेचं गांभीर्य किती आहे ? या सगळ्या घटना घडलेल्या असताना त्या घटना तसे प्रसंग नंतर कोणत्याही रुग्णालयात घडू नयेत यासाठी काही उपाययोजना केली आहे का ? हा प्रश्न मात्र निरुत्तर राहतो.  कारण एवढे सारे गंभीर प्रकरण घडतात आणि एकाही नेत्याला त्याबद्दल काहीच सोयरसुतक नाही असं निदर्शनास येत आहे ? कारण रोग काय आहे हे न पाहताच एका जिल्ह्याचा खासदार शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णालयाच्या प्रमुखास तिथले शौचालय साफ करावयास लावतो. 

        तिथला कर्मचारी नीट काम करत नाही, तिथले डॉक्टर नीट सेवा देत नाहीत, तिथल्या सिस्टर रुग्णांशी नीट व्यवहार करत नाहीत, नातेवाईकांशी उर्मट वागतात. त्यामुळं त्या खासदारांनी जे केलं ते योग्यच केलं त्यांना असाच धडा शिकवला पाहिजे. असे म्हणून तोंड सुख घेणाऱ्यांनो तुम्ही जर तुमच्या शेतात काम करत असाल आणि शेतातील काम करण्यासाठी 10 कामगार लागत असतील आणि तिथे 05 च कामगार उपलब्ध असतील त्यानंतर काही काळातकाम दुप्पट देऊन तुमच्यावर बंधन असेल की ते काम तुम्हाला ठरवून दिलेल्या वेळेतच कोणतीही तक्रार न करता ते पूर्ण करायचे आहे.    अशी ताकीद तुम्हाला दिली गेली तर अशावेळी तुमची मानसिकता काय असेल ? तुम्ही बिगारी काम करत असाल तिथे सुद्धा अशीच स्थिती असेल, तुम्ही कंपनीत कामावर असाल तुम्हाला टार्गेट दिलं आहे, ते टार्गेट 50% मनुष्यबळात पूर्ण करायचे आहे ते सुद्धा कोणतीही  तक्रार न करता. त्यावेळी तुमची मानसिकता काय होते ? याचा विचार करणार आहात का नाही ?  त्याच दबावाखाली तेथील प्रशासन असेल तर अशावेळी तुम्ही प्रशासनाची बाजू घ्यावी का त्या स्वतः ला मालक समजणाऱ्या शासनाची ?

      सत्तेत असणाऱ्या खासदारांने ही घटना का घडली याचा विचार करून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यसरकारला द्यायला पाहिजे होत्या का प्रशासनावर असा दबाव टाकून स्टंटबाजी करायला हवी होती ?

       या प्रकरणात काल जे लोकप्रतिनिधी म्हणून खासदाराचे वर्तन घडले ते म्हणजे जनतेला मुर्खात काढण्यासाठी केलेला प्रयोग होता. हे जे काही घडले त्यात शासनाची काहीही चूक नाही, शासन दोषी नसून प्रशासन दोषी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या सगळ्या प्रकरणात स्थानिक खासदार काय झोपलेत का काय ? स्थानिक खासदार सोडून शेजारच्या जिल्ह्यातील खासदार इथे येतो आणि कर्मचाऱ्यावर दमदाटी करतो ?

        अशा सगळ्या प्रकरणात  शासन आपल्या चुका झाकण्यासाठी  एखाद्या आयोगाची स्थापना करून मोकळं होईल आणि अशा घटना वारंवार वेग वेगळ्या जिल्ह्यात घडतच राहतील. त्यांना जनतेच्या आरोग्याचं काहीही देणं घेणं नाही हे या विविध जिल्ह्यात घडलेल्या घटनांमधून लक्षात येत आहे. यात प्रशासनाची जर चूक होतीच तर मग त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा अधिकार शासनाला आहे याचा विचार त्या खासदारांनी का केला नाही ? तो विचार त्यांच्या डोक्यात आला नाही कारण त्यांना माहीत होते ही शासनाची चूक आहे ?  अशा प्रकरणात प्रशासन चुकत नाही अस माझ म्हणणं नाही. प्रशासन सुद्धा चुकते पण प्रत्येक गोष्टीत प्रशासणालाच जर आपण दोष देत बसलो तर कस चालेल ? आज शासनाच्या तिजोरीत रक्कम नाही म्हणून शासन कर्मचारी भरती करत नाही. मग व्यवस्थेवर येत असलेल्या तानास कोण जबाबदार आहे ? मग अशावेळी त्या शासनाची कॉलर धरण्याची हिम्मत आपल्यात का नाही ? नागरिकांच्या तुलनेत आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं हे शासनाचे काम आहे. अशावेळी रुग्णालयात 50% कर्मचारी आणि रुग्ण 200% अशी स्थिती निर्माण झाली असेल तर तेथील रुग्णांच्या होणाऱ्या  त्रासास जबाबदार कोण आहे ? शासन का प्रशासन ? रुग्णालयात आवश्यक तो औषधासाठा उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे ना ? मग तो उपलब्ध होत नसेल तर कोणाला जबाबदार धरणार ?  रुग्णालयात आवश्यक त्या सुधारित मशिन्स आहेत पण त्या हातळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी च नेमला नसेल तर त्या मशीन च रुग्णालय प्रशासनाने करायचं तरी काय ? असे अनेक प्रश्न निरुत्तर राहत असताना आपण जर शासनाला बाजूला करत असू आणि प्रशासनाला दोषी धरत असू तर आपण आपल्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतोय यात मात्र काही शंका नाही.

         नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणं हे शासनच काम असताना थोड्याफार काही गोष्टी फुकट देऊन आम्ही तुमच्यासाठी खूप काही करतोय असं सोंग घेत हे शासन आपल्या पुढं येत आहे.  फुकट देण्याची एवढीच जर कुवत आहे तर शासन खाजगीकरणाचा सपाटा का लावत आहे. कर्मचारी भरती कंत्राटी का करत आहे ? प्रत्येक क्षेत्रात 100% कर्मचारी भरती का होत नाही ? एवढंच फुकट देण्याची कुवत असेल तर मग नागरिकांना आवश्यक असलेले शिक्षण दर्जेदार का दिलं जात नाही ? का शिक्षक भरतीचा खोळंबा मांडून ठेवला आहे ? ज्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केलं होते त्याच मागण्या आता का लागू करत नाहीत ? एस. टी. तोट्यात आहे कर्मचाऱ्यांना पगार वाढ देता येणार नाही अशी शासनाची भूमिका आहे तर मग का महिलांना आणि वृद्धांना तिकिटांमध्ये सवलत दिली आहे ?

       राज्यातील नागरिकांना काही द्यायचंच असेल तर त्यांच्या हाताला काम द्या. त्यांना शिक्षणानुसार रोजगार द्या.  त्यांना पैसे कमविण्याची साधने उपलब्ध करून द्या.नागरिक म्हणजे या देशातील राजा आहे, तुमच्या भिकेवर जगणारे कंगाल भिकारी नाहीत. पण या राजांना आपली किंमत अद्याप कळत नाही. जोपर्यंत या राजांना आपली किंमत कळणार नाही तोपर्यंत हे असे रुग्णालयातील मृत्यंचे तांडव, फुकट घेऊन गुलाम म्हणून जगण्याची सवय,  रोजगारासाठी शहराकडे होणारे स्थानांतर कधीच थांबणार नाही. हे मात्र नक्की. हा राजा राजा नाही तर गुलाम बनुनच राहील ?

©जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...